शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

मृत्यू नावाचे सत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 06:33 IST

एकंदरीत काय, मृत्यू नावाची कालभक्षक शक्ती अशी आहे की जिच्यासमोर भणंग भिकाºयापासून ते महासम्राटासमोर सगळे समान आहेत.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेमृत्यू नावाच्या सर्वभक्षक शक्तीचे अचूक वर्णन करणारी एक बोधकथा बुद्ध चरित्रात मिळते. ‘किसा गौतमी नावाच्या वृद्धेच्या एकुलत्या एक मुलाचा अचानक मृत्यू होतो, तेव्हा ही वृद्धा भगवान गौतम बुद्धांकडे जाते व बुद्धास विनंती करते की, ‘मला माझा मुलगा परत हवा, त्याला जिवंत करा.’ यावर गौतम बुद्ध उत्तर देतात, ‘जरूर मी तुझ्या मुलास जिवंत करेन, पण तत्पूर्वी एक काम कर ज्या घरात एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही अशा घरातून मला मूठभर मोहऱ्या आणून दे!’ किसा गौतमी घर-घर फिरली, पण तिला एकही घर असे सापडले नाही जेथे कुणाचाच मृत्यू झाला नाही. शेवटी ती बुद्धांकडे परत गेली व बुद्धाने तिला जीवन-मृत्यूच्या अढळ सत्याचा सदउपदेश दिला.

एकंदरीत काय, मृत्यू नावाची कालभक्षक शक्ती अशी आहे की जिच्यासमोर भणंग भिकाºयापासून ते महासम्राटासमोर सगळे समान आहेत. त्याच्या विळख्यातून कुणाचीच सुटका होऊ शकत नाही. आयुष्याच्या वाटेवरून चालताना अनेक सखे-सोबती व नात्यागोत्याचा गोतावळा गोळा होतो. काही काळ जीवनाची यात्रा रसमय होते, पण जगण्याचा सुंदर क्षण अनुभवताना मरणाचे स्मरण असावे. ज्याचे नेमके वर्णन करताना भगवद्गीतेत म्हटले आहे -

वासांसि जीर्णानि यथा विहायनवानि गृन्हन्ति नरोपरानीतथाशरिराणि विहाय जीर्णानिअन्यानि संयाति नवानि देही।।

संत ज्ञानेश्वर माउलीने यावर सुंदर भाष्य करताना म्हटले आहे, जसे जीर्ण झालेला कपडा आपण टाकून देतो व नवा परिधान करतो तसे चैतन्यनाथ आत्मा एक देह टाकून दुसºया देहाचा स्वीकार करतो. या विवेचनाचा अर्थ असाही नव्हे की हे जीवन कसले मरणाची माला, मासोळी झोंबते तोडावयासी गळाला असे मरत-मरत जगावे. खरं तर मरत-मरत जगणाºयास जगण्याचा आस्वादच मिळत नाही. त्याचा अर्थ एवढाच, जगण्याला विचारांचे अधिष्ठान असावे.

आज धनिक म्हणून जगताना धनाची विल्हेवाट कशी लावावी या विवंचनेत जगण्यातला आनंदच नष्ट होतो, तर निर्धन म्हणून जगताना आयुष्यच दु:खाचे कोठार वाटू लागते. यापेक्षा जगण्याच्या मुक्कामात मिळणाºया भौतिक वस्तूत दुसºयाचाही वाटा आहे. जाण्यासाठी तर सारेच आले आहेत, पण गेल्यानंतरही काही शतके उत्तम कीर्तीचा सुगंध जर या पृथ्वीतलावर दरवळत राहिला तर तेच खरे अमरत्व, मोक्ष वा मुक्ती होय.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक