शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

मृत्यू नावाचे सत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 06:33 IST

एकंदरीत काय, मृत्यू नावाची कालभक्षक शक्ती अशी आहे की जिच्यासमोर भणंग भिकाºयापासून ते महासम्राटासमोर सगळे समान आहेत.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेमृत्यू नावाच्या सर्वभक्षक शक्तीचे अचूक वर्णन करणारी एक बोधकथा बुद्ध चरित्रात मिळते. ‘किसा गौतमी नावाच्या वृद्धेच्या एकुलत्या एक मुलाचा अचानक मृत्यू होतो, तेव्हा ही वृद्धा भगवान गौतम बुद्धांकडे जाते व बुद्धास विनंती करते की, ‘मला माझा मुलगा परत हवा, त्याला जिवंत करा.’ यावर गौतम बुद्ध उत्तर देतात, ‘जरूर मी तुझ्या मुलास जिवंत करेन, पण तत्पूर्वी एक काम कर ज्या घरात एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही अशा घरातून मला मूठभर मोहऱ्या आणून दे!’ किसा गौतमी घर-घर फिरली, पण तिला एकही घर असे सापडले नाही जेथे कुणाचाच मृत्यू झाला नाही. शेवटी ती बुद्धांकडे परत गेली व बुद्धाने तिला जीवन-मृत्यूच्या अढळ सत्याचा सदउपदेश दिला.

एकंदरीत काय, मृत्यू नावाची कालभक्षक शक्ती अशी आहे की जिच्यासमोर भणंग भिकाºयापासून ते महासम्राटासमोर सगळे समान आहेत. त्याच्या विळख्यातून कुणाचीच सुटका होऊ शकत नाही. आयुष्याच्या वाटेवरून चालताना अनेक सखे-सोबती व नात्यागोत्याचा गोतावळा गोळा होतो. काही काळ जीवनाची यात्रा रसमय होते, पण जगण्याचा सुंदर क्षण अनुभवताना मरणाचे स्मरण असावे. ज्याचे नेमके वर्णन करताना भगवद्गीतेत म्हटले आहे -

वासांसि जीर्णानि यथा विहायनवानि गृन्हन्ति नरोपरानीतथाशरिराणि विहाय जीर्णानिअन्यानि संयाति नवानि देही।।

संत ज्ञानेश्वर माउलीने यावर सुंदर भाष्य करताना म्हटले आहे, जसे जीर्ण झालेला कपडा आपण टाकून देतो व नवा परिधान करतो तसे चैतन्यनाथ आत्मा एक देह टाकून दुसºया देहाचा स्वीकार करतो. या विवेचनाचा अर्थ असाही नव्हे की हे जीवन कसले मरणाची माला, मासोळी झोंबते तोडावयासी गळाला असे मरत-मरत जगावे. खरं तर मरत-मरत जगणाºयास जगण्याचा आस्वादच मिळत नाही. त्याचा अर्थ एवढाच, जगण्याला विचारांचे अधिष्ठान असावे.

आज धनिक म्हणून जगताना धनाची विल्हेवाट कशी लावावी या विवंचनेत जगण्यातला आनंदच नष्ट होतो, तर निर्धन म्हणून जगताना आयुष्यच दु:खाचे कोठार वाटू लागते. यापेक्षा जगण्याच्या मुक्कामात मिळणाºया भौतिक वस्तूत दुसºयाचाही वाटा आहे. जाण्यासाठी तर सारेच आले आहेत, पण गेल्यानंतरही काही शतके उत्तम कीर्तीचा सुगंध जर या पृथ्वीतलावर दरवळत राहिला तर तेच खरे अमरत्व, मोक्ष वा मुक्ती होय.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक