शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

विचार कायमस्वरुपी राहू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 09:33 IST

एका विशिष्ट क्षणी मनात उत्स्फूर्त झालेल्या भावनेला किंवा विचाराला दिलेले आटोपशीर शद्बरूप हे स्वयंपूर्ण असे विचार तयार करतात.

एका विशिष्ट क्षणी मनात उत्स्फूर्त झालेल्या भावनेला किंवा विचाराला दिलेले आटोपशीर शद्बरूप हे स्वयंपूर्ण असे विचार तयार करतात. त्यातून अभंग, काव्य किंवा साहित्यातील विविध प्रकारात मोडणारे वाङ्मय तयार होते. नंतर तोच विचार कायमस्वरुपी राहील असेही सांगता येत नाही. तो विचार नंतरच्या काळात निष्प्रभही होऊ शकेल? कारण ज्यावेळी संसार दु:खाने पोळलेली अवस्था असेल त्यावेळी त्या मनाची स्थिती बिघडलेली असेल. संवेदनक्षम मनोभूमिकेत असणाऱ्या मनाची अवस्था त्या-त्या क्षणी सारखीच असू शकत नाही. विचारगर्भ किंवा भावनोत्कट मनाचे सहजोद्गार असतात. काहीवेळा संतमंडळींच्या सहवासात असताना भक्तिप्रेम, सुखाची अनुभूती घेणारे मन इतर वेळेला वेगळा अनुभव मांडताना दिसते. म्हणजे मानवी मनाच्या दोन विचारश्रेणी आहेत. त्याचा आपण विचार करतो. मानवी जीवनाची कृतार्थता कोणत्या गोष्टीत आहे याचे विश्लेषण संतविचारांनी भारावलेले मनच करू शकते.

मनाच्या या विविध आविष्कारांमुळे त्याचा अधिकार समाजाच्या सर्व स्तरातून पाहायला मिळतो. प्रापंचिक दु:खांनी गांजलेले स्त्री-पुरुषाचे ‘मन’ नव्या आनंदमयी अशा वातावरणात रंगून जाते किंवा कधी कधी आत्मसात केलेल्या ज्ञानाचे प्रात्यक्षिकीकरण दाखवते. साऱ्यांच्या जीवनाचे प्रयोजन मनच करीत असते. जन्म-मरणाच्या फेºयातून निरंतराची मुक्तता अनुभवण्याची किमयाही मनाचीच असते किंवा भक्तिप्रेमाचा आनंद मिळविण्यासाठी आपल्याला पुन: पुन्हा हा जन्म मिळावा ही अपेक्षा करणारेही मनच होय. कारण ईश्वरकृपेचा अनुग्रह व्हावा ही अपेक्षा बाळगणारे मनच होय. यामुळे जीवनात सुख जवापाडे असले तरी दु:ख पर्वताएवढे असते याचाही अनुभव घेणारे मन. परमेश्वराने आपल्याला या दु:खमय संसारातून सोडवावे असे वाटणारेसुद्धा ‘मन’च होय. काही जणांच्या जीवनात वैफल्य येऊन या संसाराला कंटाळणारेही मनच असते. तर काही जणांना भावमनाने परमेश्वरापाशी पोहोचविणारे मनच असते. या संसारातील सुख-दु:खांच्या पाठीमागे मनच कार्यरत असते. त्यामुळे सर्व काही मनावरच अवलंबून आहे. मन आनंदी ठेवा. सर्वदूर आनंद मिळेल.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक