शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

पितरांचे पूजन करण्यात काहीही गैर नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 15:21 IST

पितरांचे पूजन करण्यात काहीही गैर नाही, ते करायलाच हवे. पण मेलेल्यांना खाऊ घालणे आणि जिवंत माणसांना मरणयातना भोगायला लावणे ...

पितरांचे पूजन करण्यात काहीही गैर नाही, ते करायलाच हवे. पण मेलेल्यांना खाऊ घालणे आणि जिवंत माणसांना मरणयातना भोगायला लावणे याने खरेच पुण्य मिळेल का? पितरांचा आत्मा शांत होईल का? याचा विचार आपण कधी करणार? 

अक्षय्यतृतीया... साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त! पितरांचे स्मरण करण्याचा दिवस. या दिवशी पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर, आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया आदी वाढून सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांंचा आत्मा शांत होतो असे मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात एवढं सर्व करायला वेळ नसला तरी अनेक जण पितरांच्या नावे अन्नदान करतात. काही जण ते पाण्यात सोडतात तर काही कावळ्यांना खाऊ घालतात.

सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने दुपारच्या वेळी कावळेही दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे यंदा पितरांचा आत्मा शांत करायला कावळे मिळतील का, असा प्रश्नही अनेकांना सतावत आहे. पितरांचे पूजन करण्यात काहीही गैर नाही, ते करायलाच हवे. पण मेलेल्यांना खाऊ घालणे आणि जिवंत माणसांना मरणयातना भोगायला लावणे याने खरेच पुण्य मिळेल का? याचा विचार आपण कधी करणार? आजचे कुटुंब त्रिकोणी किंवा चौकोनी पद्धतीचे आहे. मम्मी-डॅडी आणि चिंटी, बंटीच्या कुटुंबात आजी-आजोबांना जागा नाही. ते त्यांच्या स्टेटसमध्ये बसत नाहीत. त्यामुळे काहीजण आपल्या वृद्ध माता-पित्याची रवानगी वृद्धाश्रमात करतात. ज्यांना प्रेमाने घडवले, लहानाचे मोठे केले, त्यांच्याकडून मिळालेल्या या अपमानास्पद वागणुकीने म्हाताºया आई-वडिलांच्या डोळ्यांच्या कडा ओलावतात, पण त्यांच्या डोळ्यातले पाणी त्यांच्या मुलांना दिसत नाही. त्यांच्या डोळ्यावर हायफाय स्टेटस, आपला संसार, आपली मुले... अशी संकुचित विचारांची पट्टी असते. आणि या आपल्यांमध्ये आई-वडिलांना थारा नसतो.

काही जण आपल्या मुलांना पाळणाघरात ठेवायला नको, घरात स्वयंपाक करायला नको, म्हणून आई-वडिलांचा अक्षरश: नोकरांसारखा वापर करून घेतात. काही अपवाद वगळता आज अनेक घरात असेच काहीसे चित्र हमखास पाहायला मिळते. मुलांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक, वाढता दुरावा यामुळे आई-वडिलांना मात्र जीवन नकोसे होऊन जाते. मरणाची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो आणि मग कधीतरी हवेहवेसे वाटणारे मरण त्यांच्या डोळ्यासमोर उभे ठाकते आणि सुटलो एकदाचे म्हणून ते निमूटपणे डोळे मिटतात.

आई गेली, वडील गेले की मग त्यांच्याशी निष्ठूरपणे वागणाºया याच मुलांच्या डोळ्यांत पाणी जमा होते. आईचे किंवा वडिलांचे श्राद्ध घातले जाते. त्यांच्या आवडीचे सर्व खाद्यपदार्थ कावळ्याला खाऊ घातले जातात. माझी आई फार प्रेमळ होती, वडील खूप चांगले होते... असे म्हणत जुन्या आठवणींना  उजाळा दिला जातो. कावळ्याने दिलेले अन्न खाल्ले की आई-वडिलांचा आत्मा तृप्त झाला, असे मानले जाते. काय म्हणावे असल्या प्रेमाला आणि जिवंतपणी आई-वडिलांना मरणोप्राय यातना देऊन मेल्यानंतर त्यांचा आत्मा शांत करण्यासाठी धडपडणाºया त्यांच्या स्वार्थी मुलांना?

या सर्वांची आठवण होण्यामागचे कारण म्हणजे अक्षय्य तृतीया, हा दिवसही खास पितरांसाठीच असतो. त्यांचे स्मरण करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठीच असतो. पण, मेलेल्यांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद हवे असतील तर घरातील वृद्ध, जिवंत आई-वडिलांची सेवा करायला हवी. निदान त्यांचे मन दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. त्यांना काय हवे, काय नको, याकडे किमान लक्ष द्यायला हवे, एवढे केले तरी त्यांचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतील. तुमचे अनुकरण तुमची लहान मुले करतील आणि त्यामुळे त्यांच्यावर नकळतपणे जे संस्कार होतील त्यातून तुमचा वृद्धापकाळही सुखाचा होईल. म्हणूनच आजच्या अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पितरांचे स्मरण करण्यासोबतच जिवंत वृद्ध माता-पित्यांची प्रेमाने काळजी घेण्यास सुरुवात करू या आणि त्यांच्या आशीवार्दाने जीवनातील अक्षय्य आनंद, सुख-समृद्धीच्या दिशेने वाटचाल करुया ! 

- गौरीशंकर कंटीकर महास्वामी, शेळगी

टॅग्स :SolapurसोलापूरAkshaya Tritiyaअक्षय तृतीयाAdhyatmikआध्यात्मिक