शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

ऐसे हे अवघेचि ऐकावे । परंतु सार शोधून घ्यावे ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 18:48 IST

श्रवणाने अंत:करणांत प्रेम निर्माण होते म्हणून अशा या श्रवणासाठी आयुष्यात माणसाने तीन संग निश्चित करावेत. प्रसंग, व्यासंग, सत्संग..!

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )भगवद्प्राप्ती वाचून जगणे लाजिरवाणे असे ज्याच्या मनाने पक्के घेतले तोच भगवद् प्राप्तीच्या साधनांचा शोध घेतो. कोणत्याही वस्तूची खरी भूक लागल्याशिवाय कोणी तिच्या प्राप्तीची तळमळ करीत नाही. संसार दु:खमय असूनही त्याच्या तडाख्यातून सुटण्यासाठी कोणी धडपड करित नाही. ते दुःख मायेच्या प्रभावाने विसरुन तो आशेने जगतो. खरे पाहिले तर, माऊली जसं म्हणतात - 

उपजे ते नासे । नासे ते पुनरपि दिसे ॥हे घटिकायंत्र जैसे । परिभ्रमेगा ॥

मृत्युपोटी जन्म आणि जन्मापोटी मृत्यू असतो. त्यामुळे मृत्यूला  मारले तर जन्मातून सुटका होते, पण बहुतेकांचे आयुष्य झोपेत जाते. देहाचा अहंकार सर्वांना थोपटून निजवतो. आमचा सर्व व्यवहार झोपेतच होतो. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -

निजेले असताच मेले । पुन्हा उपजताच निजेले ॥ऐसे आले आणि गेले । बहुत लोक ॥

परमेश्वराला नेणून जगणे ही निद्रा आणि जाणून जगणे ही जागृती.. निद्रा हे बंधन आणि जागृती हा मोक्ष आहे. उपनिषदकार जे सांगतात -

जागृत रे जना: ॥

ते याच अर्थाने. संतांच्या संगतीने निद्रा उडून जाते आणि स्वरूपाची जागृती होते. ही जागृती फक्त मनुष्य देहातच आहे, इतर देहात नाही, म्हणून श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -

ऐसे हे अवघेचि ऐकावे । परंतु सार शोधून घ्यावे ॥असार ते जाणोनी त्यागावे । या नाव श्रवण भक्ती ॥ऐसे श्रवण सगुणाचे । अध्यात्म निरुपण निर्गुणाचे ॥विभक्ती सांडोनी भक्तीचे । मूळ शोधावे ॥

अशाच श्रवणाने देव आणि भक्त यातील अंतर संपून ऐक्य निर्माण होते पण असे श्रवण कसे करावे.? श्रोता कसा असावा.? श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -

मनाच्या तोडोनी वोढी । श्रवणी बैसावे आवडी ॥सावधपणे घडीने घडी । काळ सार्थक करावा ॥अर्थ प्रमेय ग्रंथांतरी । शोधून घ्यावी अभ्यंतरी ॥दुश्चीत पण आले तरी । पुन्हा श्रवण करावे ॥

अशा श्रवणाने चित्त शुद्ध होते, बुध्दी दृढ होते, अभिमान तुटतो, मनोजय होतो आणि अंगी समाधान बाणतं म्हणून आपल्या विवेक बुध्दीला धोका पोचेल, समाधान डळमळीत होईल असं काही ऐकू नये. आज आपण आपलेच ग्रंथ, पुराणकथा, शास्त्र याविषयी विपरीत विचार करतो पण जेव्हा आपण तळमळीने ऐकू तेव्हा राजा परिक्षिती जसे म्हणतो -

नेषाति दु:सहा क्षुन्मां त्यक्तोदमपि बाधते ।पिबतं त्वंमुखांभोजच्युतं हरिकथामृतं ॥

की, मी हरिकथामृत पित असल्याने मला तहान-भूक कशाचीही बाधा होत नाही कारण संसार तापाने तापलेल्या जीवांना हरिकथामृत हेच औषध आहे.नाथ महाराज म्हणतात -

तुझे कीर्ती श्रवणाचे आवडी । लागली कर्ण पियुषी गोडी ॥तेथ अमृताची चवी थोडी । हो अर्धघडी न लागता ॥एैसे ऐकता तुझी कीर्ती । सवासाना स्पृहा नासाती ॥ते भक्त तुज न विसंबती । हृदयी वाहती सर्वदा ॥

भगवद् गुण ऐकल्याने इच्छा, वासना संपून जातात एवढेच नव्हे तर नाथ महाराज म्हणतात -

करिता माझी कीर्ती श्रवण । प्रेमे ओसंडे अंत:करण ॥विसरे देह गेहाचि आठवण । तेथे प्रत्यवाय जाण बाधीना ॥

श्रवणाने अंत:करणांत प्रेम निर्माण होते म्हणून अशा या श्रवणासाठी आयुष्यात माणसाने तीन संग निश्चित करावेत. प्रसंग, व्यासंग, सत्संग. प्रसंगाने मन घडते, व्यासंगाने ज्ञान वाढते आणि सत्संगाने माणसाचे जीवनच घडते म्हणून जीवनाचा आणि अध्यात्माचा पाया पक्का होण्यासाठी श्रवणाची नितांत गरज आहे..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक