शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ऐसे हे अवघेचि ऐकावे । परंतु सार शोधून घ्यावे ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 18:48 IST

श्रवणाने अंत:करणांत प्रेम निर्माण होते म्हणून अशा या श्रवणासाठी आयुष्यात माणसाने तीन संग निश्चित करावेत. प्रसंग, व्यासंग, सत्संग..!

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )भगवद्प्राप्ती वाचून जगणे लाजिरवाणे असे ज्याच्या मनाने पक्के घेतले तोच भगवद् प्राप्तीच्या साधनांचा शोध घेतो. कोणत्याही वस्तूची खरी भूक लागल्याशिवाय कोणी तिच्या प्राप्तीची तळमळ करीत नाही. संसार दु:खमय असूनही त्याच्या तडाख्यातून सुटण्यासाठी कोणी धडपड करित नाही. ते दुःख मायेच्या प्रभावाने विसरुन तो आशेने जगतो. खरे पाहिले तर, माऊली जसं म्हणतात - 

उपजे ते नासे । नासे ते पुनरपि दिसे ॥हे घटिकायंत्र जैसे । परिभ्रमेगा ॥

मृत्युपोटी जन्म आणि जन्मापोटी मृत्यू असतो. त्यामुळे मृत्यूला  मारले तर जन्मातून सुटका होते, पण बहुतेकांचे आयुष्य झोपेत जाते. देहाचा अहंकार सर्वांना थोपटून निजवतो. आमचा सर्व व्यवहार झोपेतच होतो. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -

निजेले असताच मेले । पुन्हा उपजताच निजेले ॥ऐसे आले आणि गेले । बहुत लोक ॥

परमेश्वराला नेणून जगणे ही निद्रा आणि जाणून जगणे ही जागृती.. निद्रा हे बंधन आणि जागृती हा मोक्ष आहे. उपनिषदकार जे सांगतात -

जागृत रे जना: ॥

ते याच अर्थाने. संतांच्या संगतीने निद्रा उडून जाते आणि स्वरूपाची जागृती होते. ही जागृती फक्त मनुष्य देहातच आहे, इतर देहात नाही, म्हणून श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -

ऐसे हे अवघेचि ऐकावे । परंतु सार शोधून घ्यावे ॥असार ते जाणोनी त्यागावे । या नाव श्रवण भक्ती ॥ऐसे श्रवण सगुणाचे । अध्यात्म निरुपण निर्गुणाचे ॥विभक्ती सांडोनी भक्तीचे । मूळ शोधावे ॥

अशाच श्रवणाने देव आणि भक्त यातील अंतर संपून ऐक्य निर्माण होते पण असे श्रवण कसे करावे.? श्रोता कसा असावा.? श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -

मनाच्या तोडोनी वोढी । श्रवणी बैसावे आवडी ॥सावधपणे घडीने घडी । काळ सार्थक करावा ॥अर्थ प्रमेय ग्रंथांतरी । शोधून घ्यावी अभ्यंतरी ॥दुश्चीत पण आले तरी । पुन्हा श्रवण करावे ॥

अशा श्रवणाने चित्त शुद्ध होते, बुध्दी दृढ होते, अभिमान तुटतो, मनोजय होतो आणि अंगी समाधान बाणतं म्हणून आपल्या विवेक बुध्दीला धोका पोचेल, समाधान डळमळीत होईल असं काही ऐकू नये. आज आपण आपलेच ग्रंथ, पुराणकथा, शास्त्र याविषयी विपरीत विचार करतो पण जेव्हा आपण तळमळीने ऐकू तेव्हा राजा परिक्षिती जसे म्हणतो -

नेषाति दु:सहा क्षुन्मां त्यक्तोदमपि बाधते ।पिबतं त्वंमुखांभोजच्युतं हरिकथामृतं ॥

की, मी हरिकथामृत पित असल्याने मला तहान-भूक कशाचीही बाधा होत नाही कारण संसार तापाने तापलेल्या जीवांना हरिकथामृत हेच औषध आहे.नाथ महाराज म्हणतात -

तुझे कीर्ती श्रवणाचे आवडी । लागली कर्ण पियुषी गोडी ॥तेथ अमृताची चवी थोडी । हो अर्धघडी न लागता ॥एैसे ऐकता तुझी कीर्ती । सवासाना स्पृहा नासाती ॥ते भक्त तुज न विसंबती । हृदयी वाहती सर्वदा ॥

भगवद् गुण ऐकल्याने इच्छा, वासना संपून जातात एवढेच नव्हे तर नाथ महाराज म्हणतात -

करिता माझी कीर्ती श्रवण । प्रेमे ओसंडे अंत:करण ॥विसरे देह गेहाचि आठवण । तेथे प्रत्यवाय जाण बाधीना ॥

श्रवणाने अंत:करणांत प्रेम निर्माण होते म्हणून अशा या श्रवणासाठी आयुष्यात माणसाने तीन संग निश्चित करावेत. प्रसंग, व्यासंग, सत्संग. प्रसंगाने मन घडते, व्यासंगाने ज्ञान वाढते आणि सत्संगाने माणसाचे जीवनच घडते म्हणून जीवनाचा आणि अध्यात्माचा पाया पक्का होण्यासाठी श्रवणाची नितांत गरज आहे..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक