शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

होम-हवन करताना मंत्रांच्या शेवटी 'स्वाहा' का म्हटलं जातं? जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 16:50 IST

हिंदू धर्मात होम-हवनाला सर्वात पवित्र धार्मिक कार्य मानलं जातं. लग्न असो वा कोणताही धार्मिक कार्यक्रम नेहमीच लोक होम-हवन करतात.

(Image Credit : solutionastrology.com)

हिंदू धर्मात होम-हवनाला सर्वात पवित्र धार्मिक कार्य मानलं जातं. लग्न असो वा कोणताही धार्मिक कार्यक्रम नेहमीच लोक होम-हवन करतात. होम-हवन करताना काही मंत्रांचा जप करून 'स्वाहा' म्हणून काही पदार्थ किंवा वस्तू अग्निमध्ये टाकल्या जातात. यात देवाला काही नैवेद्यही अर्पण केलं जातं. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, प्रत्येक मंत्रांच्या शेवटी स्वाहा का म्हटलं जातं? अनेकदा तुम्हीही गंमतीने कधी स्वाहा म्हटलं असेल. चला जाणून घेऊ याचा अर्थ. 

श्रीमद्भगवत गीता आणि शिव पुराणात स्वाहाचं वर्णन आढळतं. स्वाहा चा अर्थ आहे योग्य पद्धतीने पोहोचवणे म्हणजे कोणतीही वस्तू त्याच्या प्रिय व्यक्तीपर्यंत सुरक्षित आणि योग्य पद्धतीने पोहोचवणे. पुराणांनुसार, 'स्वाहा' ही अग्नि देवाची पत्नी आहे. त्यामुळेच होम-हवनाच्या प्रत्येक मंत्रांनंतर या शब्दाचा उच्चार केला जातो. 

तसेच असेही मानले जाते की, कोणताही हवन हा तोपर्यंत सफल मानला जात नाही, जोपर्यंत देवता त्या हवनाला ग्रहण करत नाही. पण देवता हे ग्रहण तेव्हाच करतात जेव्हा अग्नि द्वारे आणि स्वाहाच्या माध्यमातून ते अर्पण केलं जात नाही. 

स्वाहाबाबत असेही म्हटले जाते की, स्वाहा ही प्रजापति दक्षची मुलगी होती. तिचा विवाह अग्नि देवासोबत झाला होता. अग्निदेव त्यांची पत्नी स्वाहाच्या माध्यमातूनच हविष्य ग्रहण करतात. 

स्वाहाशी निगडीत आणकी एका आख्यायिकेनुसार स्वाहा ही निसर्गाचीच एक कला होती. तिचा विवाह अग्निसोबत देवतांच्या आग्रहावरून संपन्न झाला होता. भगवान श्रीकृष्णाने स्वत: स्वाहाला हे वरदान दिला होतं की, केवळ तिच्याच माध्यमातून देवता हविष्य ग्रहण करू शकतील. त्यामुळेच कोणताही यज्ञ तेव्हा पूर्ण मानला जातो, जेव्हा आवाहन केल्या गेलेल्या देवताना त्यांच्या आवडीचा भोग पोहोचवला जातो. 

तसेच असेही सांगितले जाते की, हवनाचे केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिकही लाभ आहेत. राष्ट्रीय वनस्पती अनुसंधान संस्थेद्वारे करण्यात आलेल्या शोधानुसार, यज्ञ आणि हवनादरम्यान निघणाऱ्या धुरामुळे हवेत असलेले हानिकारक जीवाणू ९५ टक्क्यांपर्यत नष्ट होतात. सोबतच या धुराने वातावरण शुद्ध होतं, ज्यामुळे पसरणारे आजार होण्याचा धोकाही कमी असतो. 

टॅग्स :HinduismहिंदुइझमAdhyatmikआध्यात्मिक