शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

मौनशक्तीची कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 05:48 IST

मौनशक्तीचं बळ ज्यांनी ज्यांनी जाणलं ते बुद्धीने बलवंत ठरलेत. मौनशक्तीची बीजे मनशक्तीतून प्रगटतात. मन हे चंचलपणे उडणाऱ्या पतंगासारखं असतं ...

मौनशक्तीचं बळ ज्यांनी ज्यांनी जाणलं ते बुद्धीने बलवंत ठरलेत. मौनशक्तीची बीजे मनशक्तीतून प्रगटतात. मन हे चंचलपणे उडणाऱ्या पतंगासारखं असतं आणि एखाद्या स्थिर ध्यानस्थ वटवृक्षासारखंही असतं. वृक्ष हे मौन बाळगून असतात म्हणून विशालरूप धारण करीत जातात. त्याची पाळंमुळं खूप खूप खोलवर रुतलेली असतात. वादळवाºयातसुद्धा उन्मळून पडण्याची किंचितही शक्यता नसते.

परंतु चंचल मनाला मात्र फार कष्टातून प्रवास करावा लागतो. मन बुद्धिधर्माचीसुद्धा स्थिरता पूर्णपणे नष्ट करून टाकतो. दिवसातून काही वेळ मनाला शून्यात नेऊन मौनव्रत साध्य करण्याचा प्रयत्न केला तर शरीरात नवचैतन्य प्राप्त होतं. शरीर हे मनबुद्धीचं गुलाम असतं. अनेक आजारांचं मूळ हे मनच असतं. बाभुळीच्या बीजातून बाभुळीचंच रोपटं येणार तसं मनोबीजाचं असतं. जसा विचार असेल तसेच पडसाद शरीराला सोसावे लागतात. चिन्ह बिथरलं की मन सैरावैरा पळत सुटतं. जसा खवळलेला समुद्र किनाºयावरचं सर्व नष्ट करू शकतो तसं उन्मत्त मनाचं लक्षण नष्टतेच्या मार्गावरूनच प्रवास करीत असतं. एखाद्या अट्टल गुन्हेगाराची मनाची अवस्था अभ्यासली तर एकच लक्षात येतं राहतं की त्याच्या मनातूनच वाईट कृत्याची धार वाहत राहते. त्याने सकारात्मक विचार क्षमतेची बाजू गमावलेली असते. बुद्धी एकदा मनाची गुलाम बनली की उभं आयुष्य फरपटत जाण्याची मोठी शक्यता निर्माण होत राहते.

अनेकांना मरेपर्यंत मनाच्या आजारातून बरे होता येत नाही म्हणून ज्या ज्या व्यक्तीने मौनव्रताचं नित्यनेमाने पालन केलं त्यामध्ये कासवाच्या पावलाने का होईना सुधारणा होत राहण्याची शक्यता निर्माण होत राहते. अगदी पुराणातील ग्रंथांमध्येही मौनव्रताच्या लाभाची उदाहरणं आढळतात.विजयराज बोधनकर