शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

मौनशक्तीची कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 05:48 IST

मौनशक्तीचं बळ ज्यांनी ज्यांनी जाणलं ते बुद्धीने बलवंत ठरलेत. मौनशक्तीची बीजे मनशक्तीतून प्रगटतात. मन हे चंचलपणे उडणाऱ्या पतंगासारखं असतं ...

मौनशक्तीचं बळ ज्यांनी ज्यांनी जाणलं ते बुद्धीने बलवंत ठरलेत. मौनशक्तीची बीजे मनशक्तीतून प्रगटतात. मन हे चंचलपणे उडणाऱ्या पतंगासारखं असतं आणि एखाद्या स्थिर ध्यानस्थ वटवृक्षासारखंही असतं. वृक्ष हे मौन बाळगून असतात म्हणून विशालरूप धारण करीत जातात. त्याची पाळंमुळं खूप खूप खोलवर रुतलेली असतात. वादळवाºयातसुद्धा उन्मळून पडण्याची किंचितही शक्यता नसते.

परंतु चंचल मनाला मात्र फार कष्टातून प्रवास करावा लागतो. मन बुद्धिधर्माचीसुद्धा स्थिरता पूर्णपणे नष्ट करून टाकतो. दिवसातून काही वेळ मनाला शून्यात नेऊन मौनव्रत साध्य करण्याचा प्रयत्न केला तर शरीरात नवचैतन्य प्राप्त होतं. शरीर हे मनबुद्धीचं गुलाम असतं. अनेक आजारांचं मूळ हे मनच असतं. बाभुळीच्या बीजातून बाभुळीचंच रोपटं येणार तसं मनोबीजाचं असतं. जसा विचार असेल तसेच पडसाद शरीराला सोसावे लागतात. चिन्ह बिथरलं की मन सैरावैरा पळत सुटतं. जसा खवळलेला समुद्र किनाºयावरचं सर्व नष्ट करू शकतो तसं उन्मत्त मनाचं लक्षण नष्टतेच्या मार्गावरूनच प्रवास करीत असतं. एखाद्या अट्टल गुन्हेगाराची मनाची अवस्था अभ्यासली तर एकच लक्षात येतं राहतं की त्याच्या मनातूनच वाईट कृत्याची धार वाहत राहते. त्याने सकारात्मक विचार क्षमतेची बाजू गमावलेली असते. बुद्धी एकदा मनाची गुलाम बनली की उभं आयुष्य फरपटत जाण्याची मोठी शक्यता निर्माण होत राहते.

अनेकांना मरेपर्यंत मनाच्या आजारातून बरे होता येत नाही म्हणून ज्या ज्या व्यक्तीने मौनव्रताचं नित्यनेमाने पालन केलं त्यामध्ये कासवाच्या पावलाने का होईना सुधारणा होत राहण्याची शक्यता निर्माण होत राहते. अगदी पुराणातील ग्रंथांमध्येही मौनव्रताच्या लाभाची उदाहरणं आढळतात.विजयराज बोधनकर