शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

मौनशक्तीची कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 05:48 IST

मौनशक्तीचं बळ ज्यांनी ज्यांनी जाणलं ते बुद्धीने बलवंत ठरलेत. मौनशक्तीची बीजे मनशक्तीतून प्रगटतात. मन हे चंचलपणे उडणाऱ्या पतंगासारखं असतं ...

मौनशक्तीचं बळ ज्यांनी ज्यांनी जाणलं ते बुद्धीने बलवंत ठरलेत. मौनशक्तीची बीजे मनशक्तीतून प्रगटतात. मन हे चंचलपणे उडणाऱ्या पतंगासारखं असतं आणि एखाद्या स्थिर ध्यानस्थ वटवृक्षासारखंही असतं. वृक्ष हे मौन बाळगून असतात म्हणून विशालरूप धारण करीत जातात. त्याची पाळंमुळं खूप खूप खोलवर रुतलेली असतात. वादळवाºयातसुद्धा उन्मळून पडण्याची किंचितही शक्यता नसते.

परंतु चंचल मनाला मात्र फार कष्टातून प्रवास करावा लागतो. मन बुद्धिधर्माचीसुद्धा स्थिरता पूर्णपणे नष्ट करून टाकतो. दिवसातून काही वेळ मनाला शून्यात नेऊन मौनव्रत साध्य करण्याचा प्रयत्न केला तर शरीरात नवचैतन्य प्राप्त होतं. शरीर हे मनबुद्धीचं गुलाम असतं. अनेक आजारांचं मूळ हे मनच असतं. बाभुळीच्या बीजातून बाभुळीचंच रोपटं येणार तसं मनोबीजाचं असतं. जसा विचार असेल तसेच पडसाद शरीराला सोसावे लागतात. चिन्ह बिथरलं की मन सैरावैरा पळत सुटतं. जसा खवळलेला समुद्र किनाºयावरचं सर्व नष्ट करू शकतो तसं उन्मत्त मनाचं लक्षण नष्टतेच्या मार्गावरूनच प्रवास करीत असतं. एखाद्या अट्टल गुन्हेगाराची मनाची अवस्था अभ्यासली तर एकच लक्षात येतं राहतं की त्याच्या मनातूनच वाईट कृत्याची धार वाहत राहते. त्याने सकारात्मक विचार क्षमतेची बाजू गमावलेली असते. बुद्धी एकदा मनाची गुलाम बनली की उभं आयुष्य फरपटत जाण्याची मोठी शक्यता निर्माण होत राहते.

अनेकांना मरेपर्यंत मनाच्या आजारातून बरे होता येत नाही म्हणून ज्या ज्या व्यक्तीने मौनव्रताचं नित्यनेमाने पालन केलं त्यामध्ये कासवाच्या पावलाने का होईना सुधारणा होत राहण्याची शक्यता निर्माण होत राहते. अगदी पुराणातील ग्रंथांमध्येही मौनव्रताच्या लाभाची उदाहरणं आढळतात.विजयराज बोधनकर