शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

आनंदाचे डोही आनंद तरंग : चंद्रभागेच्या तीरावरून सुरू होते अंतरंग साधना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 11:34 IST

एका तत्त्ववेक्त्याने म्हटले होते, आचारा विचारांची पालखी, खऱ्या अर्थाने पसायदानाच्या पंढरपुरी गेली पाहिजे, त्यामुळे देवालाही समाधान वाटेल.

वारी हा अत्यंत निर्मळ स्वरूपाचा प्रवाह आहे. त्यात वषार्नुवर्षे सहभागी होणारे निष्ठावान वारकऱ्यांचे फड, त्यातील भजनाची दिव्य परंपरा ही रोमांचाचे रान उभे करणारी आहे. महाराष्ट्रातील सकल संतांनी आम्हाला वारी काय आहे, हे शिकविले आहे. संत-देव आणि भक्त असा भावभक्तीचा सोहळा अनुभवण्यास मिळतो. वारीत हा वेगळा भक्तिभाव दिसून येतो.खरे तर आपली जीवनाची वारी जाऊ नये, यासाठी संतसंगतीत वारी करणे गरजेचे आहे. संत तुकाराममहाराजांचे उद्गार आहेत,ते या पंढरीशी घडे, खळा पाझर रोकडे, नेत्री अश्रूच्या धारा, कोठे रोमांच शरीरा, तुका म्हणे कोठे वेचिला अभेद्याचा काला.. असा अद्वैताचा सोहळा आहे. पंढरी समीप असणाऱ्या वाखरीवर संतांच्या सर्व दिंड्या एकत्र येतात. तिथे महासमन्वय घडतो. संतांचा मेळा जमतो आणि पुढे पंढरीकडे वाटचाल होते. पुढे देवाचाही रथ पुढे येतो. संतांची आणि देवाची भेट होते. बघा, ही काय भावरम्यता आहे. वारकरी जेव्हा पंढरीत प्रवेश करतात त्या वेळी त्यांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू येतात. याविषयीचा एक सुंदर अभंग संत तुकाराम महाराजांनी लिहिला आहे. तुकोबांच्या अभंगानुसार, पावलो पंढरी, क्षमा लिंगणी, संत या सज्जनी निवविलो, पावलो पंढरी पार नाही सुखा, भेटला हा सखा मायबाप, पावलो पंढरी, आपुले माहेर, नाही संसार तुका म्हणे... अशा स्वरूपाचा एक कृतार्थतेचा भाव या सोहळ्यात असतो. खरे तर वारीत पोहोचले म्हणजे संपले नाही. तर चंद्रभागेस्नान, विधीवत हरिकथा आहे. हरिकथा श्रवण आणि चिंतनही केले जाते. येथूनच चंद्रभागातीरावरून अंतरंग साधना सुरू होते. वारीत एका झेंड्याखाली आपण सर्व जण एकत्र येतो. त्यातील भक्तिभाव आणि भावरम्यता ही अद्भुतच आणि अलौकिक आहे. या विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला... तेथं सुद्धा एका तत्त्ववेक्त्याने म्हटले होते, आचारा विचारांची पालखी, खऱ्या अर्थाने पसायदानाच्या पंढरपुरी गेली पाहिजे, त्यामुळे देवालाही समाधान वाटेल. खरे तर असा एक आधुनिक अर्थ आपण काढायला हरकत नाही. आज वारीत काळानुरूप बदल होत आहेत. स्वच्छतेच्या आरोग्याच्या अनुषंगाने चांगले काम होत आहे. वारकरी जीवनही सजग आणि जागे झालेले आहे. निर्मळवारी, पवित्र वारी असाही बदल होत आहे. हा बदल अमूलाग्र आहे.

आनंदाचे डोही आनंद तरंग

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकPandharpur Wariपंढरपूर वारी