शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

आनंदाचे डोही आनंद तरंग : चंद्रभागेच्या तीरावरून सुरू होते अंतरंग साधना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 11:34 IST

एका तत्त्ववेक्त्याने म्हटले होते, आचारा विचारांची पालखी, खऱ्या अर्थाने पसायदानाच्या पंढरपुरी गेली पाहिजे, त्यामुळे देवालाही समाधान वाटेल.

वारी हा अत्यंत निर्मळ स्वरूपाचा प्रवाह आहे. त्यात वषार्नुवर्षे सहभागी होणारे निष्ठावान वारकऱ्यांचे फड, त्यातील भजनाची दिव्य परंपरा ही रोमांचाचे रान उभे करणारी आहे. महाराष्ट्रातील सकल संतांनी आम्हाला वारी काय आहे, हे शिकविले आहे. संत-देव आणि भक्त असा भावभक्तीचा सोहळा अनुभवण्यास मिळतो. वारीत हा वेगळा भक्तिभाव दिसून येतो.खरे तर आपली जीवनाची वारी जाऊ नये, यासाठी संतसंगतीत वारी करणे गरजेचे आहे. संत तुकाराममहाराजांचे उद्गार आहेत,ते या पंढरीशी घडे, खळा पाझर रोकडे, नेत्री अश्रूच्या धारा, कोठे रोमांच शरीरा, तुका म्हणे कोठे वेचिला अभेद्याचा काला.. असा अद्वैताचा सोहळा आहे. पंढरी समीप असणाऱ्या वाखरीवर संतांच्या सर्व दिंड्या एकत्र येतात. तिथे महासमन्वय घडतो. संतांचा मेळा जमतो आणि पुढे पंढरीकडे वाटचाल होते. पुढे देवाचाही रथ पुढे येतो. संतांची आणि देवाची भेट होते. बघा, ही काय भावरम्यता आहे. वारकरी जेव्हा पंढरीत प्रवेश करतात त्या वेळी त्यांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू येतात. याविषयीचा एक सुंदर अभंग संत तुकाराम महाराजांनी लिहिला आहे. तुकोबांच्या अभंगानुसार, पावलो पंढरी, क्षमा लिंगणी, संत या सज्जनी निवविलो, पावलो पंढरी पार नाही सुखा, भेटला हा सखा मायबाप, पावलो पंढरी, आपुले माहेर, नाही संसार तुका म्हणे... अशा स्वरूपाचा एक कृतार्थतेचा भाव या सोहळ्यात असतो. खरे तर वारीत पोहोचले म्हणजे संपले नाही. तर चंद्रभागेस्नान, विधीवत हरिकथा आहे. हरिकथा श्रवण आणि चिंतनही केले जाते. येथूनच चंद्रभागातीरावरून अंतरंग साधना सुरू होते. वारीत एका झेंड्याखाली आपण सर्व जण एकत्र येतो. त्यातील भक्तिभाव आणि भावरम्यता ही अद्भुतच आणि अलौकिक आहे. या विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला... तेथं सुद्धा एका तत्त्ववेक्त्याने म्हटले होते, आचारा विचारांची पालखी, खऱ्या अर्थाने पसायदानाच्या पंढरपुरी गेली पाहिजे, त्यामुळे देवालाही समाधान वाटेल. खरे तर असा एक आधुनिक अर्थ आपण काढायला हरकत नाही. आज वारीत काळानुरूप बदल होत आहेत. स्वच्छतेच्या आरोग्याच्या अनुषंगाने चांगले काम होत आहे. वारकरी जीवनही सजग आणि जागे झालेले आहे. निर्मळवारी, पवित्र वारी असाही बदल होत आहे. हा बदल अमूलाग्र आहे.

आनंदाचे डोही आनंद तरंग

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकPandharpur Wariपंढरपूर वारी