शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

अध्यात्म - पूर्वोत्तर क्षण दुर्लभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 05:32 IST

विवेकी पुरुष क्षण वाया जाऊ देत नाही. क्षणाची खरी किंमत धावपटूला विचारा तो सांगेल, फक्त एकाच क्षणात जय किंवा पराजय मिळत असतो.

 - बा. भो. शास्त्रीश्रीचक्रधर स्वामी म्हणतात, ‘‘जीव क्षणा एकामाजी ते एक आपजवी आपणयासी जे जन्माचा हस्त्री निस्तरो न सरे.’’ विवेकी पुरुष क्षण वाया जाऊ देत नाही. क्षणाची खरी किंमत धावपटूला विचारा तो सांगेल, फक्त एकाच क्षणात जय किंवा पराजय मिळत असतो. निडणुकीत एकाच मताने विजय किंवा पराजय होतो. जन्माचा क्षण आठवत नाही. मृत्यूचा क्षण आवडत नाही. मधला क्षण सापडत नाही. त्याच क्षणाचा विचार संत तुकोबा करायला सांगतात.‘क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू’एकच ठिणगी जंगलाला आग लावते. पण तेव्हाच तिच्यावर एकच पाण्याचा थेंब पडला तर ठिणगी विझते व जंगल वाचतं. प्रत्येकाच्या जीवनात चांगले क्षण येतात व जातात. थांबत नाहीत. परतही येत नाहीत. ते वेचावे लागतात. पचवावे लागतात. जगावे लागतात. कणाकणाने संघटित झालेल्या दगडाच्या पायावर इमारत उभी राहते. एकवटलेल्या निश्चल क्षणावर शाश्वत मुक्ती आपली वाट पाहत असते. ज्ञानेश्वरीत एक गोड ओवी आहे.‘‘ते एकवटूनी जियेक्षणीअनुसरलेगा माझिये वाहानीतेव्हाचि तयांची चिंतवनीमजची पडली’’स्वामींनी या सूत्रातून अखंड प्रेमाचा सल्ला दिला आहे. संसाराचा आरंभ चांगलाच आहे. पण शेवट करता आला पाहिजे. मंदिर बांधणं सोपं आहे. पण पावित्र्य टिकवणं महत्त्वाचं आहे. मी व्यसन सोडणार हा संकल्प चांगला, पण सिद्धीला नेता आला पाहिजे. सर्वांच्याच जीवनात चांगल्या सद्भावना कधी कधी निर्माण होतच असतात. त्यांना निश्चयाचं बळ नाही मिळालं तर त्या विरून जातात, मिळालं तर त्या मजबूत होतात.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक