शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

अध्यात्म; हरिमुरत देखी तिन तैसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 12:26 IST

नामस्मरण मोठे नाही आणि लहान नाही. मोठे आहे जागृत राहून, मन स्थिर करून पवित्र श्रद्धेने करणे. मग तुमच्या आवडीचे कोणतेही नाम असो. ते एकाच अर्थी असते.

-तुकड्यादास

नागपूर: प्रिय मित्र -आपण विचारले की नामस्मरणातच सर्व काही आहे असे संत म्हणतात, तेव्हा कोणते नाम सर्वात मोठे व ते किती वेळ जपावे म्हणजे आत्म्याला शांती व मोक्षसुख मिळेल? मित्रा ! नामस्मरण मोठे नाही आणि लहान नाही. मोठे आहे जागृत राहून, मन स्थिर करून पवित्र श्रद्धेने करणे. मग तुमच्या आवडीचे कोणतेही नाम असो. ते एकाच अर्थी असते. उगीच नामानामात भेद पाडून जे त्यात लहान मोठेपण निर्माण करतात, हे सर्व पंथमार्गी लोक आहेत. मी त्यांना असा सवाल करतो की, तुम्ही सांगितलेल्या मोठ्या नावानेही किती लोक इमानदार व व्यवहारशुद्ध झाले आहेत? त्यांना तरी साक्षात्कार झाला आहे का ? याचे उत्तर तुम्ही असे द्याल की.‘जाकी रही भावना जैसी,हरिमुरत देखी तिन तैसी’असे जर आहे तर मग भावना, चारित्र्य, स्थिरता हेच महत्त्वाचे आहे असे का नाही सांगत ? असे मी पंथवादी लोकांना म्हणत असतो.मित्रा, म्हणून माझे तुला सांगणे आहे की नामस्मरण हे आपल्यासमोर दिव्य पुरुषांचे चरित्र नेहमी उभे रहावे याचे द्योतक आहे. मनुष्य जसजसा भावना धरून जपतो तसतसा तो त्या चारित्र्याला प्राप्त होतो. अंती त्या महापुरुषाचे रूप बनतो. जसे संत तुकोबा म्हणतात.‘तुका म्हणजे अळी । झाली भिंगोटी सगळी’याचे कारण जसे निदिध्यास आहे तसेच जपाचेही कारण निदिध्यासानेच पूर्ण होते व स्मरण करणाराला चिरंतन शांती मिळते. तो जेव्हा तनाने, मनाने त्या नामस्मरणरूपी ध्येयाला समर्पण होतो तेव्हा त्याच्या दैहिक वासना नामस्मरणात विलीन होतात. ही संधी उपासकाला मिळते. तेव्हा अनेक सिद्धी त्याला आडव्या येतात. अनेक कामिक भक्त त्याला त्रास देतात. त्याच्या पुढे अनेक लोकेषणांचे राक्षस उभे राहतात. जर का तो त्यात भुलला व महत्त्वाचे संधान त्याने सोडले की त्या नामस्मरण करणाराचे पतन होते व नको असेल तीच दिशा त्याला लागते आणि भोगप्रवृत्ती होऊ लागते. असे होऊ नये म्हणून वैराग्य, ज्ञान याची संगती नामस्मरण करणाराला मिळाली तरच त्याची नाव पार होते.मित्रा ! पण जर का हा दैहक सुखाकरिता, लोक-प्रतिष्ठेकरिता, राजसत्तेकरिता आपल्याला या नामस्मरणाचा लाभ व्हावा असे मनात चिंतत असेल तर तेही सुख प्राप्त होणे स्वाभाविक आहे. पण गंगेवर स्नानाला जाणारा माणूस जसा डबक्यात स्नान करून यावा, अमृताकडे जाणारा माणूस जसा दारूकडे वळावा तशी या नाम घेणाऱ्याची गती होते. शेवटी ते नामस्मरण उद्देशहीन रूप धारण करते व त्याने जीवाची हानी होते. तेव्हा नाम कोणते घ्यावे, याचे उत्तर आवडेल ते घ्यावे, पंथ कोणता असावा याचे उत्तर आवडेल तो, आपल्या बुद्धीला पटेल तो. पण तत्त्व मात्र एकच असते. ते साधण्याची साधना ‘मने, कायावाचे-उच्चारावे नाम’ ही असावी.याला संसार सोडावा लागत नाही. पण अनायसेच त्याच्या बुद्धीत फरक पडल्यामुळे संसारातील सार त्याला मिळतो आणि मग तो आत्मशांतीला व मोक्षाला पात्र असतो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक