शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

जीवन जगण्यासाठी मनाचाच आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 09:04 IST

माणसाने मनाचे मानस शोधण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. अजूनपर्यंत करतात. आध्यात्मिक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींनी केला.

माणसाने मनाचे मानस शोधण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. अजूनपर्यंत करतात. आध्यात्मिक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींनी केला. परंतु मनाचा मुख्य ठावठिकाणा कुणालातरी सापडला का, हा प्रश्न नेहमी आपल्या मनात घोळत राहतो. आपल्याला उगीचच मनाचे कंगोरे शोधण्याची सवय असते. आपल्या भाव-भावना, वासना, स्मृती, कल्पना, बुद्धी, जाणिवा यांच्याद्वारे आपण मनाचा विचार करतो. आपण एखाद्याच्या कृतीतून त्याच्या मनाची कल्पना करतो. त्याचे मन चांगले की वाईट, त्याच्या भावना काय असतील, त्याची आंतरिक शक्ती काय असेल, ही सर्व कल्पना मनावर आधारित असते. एखादी कृती जशी घडते तसा माणूस माणसाचे निरीक्षण करतो. ते निरीक्षण करण्यासाठी मनाचीच तर आवश्यकता असते. मनाची उजळणी आंतरिक चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाची असते.

एखाद्या व्यक्तीने मानसिक टेन्शन घेतले. तो सतत त्याच विचारात राहातो. तर आपण त्याला मनोरुग्ण असे म्हणतो. मनोरुग्ण म्हणजे त्याच्या मनात सतत त्याच गोष्टींचा विचार येतो. मनोवैज्ञानिकांनीसुद्धा मनोरुग्णाला समजून त्यावर उपाय सांगायची पद्धती अवलंबिली आहे. समजा, एखाद्याला भुतांनी झपाटले म्हणजे काय- तो सतत त्या भुतांनी झपाटल्याचीच कल्पना करतो. भूत हीच मुळात भयावह कल्पना वाटते. मनाच्या कल्पना अनेक आहेत. कोणत्याही गोष्टीचा प्रथमत: मनावर प्रभाव पडतो अन् मग ते मन त्यात गुंतत असते. कारण सर्वांच्या मनात भूत नावाची कल्पना घट्ट होऊन जाते. मग त्याच्या मानसिकतेत सतत त्याचाच विचार येतो. जीवन जगताना मनाचाच आधार घ्यावा लागतो. त्या मनाला तुम्ही काहीपण समजा पण ते आहे. त्यानुसारच ह्या सृष्टीचा खेळ चालला आहे. सृष्टीचे भवितव्य हे मनाशी किंवा दैवीमानवावरच अवलंबून आहे.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष) 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक