शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जीवन जगण्यासाठी मनाचाच आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 09:04 IST

माणसाने मनाचे मानस शोधण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. अजूनपर्यंत करतात. आध्यात्मिक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींनी केला.

माणसाने मनाचे मानस शोधण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. अजूनपर्यंत करतात. आध्यात्मिक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींनी केला. परंतु मनाचा मुख्य ठावठिकाणा कुणालातरी सापडला का, हा प्रश्न नेहमी आपल्या मनात घोळत राहतो. आपल्याला उगीचच मनाचे कंगोरे शोधण्याची सवय असते. आपल्या भाव-भावना, वासना, स्मृती, कल्पना, बुद्धी, जाणिवा यांच्याद्वारे आपण मनाचा विचार करतो. आपण एखाद्याच्या कृतीतून त्याच्या मनाची कल्पना करतो. त्याचे मन चांगले की वाईट, त्याच्या भावना काय असतील, त्याची आंतरिक शक्ती काय असेल, ही सर्व कल्पना मनावर आधारित असते. एखादी कृती जशी घडते तसा माणूस माणसाचे निरीक्षण करतो. ते निरीक्षण करण्यासाठी मनाचीच तर आवश्यकता असते. मनाची उजळणी आंतरिक चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाची असते.

एखाद्या व्यक्तीने मानसिक टेन्शन घेतले. तो सतत त्याच विचारात राहातो. तर आपण त्याला मनोरुग्ण असे म्हणतो. मनोरुग्ण म्हणजे त्याच्या मनात सतत त्याच गोष्टींचा विचार येतो. मनोवैज्ञानिकांनीसुद्धा मनोरुग्णाला समजून त्यावर उपाय सांगायची पद्धती अवलंबिली आहे. समजा, एखाद्याला भुतांनी झपाटले म्हणजे काय- तो सतत त्या भुतांनी झपाटल्याचीच कल्पना करतो. भूत हीच मुळात भयावह कल्पना वाटते. मनाच्या कल्पना अनेक आहेत. कोणत्याही गोष्टीचा प्रथमत: मनावर प्रभाव पडतो अन् मग ते मन त्यात गुंतत असते. कारण सर्वांच्या मनात भूत नावाची कल्पना घट्ट होऊन जाते. मग त्याच्या मानसिकतेत सतत त्याचाच विचार येतो. जीवन जगताना मनाचाच आधार घ्यावा लागतो. त्या मनाला तुम्ही काहीपण समजा पण ते आहे. त्यानुसारच ह्या सृष्टीचा खेळ चालला आहे. सृष्टीचे भवितव्य हे मनाशी किंवा दैवीमानवावरच अवलंबून आहे.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष) 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक