शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

एखाद्या घटनेशी पायगुणाचा संबंध असतो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 12:30 IST

आपण जरी जीवन ज्ञान (ब्रह्मज्ञान नसलं तरी चालेल) स्वत: जगलो तर आपल्या अंत:करणाच्या कोरड्या पाषणातून आनंदाचे चिरंतन झरे वाहू लागतील, वाहत राहतील. 

रमेश सप्रे

ते कुटुंब आपण ज्याला खाऊन-पिऊन सुखी म्हणतो तसं होतं. इथं लक्षात ठेवायला हवं ते कुटुंब ‘सुखी’ होतं. समाधानी किंवा आनंदी नव्हतं. आजकाल दोन हजार पगार मिळवणारी अनेक कुटुंबे अशी खाऊन पिऊन सुखी असतात. काही कुटुंबं तर अति खाऊन-पिऊन दु:खी, रोगीही बनतात. 

तर त्या कुटुंबातील दोन्हीही मुलं लग्नाची झाली होती. त्यांची वयंही वाढली होती. कुणी विचारलं तर आई वडील उत्तर देत, ‘योग असावा लागतो, जी गोष्ट जेव्हा, जशी, जिथं घडणार ती तेव्हा तिथं तशीच घडणार, प्रारब्धापुढे कुणाचंही चालत नाही. शेवटी नियती अटळ असते असं म्हणतात तेच खरं’ हे सारं, तत्त्वज्ञान त्या मुलांचे आईवडील लग्नाचा विषय निघाला की सर्वाना सांगायचे. इतक्या तळमळीनं की कुणालाही त्यांच्या प्रारब्ध नियतीवर अढळ विश्वासाबद्दल आदर वाटे. 

अखेर त्या दोघांचीही लग्नं ठरली. मुली अनुरूप होत्या. सोय, व्यवस्था यांचा विचार करून दोन्ही लग्नांमध्ये दोन-अडीच महिने अंतर ठेवलं. घरातील सर्व सुखाच्या शिखरावर होती. आनंदात होती कारण ही त्यांची खुशी ‘मुलांची लग्नं ठरणं’ या रेंगाळलेल्या गोष्टीवर अवलंबून होती. अन् आनंद हा निरालंब म्हणजे कशावरही अगदी कशावरही अवलंबून नसतो. काहीही मनासारखं घडलं किंवा मनाविरुद्ध घडलं तर आपल्याला आनंदात सहज राहता येतं. साधू संत सत्पुरूष सद्गुरु अशा अवस्थेत कायम असतात. 

तर जय्यत तयारी नि भव्य उत्सवी समारंभात मोठ्या मुलाचं लग्न ठरलं. नववधू उंबऱ्यावर ठेवलेलं तांदूळाचं (धनधान्याचं) माप ओलांडून येते. तिच्या गृहप्रवेशामुळे विवाहविधी-सप्तपदी झाल्यावर सर्वांना झालेल्या सुखाचा कळस गाठला गेला होता. त्यांचा संसार त्यांच्या प्रारब्धानुसार सुरूच होता. दुसरे दिवशी कळलं की कोट्यवधी रुपयांच्या जमिनीच्या मालकीच्या खटल्याचा अंतिम निकाल पुढच्या आठवड्यात आहे. तो जर या कुटुंबाच्या बाजूनं लागला तर त्यांची पिढ्यानपिढ्यांची ददात मिटली असती. 

अपेक्षाप्रमाणे निकाल लागला. सर्वांनी दिवाळी साजरी केली. घरातल्या आजीबाई म्हणाल्या, ‘हा सारा नव्या नवरीचा पायगुण बरं का?’

याला विरोध कुणीच केला नाही. कारण सर्वाचं अगदी नव्या नवरीचं सुद्धा तसंच मत होतं. सर्वत्र खुशीचं, उत्सवाचं वातावरण होतं. 

काळाच्या ओघात लहान मुलाचंही लग्न झालं. मुलगी अनुरूप होतीच; पण मोठ्या सुनेपेक्षा अधिक कार्यकुशल व सद्गुणीही होती. तिनंही उंबऱ्यावरच धान्याचं माप ओलांडून प्रवेश केला. ती तिच्या मनमिळावू, सेवाभावी स्वभावामुळे सर्वांना प्रिय झाली. काही दिवसांनी तीर्थ क्षेत्राला जाताना पितृवत्सल सासऱ्यांचं निधन झालं नि सासुबाईंना पक्षाघाताचा झटका (पॅरॅलिटिक अटॅक) आला. त्या पूर्णपणे परावलंबी बनल्या. पहिले काही दिवस शोक समाचारात, मृत्यूनंतरच्या क्रियाकर्मात गेले. नंतर काही दिवसांनी कुजबुज सुरू झाली. ‘लहान सुनेचा पायगुणच अशुभ!’ 

दोन्ही घटनांचा विचार एकत्र केला तर काय आढळून येतं? 

पहिलीचा पायगुण शुभ कारण खटल्याचा निकाल कुटुंबाच्या बाजूने लागला. यात तिचं काय कर्तृत्व होतं? सर्व तारखा वाद-प्रतिवाद-युक्तिवाद (आर्ग्युमेंट्स ) सारं ती घरात सून म्हणून येण्यापूर्वीच संपलं होतं. निकाल लागला तो अनुकूल होता एवढंच. तसंच दुसरी सून ज्या यात्रा कंपनीबरोबर सासूसासरे तीर्थ क्षेत्रांच्या यात्रेला निघाले होते ती बस काही ती धाकटी सून चालवत नव्हती. घरातली दोघंच जण गेले होते. जी बस दरीत कोसळून इतरही अनेक लोक मृत्यू पावले त्यालाही जबाबदार सुनेचा अशुभ पायगुणच?

ज्याचं त्याचं प्रारब्ध, नियतीनुसार सर्व घटना घडतात तर तिथं ‘पायगुण’ हा घटकच कोठून आला? 

आपल्या सर्वांची हीच चूक होते. जे, ज्यावेळी, जिथं, ज्याप्रकारे घडणार असतं ते त्यावेळी तिथं, तशाच प्रकारे घडणार असतं. प्रत्येकावर सामूहिक शुभ-अशुभ घटनांचे परिणाम वेगवेगळे असतात. हेच पाहा ना? त्या अपघातात सासरेबुवा मरणारच होते नि सासूबाई वाचल्या होत्या; पण परावलंबी बनून. त्यांनी खरं तर इतरांना प्रारब्ध नियतीचा सिद्धांत समजून सांगायला हवा होता. लहान सुनेचा काहीही दोष सोडा, साधा संबंधही त्या अपघाताशी नाही तर तिला बिचारीला का दोषी, अवलक्षणी, समजायचं? जीवनातील शुभाशुभ, चांगल्या वाईट घटनांचा असा विचार नि स्वीकार थोडे जण करतात. फारच थोडे. सासूबाईंनी ज्यावेळी ‘सुनेचा अशुभ पायगुण’ असं म्हटलं तेव्हा इतरांना तसं म्हणण्याचा परवानाच मिळाला. विचार करू या. आपण अशा परिस्थितीत काय केलं असतं? सासूबाई व इतर अनेकांसारखंच आपलं ‘सुनेचा अपशकुनी पायगुण’ हेच मत असेल तर अशा सा-यांसाठी मराठीत एक अप्रतिम म्हण आहे. ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण स्वत: कोरडा पाषाण’ 

आपण जरी जीवन ज्ञान (ब्रह्मज्ञान नसलं तरी चालेल) स्वत: जगलो तर आपल्या अंत:करणाच्या कोरड्या पाषणातून आनंदाचे चिरंतन झरे वाहू लागतील, वाहत राहतील. 

टॅग्स :marriageलग्नAdhyatmikआध्यात्मिक