शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Spiritual  : भाव हा भक्तीचा प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 13:21 IST

जे जे जगात आहे ते ते मला मिळाले पाहिजे ह्यासाठी लागणारा पैसा मिळवणे प्राप्त म्हणून ते मिळविण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करणे असाच प्रकार सर्वत्र चालत आला आहे.

आज आपणास जगात काय दिसते आहे? समाधान नष्ट झालय. माणूस हा सर्वार्थाने आर्थिक स्पर्धेत ओढल्या गेला आहे. जे जे जगात आहे ते ते मला मिळाले पाहिजे ह्यासाठी लागणारा पैसा मिळवणे प्राप्त म्हणून ते मिळविण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करणे असाच प्रकार सर्वत्र चालत आला आहे. हव्यास, लोभ सुखलोलुपतेचा थयथयाट होत आहे. मानसिक क्रूरता वाढली आणि सदाचार, सद्गुणांची सातत्याने गळचेपी होत आहे. सामाजिक बैठक आपण अर्थप्रधान केली आहे. ह्या जगाचा पालनकर्ता कोणीतरी आहे आणि आपण केलेल्या कर्माचा जाब आपणास त्याचे जवळ द्यायचा आहे हे त्रिवार सत्य आम्ही विसरत आहो. पैशासाठी जग वेडे होवून गेल्याने आलिक समाधान न मिळता, जीवनात अनेक समस्या आम्ही निर्माण केल्या आहेत.संतजनाच्या मानदियाळीने आम्हाला वेळोवेळी जाणीव करुन दिली आहे. संत म्हणतात- ‘अजुनी तरी होई जागा। तुका म्हणे पुढे दगा। आपल्या संकटकाळी देवाने धावावे असे वाटत असेल तर, त्याला आपण अगोदर ऋणी करुन ठेवले पाहिजे. ह्या आजच्या वास्तव परिस्थितीतून कल्याण होण्यासाठी आपण तप केले पाहिजे. तपाने पत वाढते. तपाने देवर्षी होता येते. सर्व पापाचे भस्म होवून जाते. नामसंकिर्तनासारखे दुसरे प्रभावी साधन ह्या कलियुगात नाही. प्रभु नामसंकिर्तन हे कर्मात्मक साधन नसून ते भावात्मक साधन आहे.भाव तोची देव, भाव तोची देव ।ये अर्थी संदेह धरु नका।आपली सर्व कर्मे शुद्ध असावी. मन ज्ञानप्रकाशाने उजळून निघावे अशी अंतर्बाह्य शुद्धता जीवनात यायला हवी. जगाचा सुसूत्र कारभार ज्याच्यामुळे बिनचूक चालला आहे त्या जगतचालकाची भावयुक्त भक्ती नसेल तर माणूस हा पतीत होईल.अर्जुना मोझे ठायी। आपणे विण सौरसु नाही।मी उपचारे कवणाही। नाकळेगा।देव हा भावाचा भुकेला आहे. द्रव्याचा नाही. एक विचारवंत म्हणतात-God is Concerned with not what you give,but with how you giveदेवाला तुम्ही काय देता याला महत्व नसून, कोणत्या भावनेने देता याला महत्व आहे. भक्तीने जे साधते ते ज्ञान-कर्माने साधत नाही. भक्तीमध्ये अर्पण करण्याची भावना असते आणि त्या भावनेतच खरी शक्ती असते. ळङ्म३ं’ २४१ील्लीि१ संपूर्ण शरणागती ही जीवन तरुन जाण्याची गुरुकिल्ली आहे ह्याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.यशोदा माता दोरी घेवून कृष्णाला बांधण्यास धावली. त्याप्रमाणे कर्माची दोरी घेवून आपण परमेश्वरास बांधण्यास धावलो तर तो आपल्या हातात सापडणार नाही. आपण त्याला ज्ञानाच्या उखळीला बांधले तर तो ती उखळीच घेवून जाईल. मोठेमोठे वृक्षसुद्धा उन्मळून पडतील. यशोदेने ज्याप्रमाणे भक्तीमुक्त भावनेने गोपालकृष्णाचा धावा केला आणि तो श्यामसुंदर तिच्या हातात सापडला तोच भाव, तीच शरणागत वृत्ती जीवनात असावी म्हणजे प्रभुची मंगलमय कृपा आपल्यावर होईल. हरिपाठात माउलींनी अशाच दोन भक्तांचा संदर्भ दिला आहे. ‘सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला। उद्धवा लाधला कृष्णदाता।।फलाची अपेक्षा न करता कर्तव्य कर्म करावे. केलेले कर्म देवाला अर्पण करावे हाच कर्मयोग स्पष्ट करुन, भगवंत गीतेचे स्पष्ट करतात की, अहंकार गळून पडणे, फलाची आसक्ती नसणे आणि देवाला शरण जाणे ही कर्मे म्हणजेच ईश्वराची आराधना आहे. म्हणून आपणही संतसंदेह लक्ष्यात असू द्यावा- ‘भाव धरारे। आपुलासा देव करारे।।- ह.भ.प. डॉ. ज्ञानेश्वर मिरगे 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAkolaअकोला