शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

आत्मा माउली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 23:59 IST

पालखी सोहळ्यामध्ये प्रत्येक वारकरी अखंड माउलीचा जयघोष करीत असतो. तो फक्त जयघोषच करीत नसतो, तर पालखीतल्या प्रत्येकाला तो माउली म्हणूनच बोलावत असतो.

इंद्रजित देशमुखपालखी सोहळ्यामध्ये प्रत्येक वारकरी अखंड माउलीचा जयघोष करीत असतो. तो फक्त जयघोषच करीत नसतो, तर पालखीतल्या प्रत्येकाला तो माउली म्हणूनच बोलावत असतो. माउली ही आईला मारलेली अत्यंत प्रेमळ अशी हाक आहे. सकल संत प्रत्येक जिवामध्ये ईश्वराचा अंश पाहत असतात. आई, माउली हे प्रेम जगातले सर्वांत निरपेक्ष आणि व्यापक असे प्रेम आहे. पायी चालत असताना सात्त्विकता जी दाटून येते. विशाल हृदय जी प्रेमाने हाक मारते त्यातले मार्दव वारीमध्ये काही ओढ लावणारे असते. सर्व संतांनी विठुरायाला माउली म्हटलंय, तर साधकांनी संतांना माउली म्हटलंय, तर अवघा पालखी सोहळा एकमेकांना माउलीमय संबोधून लेकुरवाळ्या विठ्ठलाच्या प्रेम मायेचा प्रत्यय करून देतात.कित्येकजण आपल्या उपास्याला पिता मानतात, पती मानतात, कोणी स्वामी मानतात, कोणी सखा मानतात, कोणी प्रियकर मानतात. भागवत धर्माला ज्ञानाची बैठक प्राप्त करून देणारे ज्ञानदेव मात्र प्रियतेची अखेरची सीमा असलेली ‘आत्मा’ माउली असे म्हणतात.‘तेथ प्रियाची पैैल सीमा । तो भेटे माउली आत्मा ।।तियें क्षेवी आटे डिंडिमा । संसारिक हे ।।संतांना माउली हा शब्द अतिशय प्रिय आहे. कारण माउली ही ‘निष्कपट माय’ असते. ती लेकरांच्यात भेद करीत नाही. ‘जाने-ताने’ म्हणजे जाणते-नेणते असा भेद करत नाही. सर्वांवर समान प्रेम करते. संसारिकांनासुद्धा जवळीक देऊन खांद्यावर घेऊन चालणारे संत आणि विठ्ठल असतात कसे तर माउली म्हणतात, ‘तू संसार श्रोतांची साउली अन् अनाथांची माउली’ असून खरोखर तुझीच कृपा आम्हावर प्रसवली आहे. संत आणि विठ्ठल आपल्या लेकराला पोसण्यासाठी ‘जिव्हारीची गाठी’ सोडून आपल्या हृदयीचे अमृत पाजत असतात. जेणेकरून लेकरू पुष्ट होईल आणि आनंदाने तृप्त होऊन नाचू लागेल.संत नामदेवरायांचे अभंग तर बालभावाने ओतप्रेत भरलेले आहेत. त्यांच्या वाणीने पांडुरंगाला प्रभावित केले आहे. पांडुरंग नामदेवरायांची आई बनून सारा कठोरपणा सोडून आई बनून भक्ताकडे झेपावते आहे.तू माझी माउली, मी तो तुझा तान्हा ।पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे ।।इतक्या आर्ततेने संत नामदेवरायांनी त्या विठाईला हाक दिल्यावर तिचे अतृप्त वात्सल्य या लेकरावर मायेचा वर्षाव करता राहील काय? नामदेव महाराज माय लेकराची अनेक रूपके आम्हासमोर उभी करतात. माउली आणि तिचा तान्हा, हरिणी अन् तिचे पाडस, पक्षिणी आणि तिचे पिलू, गोठ्यात बांधलेल्या वासराची माउलीच्या भेटीसाठी सैरभैर झालेली दृष्टी. घरट्यात पक्षिणीच्या पंखाच्या उबेसाठी अन् तिच्या चोचीतल्या चाऱ्यासाठी आसुसलेल्या पिलांची ती आर्त चिवचिव आणि वनात चुकलेल्या हरिणीचा माग काढत निघालेल्या पाडसाची आगतिक तडफड ही वात्सल्याच्या नात्याची आर्तता भक्त आणि उपास्य पांडुरंग यांच्यामध्ये आणून भक्तीला परमप्रेमरूपाचे आयाम बहाल केले आहेत.या वारीमध्ये चालताना एकच आस आहे ती विठाई दर्शनाची. या आईच्या भेटीची ओढ पसरत राहावी म्हणून माउली माउलीचा जप करत हा थवा विठाईच्या घरट्याकडे रवाना होतो आहे. संत नामदेवराय म्हणतात -‘पक्षिणी प्रभाती चारियासी जाये।पिलू वाट पाहे उपवासी।।तैसे माझे मन करी वो तुझी आस।चरण रात्रंदिवस चिंतीतसे।।’पक्षिणी सकाळीच चारा आणण्यासाठी गेलीय. आणि पिलू दिवसभर इकडे वाट पाहत आहे. पक्षिणीला तिचे पंख आहेत. त्याच्यात बळ आहे. ती समर्थ आहे; पण तिचे पिलू दुबळे आहे. तिच्या पंखात ताकद नाही. त्यामुळे ते अवघडलेले आहे. ते तिला शोधू शकत नाही. तिने त्याच्या ओढीने परतायला हवे. ती चाºयासाठी गेलीय आणि ते उपवासी आहे. त्याची भूक तिनेच जाणायला हवी. घरट्यात दिवसभर वाट पाहणाºया या उपवासी पिलाच्या आगतिकतेचे स्मरण तिला असायला हवे. असे संबोधन करून विठाई माउलीचे लक्ष खेचण्याचा ते प्रयत्न करीत आहेत.संत एकनाथ महाराजांना तर वैष्णवजन हेच आईच्या रूपात दिसतात. त्यांच्या साहित्यातली आई तर अशी आहे की, मत्स्य असेल तर मत्स्याई, कच्छ असेल तर कच्छाई, वराह असेल तर वराही. श्रीकृष्ण असेल तर कृष्णाई या हाकेने हाकारतात.तुकोबाराय आपल्या वत्सल विठाईला संबोधताना म्हणतात -‘पदियंते आम्ही तुजपाशी मागावे।जिवीचे सांगावे हितगुज।।पाळशील लळे दीन वो वत्सले ।विठ्ठले कृपावे जननिये ।।अशा तºहेने मराठी संत परंपरा विठ्ठलाला मातृरूपाने आळवित आहे आणि या वत्सल माउलीचे स्तन्य पिऊन पुष्टी अनुभवित राहिली आहे आणि या पुष्टीच्या बळावर कळीकाळाला आव्हान देत जीवन आनंदी आणि निर्भयतेने जगत आहे.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)