शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून गयेला जाऊन पिंडदान करण्याचं वेगळं महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 08:04 IST

बिहारमधील गया येथे श्राद्ध करणे, पितरांसाठी तर्पण व पिंडदान करणे महापुण्यदायक समजले जाते. तेथे हे विधी केल्याने पितरांना मोक्ष मिळतो, असेही मानले जाते. या ठिकाणाला एवढे महत्त्व का आले, हे आता आपण पाहू या.

बिहारमधील गया येथे श्राद्ध करणे, पितरांसाठी तर्पण व पिंडदान करणे महापुण्यदायक समजले जाते. तेथे हे विधी केल्याने पितरांना मोक्ष मिळतो, असेही मानले जाते. या ठिकाणाला एवढे महत्त्व का आले, हे आता आपण पाहू या.

बिहारची राजधानी पाटणा येथून सुमारे १०४ किलोमीटरवर गया जिल्हा आहे. हे ठिकाण हिंदू व बौद्ध धर्मासाठीही अतिशय पवित्र मानले गेले आहे. हिंदू लोक गयेला मुक्तिक्षेत्र व मोक्षप्राप्ती स्थान मानतात. तर बौद्ध धर्माचे अनुयायी या ठिकाणाला ज्ञान क्षेत्र मानतात. पुराणातील कथेनुसार गयेमध्ये गयासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने घोर तपश्चर्या केली होती. त्यानंतर त्याला वरदान मिळाले होते की, जो कोणी त्याला पाहील किंवा स्पर्श करील,त्याला यमलोकी जाण्याची गरज पडणार नाही. ती व्यक्ती सरळ विष्णूलोकी जाईल.

गयासुराला हे वरदान मिळाल्यामुळे लोकांना मोक्ष मिळू लागला खरा. परंतु यमलोक रिकामा राहू लागला. या कारणामुळे यमराजांनी ब्रह्मा, विष्णू व महेश यांना काही उपाय करण्यास सांगितला. यमराजाची स्थिती लक्षात घेऊन ब्रह्मदेव गयासूराला म्हणाले की, तू निरतिशय पवित्र आहेस. त्यामुळे देवता तुझ्या पाठीवर यज्ञ करू इच्छित आहेत. गयासूर यासाठी तयार झाला. त्याच्या पाठीवर सर्व देवता व गदा धारण करून विष्णू स्थिर झाले. गयासुराला स्थिरकरण्यासाठी त्याच्या पाठीवर एक मोठी शीला ठेवण्यात आली. आजही ती शीलाप्रेतशीला नावाने प्रसिद्ध आहे. गयासुराच्या या समर्पण भावामुळे भगवान विष्णूंनी त्याला वरदान दिले की आतापासून जेथे तुझ्या शरीरावर यज्ञ झाला आहे, ते ठिकाण गया म्हणून प्रसिद्ध होईल. येथे पिंडदान व श्राद्ध करणाऱ्यांना पुण्य मिळेल व ज्यांच्यासाठी तर्पण, पिंडदान केले जाईल, त्यांना मोक्ष, मुक्ती मिळेल. येथे आल्यानंतर कोणत्याही आत्म्याला भटकण्याची वेळ येणार नाही. त्यानंतर या ठिकाणाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले व तेव्हापासून या ठिकाणी तर्पण, पिंडदान, श्राद्ध करणे अत्यंत पुण्यकारक समजले जाऊ लागले.

हिंदू धर्म व वैदिक परंपरेच्या मान्यतेनुसार, पुत्राचे पुत्रत्व तेव्हाच सार्थक होते जेव्हा तो आपल्या माता-पित्यांची जिवंतपणी सेवा करतो व त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे प्रति सांवत्सरिक श्राद्ध व पितृपक्षातील श्राद्ध विधिवत करतो. गयेला पिंडदान करण्याने मृतात्म्यांना मोक्ष मिळतो, असेही आपल्याकडे मानले जाते.

पुराणातील माहितीनुसार, गयामध्ये विविध नावांच्या ३६० वेदी होत्या व त्या ठिकाणी पिंडदान केले जात असे. आता त्यातील केवळ ४८ उरल्या आहेत. आता अनेक धार्मिक संस्थांनी पुरातन वेदी शोधून काढण्याची मागणी केलेली आहे. सध्या याच ४८ वेदींवर लोक पितरांचे तर्पण व पिंडदान करतात. विष्णुपद मंदिर, फल्गू नदीचा किनारा व अक्षयवट या ठिकाणी पिंडदाने करणे पुण्यकारक समजले जाते. याशिवाय वैतरणी, प्रेतशीला, सीताकुंड, नागकुंड, पांडुशीला, रामशीला, मंगलागौरी, कागबली आदी ठिकाणीही पिंडदान केले जाते. देशात श्राद्ध करण्यासाठी जी ५५ महत्त्वाची ठिकाणे सांगितलेली आहेत, त्यात गयेचे स्थान सर्वांत वरचे आहे.

श्रद्धेशिवाय श्राद्ध अपूर्ण आहे...

श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध. त्यामुळे श्रद्धेशिवाय केलेले श्राद्ध अपूर्ण आहे. जगातील सर्वच धर्म, संप्रदाय, लोकसमूहांमध्ये पितर,पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा कोणता ना कोणता मार्ग आहे. श्रीलंका, बर्मा, अफ्रिका, कॅलिफोर्निया, तसेच उत्तरी ध्रुवीय प्रदेश तसेच युरोपीय देशांमध्येही पूर्वजांच्या मुक्तीसाठी प्रार्थना केल्या जातात. भारतात तर श्राद्ध-पितृपक्षातील विधी वैज्ञानिक संदर्भासह असल्यामुळे त्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे.

-संकलन : सुमंत अयाचित 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक