शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

...म्हणून गयेला जाऊन पिंडदान करण्याचं वेगळं महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 08:04 IST

बिहारमधील गया येथे श्राद्ध करणे, पितरांसाठी तर्पण व पिंडदान करणे महापुण्यदायक समजले जाते. तेथे हे विधी केल्याने पितरांना मोक्ष मिळतो, असेही मानले जाते. या ठिकाणाला एवढे महत्त्व का आले, हे आता आपण पाहू या.

बिहारमधील गया येथे श्राद्ध करणे, पितरांसाठी तर्पण व पिंडदान करणे महापुण्यदायक समजले जाते. तेथे हे विधी केल्याने पितरांना मोक्ष मिळतो, असेही मानले जाते. या ठिकाणाला एवढे महत्त्व का आले, हे आता आपण पाहू या.

बिहारची राजधानी पाटणा येथून सुमारे १०४ किलोमीटरवर गया जिल्हा आहे. हे ठिकाण हिंदू व बौद्ध धर्मासाठीही अतिशय पवित्र मानले गेले आहे. हिंदू लोक गयेला मुक्तिक्षेत्र व मोक्षप्राप्ती स्थान मानतात. तर बौद्ध धर्माचे अनुयायी या ठिकाणाला ज्ञान क्षेत्र मानतात. पुराणातील कथेनुसार गयेमध्ये गयासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने घोर तपश्चर्या केली होती. त्यानंतर त्याला वरदान मिळाले होते की, जो कोणी त्याला पाहील किंवा स्पर्श करील,त्याला यमलोकी जाण्याची गरज पडणार नाही. ती व्यक्ती सरळ विष्णूलोकी जाईल.

गयासुराला हे वरदान मिळाल्यामुळे लोकांना मोक्ष मिळू लागला खरा. परंतु यमलोक रिकामा राहू लागला. या कारणामुळे यमराजांनी ब्रह्मा, विष्णू व महेश यांना काही उपाय करण्यास सांगितला. यमराजाची स्थिती लक्षात घेऊन ब्रह्मदेव गयासूराला म्हणाले की, तू निरतिशय पवित्र आहेस. त्यामुळे देवता तुझ्या पाठीवर यज्ञ करू इच्छित आहेत. गयासूर यासाठी तयार झाला. त्याच्या पाठीवर सर्व देवता व गदा धारण करून विष्णू स्थिर झाले. गयासुराला स्थिरकरण्यासाठी त्याच्या पाठीवर एक मोठी शीला ठेवण्यात आली. आजही ती शीलाप्रेतशीला नावाने प्रसिद्ध आहे. गयासुराच्या या समर्पण भावामुळे भगवान विष्णूंनी त्याला वरदान दिले की आतापासून जेथे तुझ्या शरीरावर यज्ञ झाला आहे, ते ठिकाण गया म्हणून प्रसिद्ध होईल. येथे पिंडदान व श्राद्ध करणाऱ्यांना पुण्य मिळेल व ज्यांच्यासाठी तर्पण, पिंडदान केले जाईल, त्यांना मोक्ष, मुक्ती मिळेल. येथे आल्यानंतर कोणत्याही आत्म्याला भटकण्याची वेळ येणार नाही. त्यानंतर या ठिकाणाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले व तेव्हापासून या ठिकाणी तर्पण, पिंडदान, श्राद्ध करणे अत्यंत पुण्यकारक समजले जाऊ लागले.

हिंदू धर्म व वैदिक परंपरेच्या मान्यतेनुसार, पुत्राचे पुत्रत्व तेव्हाच सार्थक होते जेव्हा तो आपल्या माता-पित्यांची जिवंतपणी सेवा करतो व त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे प्रति सांवत्सरिक श्राद्ध व पितृपक्षातील श्राद्ध विधिवत करतो. गयेला पिंडदान करण्याने मृतात्म्यांना मोक्ष मिळतो, असेही आपल्याकडे मानले जाते.

पुराणातील माहितीनुसार, गयामध्ये विविध नावांच्या ३६० वेदी होत्या व त्या ठिकाणी पिंडदान केले जात असे. आता त्यातील केवळ ४८ उरल्या आहेत. आता अनेक धार्मिक संस्थांनी पुरातन वेदी शोधून काढण्याची मागणी केलेली आहे. सध्या याच ४८ वेदींवर लोक पितरांचे तर्पण व पिंडदान करतात. विष्णुपद मंदिर, फल्गू नदीचा किनारा व अक्षयवट या ठिकाणी पिंडदाने करणे पुण्यकारक समजले जाते. याशिवाय वैतरणी, प्रेतशीला, सीताकुंड, नागकुंड, पांडुशीला, रामशीला, मंगलागौरी, कागबली आदी ठिकाणीही पिंडदान केले जाते. देशात श्राद्ध करण्यासाठी जी ५५ महत्त्वाची ठिकाणे सांगितलेली आहेत, त्यात गयेचे स्थान सर्वांत वरचे आहे.

श्रद्धेशिवाय श्राद्ध अपूर्ण आहे...

श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध. त्यामुळे श्रद्धेशिवाय केलेले श्राद्ध अपूर्ण आहे. जगातील सर्वच धर्म, संप्रदाय, लोकसमूहांमध्ये पितर,पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा कोणता ना कोणता मार्ग आहे. श्रीलंका, बर्मा, अफ्रिका, कॅलिफोर्निया, तसेच उत्तरी ध्रुवीय प्रदेश तसेच युरोपीय देशांमध्येही पूर्वजांच्या मुक्तीसाठी प्रार्थना केल्या जातात. भारतात तर श्राद्ध-पितृपक्षातील विधी वैज्ञानिक संदर्भासह असल्यामुळे त्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे.

-संकलन : सुमंत अयाचित 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक