शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आनंद तरंग - एकांताचा वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 02:15 IST

तनामनाच्या खूप खोल कोलाहलात गुरफटलेल्या आपल्या वृत्तीला कुठं ना कुठं थोडं शांततेचं स्थिरावणं असावं म्हणून आपण आपल्या भोवतालची अशी वेगवेगळी ठिकाणे शोधत असतो;

इंद्रजीत देशमुखतनामनाच्या खूप खोल कोलाहलात गुरफटलेल्या आपल्या वृत्तीला कुठं ना कुठं थोडं शांततेचं स्थिरावणं असावं म्हणून आपण आपल्या भोवतालची अशी वेगवेगळी ठिकाणे शोधत असतो; पण आपण शोधलेल्या आशा सर्वच ठिकाणी आपलं शांततेचं विसावणं होईल की नाही, हे मात्र सांगता येत नाही. आमच्या सदोष शोधपद्धतीचा सुगावा लागलेले तुकोबाराय आपल्याला अशा शांततेच्या विसावण्याबद्दल एके ठिकाणी सांगतात,

येणे सुखे रुचे एकांताचा वास।नाही गुणदोष अंगा येत।।’

वास्तविक, जीवनातील अनंत बाबींबद्दल अनंतजणांशी संवाद साधण्याच्या नादी लागून आपण आपल्या जीवनहित चिंतनासाठी कधीच स्वत:शी हितगूज केलं नाही. अशा स्वहित चिंतनहेतुक उद्देशाने आपल्या जीवनात एकांत खूप महत्त्वाचा आहे. आजच्या युगात सतत धावपळ असणाऱ्या आमच्या जीवनात एकांत व एकांताची आवड या खूप कमी प्रमाण असलेल्या बाबी आहेत. एकांतात आपल्याच हातून आपल्याच बाबतीत घडलेल्या कितीतरी चुकीच्या व बरोबर असणाºया गोष्टींचे अवलोकन करता येते. शिवाय एकांतात आपल्या स्वत:च्या क्षमता व मर्यादा यांची जाणीव ठेवून उद्याच्या भविष्याचे नियोजनही करता येते. एकांतात आपणच आपले निरीक्षक असतो. त्यामुळे उद्याच्या चुकणाºया पावलाला बंधन घालण्यासाठीचे वैचारिक नियोजन या काळात करता येते. जगातील कितीतरी जणांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या थोर-मोठेपणाची प्रचिती आपण घेतो; पण एकांतात राहून स्वत:च स्वत:ला भेटून अंतरी दडलेल्या मोठेपणाची अनुभूती घेऊ शकतो. म्हणून तर जगाला भेटू वा न भेटू; पण आपल्या एकांत नित्यतेने आपण स्वत:च स्वत:ला मात्र नक्की भेटू.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकonlineऑनलाइन