शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

आनंद तरंग - एकांताचा वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 02:15 IST

तनामनाच्या खूप खोल कोलाहलात गुरफटलेल्या आपल्या वृत्तीला कुठं ना कुठं थोडं शांततेचं स्थिरावणं असावं म्हणून आपण आपल्या भोवतालची अशी वेगवेगळी ठिकाणे शोधत असतो;

इंद्रजीत देशमुखतनामनाच्या खूप खोल कोलाहलात गुरफटलेल्या आपल्या वृत्तीला कुठं ना कुठं थोडं शांततेचं स्थिरावणं असावं म्हणून आपण आपल्या भोवतालची अशी वेगवेगळी ठिकाणे शोधत असतो; पण आपण शोधलेल्या आशा सर्वच ठिकाणी आपलं शांततेचं विसावणं होईल की नाही, हे मात्र सांगता येत नाही. आमच्या सदोष शोधपद्धतीचा सुगावा लागलेले तुकोबाराय आपल्याला अशा शांततेच्या विसावण्याबद्दल एके ठिकाणी सांगतात,

येणे सुखे रुचे एकांताचा वास।नाही गुणदोष अंगा येत।।’

वास्तविक, जीवनातील अनंत बाबींबद्दल अनंतजणांशी संवाद साधण्याच्या नादी लागून आपण आपल्या जीवनहित चिंतनासाठी कधीच स्वत:शी हितगूज केलं नाही. अशा स्वहित चिंतनहेतुक उद्देशाने आपल्या जीवनात एकांत खूप महत्त्वाचा आहे. आजच्या युगात सतत धावपळ असणाऱ्या आमच्या जीवनात एकांत व एकांताची आवड या खूप कमी प्रमाण असलेल्या बाबी आहेत. एकांतात आपल्याच हातून आपल्याच बाबतीत घडलेल्या कितीतरी चुकीच्या व बरोबर असणाºया गोष्टींचे अवलोकन करता येते. शिवाय एकांतात आपल्या स्वत:च्या क्षमता व मर्यादा यांची जाणीव ठेवून उद्याच्या भविष्याचे नियोजनही करता येते. एकांतात आपणच आपले निरीक्षक असतो. त्यामुळे उद्याच्या चुकणाºया पावलाला बंधन घालण्यासाठीचे वैचारिक नियोजन या काळात करता येते. जगातील कितीतरी जणांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या थोर-मोठेपणाची प्रचिती आपण घेतो; पण एकांतात राहून स्वत:च स्वत:ला भेटून अंतरी दडलेल्या मोठेपणाची अनुभूती घेऊ शकतो. म्हणून तर जगाला भेटू वा न भेटू; पण आपल्या एकांत नित्यतेने आपण स्वत:च स्वत:ला मात्र नक्की भेटू.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकonlineऑनलाइन