शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Mahashivratri2018: महाशिवरात्रीला 'या' 12 गोष्टी करू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 11:28 IST

भगवान शिव जेवढ्या लवकर प्रसन्न होतात तेवढ्याच लवकर ते क्रोधीतही होतात. त्यामुळं महाशिवरात्रीला या 12 गोष्टी कधीही करू नका.... 

मुंबई -  जगभरातील समस्त शिवप्रेमींसाठी महत्त्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. त्यामुळे या दिवशी करायची व्रत-वैकल्ये, पूजा आणि मुहूर्त याबाबत लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असते. उद्या (मंगळवार) महाशिवरात्र आहे. हिंदू लोक हा दिवस एका सणाप्रमाणे साजरा करतात. अनेक जण दिवसभर उपवास करतात. या दिवशी भगवान महादेवाची मनोभावे पूजा केली जाते. असे म्हटले जाते की, भगवान शिव जेवढ्या लवकर प्रसन्न होतात तेवढ्याच लवकर ते क्रोधीतही होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी काही नियम कटाक्षाने पाळण्याची पद्धत अनेक कुटुंबांमध्ये पूर्वापार चालत आली आहे. त्यापैकी काही नियम असे...

  •  महाशिवरात्रीला सकाळी लवकर उठावे, उशिरापर्यंत झोपू नये. त्याचप्रमाणे आंघोळ केल्याशिवाय काही खाऊ नये. 
  • तुम्ही जर शिवरात्रीचा उपवास धरला असेल तर लवकर उठून गरम पाण्यानं आंघोळ करावी, स्वच्छ कपडे घालून शंकराची पूजा करावी. 
  • शिवरात्रीला गहू, भात आणि डाळीपासून तयार झालेले पदार्थ खाऊ नये. उपवास केला असेल तर फळ, दूध, चहा, कॉफी यांचे सेवन करावे. 
  •  काळे कपडे घालू नका 
  •  शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद खाऊ नये, असंही मानलं जातं.  
  • महाशिवरात्रीच्या रात्री शंकराचे भजन, आरती करावी. उपवास धरला असेल तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून सोडावा. 
  • शिवलिंगावर तुळशीपत्र किंवा पॅकेटमधील दूध कधीच अर्पण करू नये.  शिवलिंगावर नेहमी थंड दूध अर्पण करावं. 
  • शिवलिंगावर केतकी आणि चंपा ही फूल अर्पण करू नयेत. 
  • पूजेला तुटलेला किंवा अर्धवट तांदूळ वापरू नये. 
  • शिवलिंगावर सर्वात पहिल्यांदा पंचामृत अर्पण करावे. दूध, दही,  गंगाजल, केसर, मध आणि पाणी यापासून तयार झालेलं पंचामृत वापरावं.
  •  तीन पानाचे बेलपत्र अर्पण करावं. त्यामध्ये एकही पानं तुटलेलं नसावे. बेलपत्राचे तोंड आपल्याकडे असावे. शिवलिंगावर फक्त पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण करावं.
  • शिवलिंगावर कुंकवाचा टिळा लावू नये.
टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्री