शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

श्रमपूजा हीच शिवपूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 06:11 IST

अखिल भारतीय पातळीवरचे मध्ययुगीन संतांचे साहित्य म्हणजे श्रमसंस्कृतीला लाभलेले खरे कैवल्य लेणे आहे.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेअखिल भारतीय पातळीवरचे मध्ययुगीन संतांचे साहित्य म्हणजे श्रमसंस्कृतीला लाभलेले खरे कैवल्य लेणे आहे. आळशी, कामचुकार, दुराचारी व भ्रष्टाचारी माणसांच्या मनातील श्वापदे समाजजीवनास अस्वस्थ करतात म्हणून तर संतांच्या वाणीला पांडित्याचा दर्प नाही, तर आपल्या घामाचा वास आहे व मातीशी एकनिष्ठ राहण्याची इमानदारी आहे. जो-जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याने आपली उपजीविका स्वत:च्या श्रमावरच चालविली पाहिजे. कारण श्रमावाचून मिळालेले सोने माणसाच्या मनात भुतांचा नंगानाच निर्माण करतात. महात्मा गांधींनी तर स्पष्ट शब्दांत म्हटले होते की, ‘श्रमाशिवाय मिळालेली संपत्ती हीच खरी पापाची जननी आहे.’ कार्लाईल नावाच्या पाश्चात्त्य विद्वानाने केवळ श्रममूल्याला महत्त्व देऊन ‘वर्क इज वर्शिप’ असे प्रतिपादन केलेले आहे; परंतु पाश्चात्त्यांचा हा विचार अखंड श्रमाला महत्त्व देत असला तरी या विचाराला शिवत्वाचे अधिष्ठान नाही. उलट बसवेश्वर व तत्कालीन भारतीय विचारवंतांनी ‘वर्क इज हेवन’चे प्रतिपादन करून श्रमाला शिवत्वाचे अधिष्ठान दिले. ज्याचे अनुकरण महाराष्ट्रात उदय पावलेल्या संत चळवळीनेही केले. वास्तविक पाहता जर चंदन घासलेच नाही तर त्याचा सुगंध कसा सुटणार? तसेच श्रमाच्या सहाणेवर शरीराचे चंदन घासले जाणार नाही; तोपर्यंत त्याला शिवत्वाचा सुगंध प्राप्त होणार नाही हेच तर खरे मुक्ती मूल्य आहे. अन्य भक्ती-मुक्तीचे प्रकार म्हणजे साधकाने स्वत:ची स्वत:च केलेली फसवणूक आहे. म्हणून, साधकांनो श्रमयोगी व्हा! आपली कर्मे, कुसुमे त्या शिवस्वरूपाच्या चरणी समर्पित करा अन् मुक्तीच्या पाऊलवाटा स्वत:च्याच पावलांनी निर्माण करा.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक