शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 10

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 18:13 IST

मला एक स्त्रीने फोन केला.तिची माझी प्रत्यक्षात काहीच ओळख नव्हती.ती स्त्री प्रवचनाला येणारीही नव्हती.पण तिला कुणीतरी सांगितले की तुम्ही वामनरावांना फोन करा म्हणून तिने मला फोन केला.

- सदगुरू श्री वामनराव पै

मूल चांगले निपजले तर ती तुमची खरी संपत्ती आहे

मला एक स्त्रीने फोन केला.तिची माझी प्रत्यक्षात काहीच ओळख नव्हती.ती स्त्री प्रवचनाला येणारीही नव्हती.पण तिला कुणीतरी सांगितले की तुम्ही वामनरावांना फोन करा म्हणून तिने मला फोन केला.ती म्हणाली मला ऑफिसला जाण्याची भिती वाटते.मी तिला विचारले तुला भिती का वाटते?तर ती म्हणाली ते मला माहित नाही.तुला बॉस ओरडतो का? तर नाही म्हणाली.मी तिला म्हटले की मी सांगतो तुला भिती का वाटते ते.तू जे काम करतेस ते तुला नीट माहित नाही त्यामुळे तू बॉसकडे गेलीस व त्याने काही प्रश्न विचारला तर तुला त्याचे उत्तर सांगता येत नाही म्हणून तुला  कामाची भिती वाटते.मग ती म्हणाली हो हे खरे आहे.पण मग यावर उपाय काय? मी तिला सांगितले की याला उपाय एकच तो म्हणजे तू तुझ्यावाट्याला आलेले  काम नीट समजावून घेणे.ज्यांनी अगोदर हे काम केलेले आहे त्यांच्याकडून तू कामाबाबत सर्व माहिती घेणे,ते कसे करायचे,नेमके काय करायला पाहिजे हे समजावून घेणे, कुठल्या फाईल्स वाचल्या पाहिजेत हे लक्षांत घेणे. आता तुला कामाची भिती वाटते कारण तुला त्या कामाबद्दल अज्ञान आहे. संसारातही प्रत्येक ठिकाणी हे असेच  असते.जीवनविद्येने चूल व मूल हया दोन्ही गोष्टींना फार महत्वाचे स्थान दिलेले आहे| जीवनविद्या सांगते चूल या विषयाकडे घरातल्या बाईने व्यवस्थित पाहिले पाहिजे व मुल हे सुध्दा नीट वाढविले पाहिजे. हयाला पर्याय नाही. जर तुमच्या घरात कुणीतरी वडिलधारी व्यक्ती, आजी, आत्या वगैरे असेल तर त्या स्त्रीने नोकरी करायला काहीच हरकत नाही.पण जर नसेल तर केवळ पैसा कमविण्यासाठी आपले मूल पाळणा घरात ठेवायचे व नोकरीला जायचे हे मुळीच योग्य नाही असे जीवनविद्या सांगते.आपले मूल हे चांगले निपजायला पाहिजे यासाठी आपण त्याची नीट काळजी घ्यायला हवी.मुल चांगले निपजले तर ती आपली संपत्ती ठरते पण जर मूल वाईट निपजले तर तीच आपली आपत्ती ठरते.आज कित्येक घरांत मूले ही आपत्ती झालेली आहेत कारण मूले वाटेल तशी वागतात.आईबापांना वाट्टेल तसे बोलतात.दुरुत्तरे देतात.तुम्हांला अक्कल नाही वगैरे बोलतात.आता असे कशामुळे होते तर तुमची मुले ही चांगल्या संस्कारांत वाढत नाहीत.आईचे काम हे दाई कधीच करु शकत नाही.आईचे काम एखादी आचारी करु शकत नाही.आचारी अथवा बाई जे काम करेल त्यात प्रेम नसेल व आई जे करेल त्यात भरभरुन प्रेम व माया असेल| घरातल्या स्त्रीने चूल व मूल सांभाळणे ही गोष्ट माझ्या दॄष्टीने फार महत्वाची आहे.यासाठीच मी माझ्या पुस्तकांत लिहून ठेवलेले आहे.”चूल व मूल सांभाळणा-या स्त्रीला तिच्या नव-याच्या मिळकती मधला अर्धा भाग कायद्याने मिळायला हवा.यासाठीच जीवनविद्या तत्वज्ञानामध्ये या विषयाबाबत काही महत्वाचे सिध्दांत मी मांडून ठेवलेले आहेत व जीवनातल्या सर्व समस्यांवर योग्य उपाय सुचवलेले आहेत.