शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 10

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 18:13 IST

मला एक स्त्रीने फोन केला.तिची माझी प्रत्यक्षात काहीच ओळख नव्हती.ती स्त्री प्रवचनाला येणारीही नव्हती.पण तिला कुणीतरी सांगितले की तुम्ही वामनरावांना फोन करा म्हणून तिने मला फोन केला.

- सदगुरू श्री वामनराव पै

मूल चांगले निपजले तर ती तुमची खरी संपत्ती आहे

मला एक स्त्रीने फोन केला.तिची माझी प्रत्यक्षात काहीच ओळख नव्हती.ती स्त्री प्रवचनाला येणारीही नव्हती.पण तिला कुणीतरी सांगितले की तुम्ही वामनरावांना फोन करा म्हणून तिने मला फोन केला.ती म्हणाली मला ऑफिसला जाण्याची भिती वाटते.मी तिला विचारले तुला भिती का वाटते?तर ती म्हणाली ते मला माहित नाही.तुला बॉस ओरडतो का? तर नाही म्हणाली.मी तिला म्हटले की मी सांगतो तुला भिती का वाटते ते.तू जे काम करतेस ते तुला नीट माहित नाही त्यामुळे तू बॉसकडे गेलीस व त्याने काही प्रश्न विचारला तर तुला त्याचे उत्तर सांगता येत नाही म्हणून तुला  कामाची भिती वाटते.मग ती म्हणाली हो हे खरे आहे.पण मग यावर उपाय काय? मी तिला सांगितले की याला उपाय एकच तो म्हणजे तू तुझ्यावाट्याला आलेले  काम नीट समजावून घेणे.ज्यांनी अगोदर हे काम केलेले आहे त्यांच्याकडून तू कामाबाबत सर्व माहिती घेणे,ते कसे करायचे,नेमके काय करायला पाहिजे हे समजावून घेणे, कुठल्या फाईल्स वाचल्या पाहिजेत हे लक्षांत घेणे. आता तुला कामाची भिती वाटते कारण तुला त्या कामाबद्दल अज्ञान आहे. संसारातही प्रत्येक ठिकाणी हे असेच  असते.जीवनविद्येने चूल व मूल हया दोन्ही गोष्टींना फार महत्वाचे स्थान दिलेले आहे| जीवनविद्या सांगते चूल या विषयाकडे घरातल्या बाईने व्यवस्थित पाहिले पाहिजे व मुल हे सुध्दा नीट वाढविले पाहिजे. हयाला पर्याय नाही. जर तुमच्या घरात कुणीतरी वडिलधारी व्यक्ती, आजी, आत्या वगैरे असेल तर त्या स्त्रीने नोकरी करायला काहीच हरकत नाही.पण जर नसेल तर केवळ पैसा कमविण्यासाठी आपले मूल पाळणा घरात ठेवायचे व नोकरीला जायचे हे मुळीच योग्य नाही असे जीवनविद्या सांगते.आपले मूल हे चांगले निपजायला पाहिजे यासाठी आपण त्याची नीट काळजी घ्यायला हवी.मुल चांगले निपजले तर ती आपली संपत्ती ठरते पण जर मूल वाईट निपजले तर तीच आपली आपत्ती ठरते.आज कित्येक घरांत मूले ही आपत्ती झालेली आहेत कारण मूले वाटेल तशी वागतात.आईबापांना वाट्टेल तसे बोलतात.दुरुत्तरे देतात.तुम्हांला अक्कल नाही वगैरे बोलतात.आता असे कशामुळे होते तर तुमची मुले ही चांगल्या संस्कारांत वाढत नाहीत.आईचे काम हे दाई कधीच करु शकत नाही.आईचे काम एखादी आचारी करु शकत नाही.आचारी अथवा बाई जे काम करेल त्यात प्रेम नसेल व आई जे करेल त्यात भरभरुन प्रेम व माया असेल| घरातल्या स्त्रीने चूल व मूल सांभाळणे ही गोष्ट माझ्या दॄष्टीने फार महत्वाची आहे.यासाठीच मी माझ्या पुस्तकांत लिहून ठेवलेले आहे.”चूल व मूल सांभाळणा-या स्त्रीला तिच्या नव-याच्या मिळकती मधला अर्धा भाग कायद्याने मिळायला हवा.यासाठीच जीवनविद्या तत्वज्ञानामध्ये या विषयाबाबत काही महत्वाचे सिध्दांत मी मांडून ठेवलेले आहेत व जीवनातल्या सर्व समस्यांवर योग्य उपाय सुचवलेले आहेत.