शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
2
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
3
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
4
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
5
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
6
दिवाळीत स्वामींना घरी आणताय? आयुष्यभर सोबत करतील; अनंत कृपा होईल, स्थापनेचे ‘हे’ नियम पाळा!
7
Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे
8
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
9
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
10
बँकांच्या मागण्यांना कंटाळला विजय मल्ल्या; म्हणाला,"माझ्याकडून पैसे मागणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे," भारतातच प्रकरण मिटवण्याची दिली ऑफर
11
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
12
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
13
ईपीएफओने पैसे काढण्यासंबंधी तब्बल १३ नियम बदलले; आता संपूर्ण शिल्लक काढता येणार नाही
14
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...
15
शांततेचे दूत! ट्रम्प यांच्यासाठी शाहबाज शरीफ यांच्याकडून नोबेलची मागणी; मेलोनींनी तोंडावर ठेवला हात
16
Diwali 2025: वास्तुशास्त्रानुसार दिवाळीत 'या' सहा वस्तू कोणाकडून भेट घेऊ नका आणि देऊही नका!
17
LG Electronics IPO Listing: बंपर लिस्टिंग, शेअर बाजारात एन्ट्री घेताच प्रत्येक शेअरवर ₹५७५ चा फायदा; एलजी आयपीओनं केलं मालामाल
18
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
19
दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... 
20
नेपाळनंतर 'Gen-Z' ने या देशातील सत्ता घालवली; राष्ट्रपती देश सोडून पळून गेले

समृध्द जीवनासाठी संतविचार आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 19:01 IST

मानवी जीवनाची उंची वाढविणे पसायदान हे आहे...

- हभप चंद्रकांत महाराज वांजळे, (प्रसिद्ध प्रवचन, कीर्तनकार) वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानातून विश्वसुखाची प्रार्थना केली आहे. आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे, पसायदान हे . माऊलींचे पसायदान ही विश्वप्रार्थना आहे. माऊली जी विश्वप्रार्थना करताहेत, त्यात विश्वात्मक सुखाचे मागणे आहे. ते मिळाल्यानंतर त्यांचे असणारे विश्वात्मक गुरूं म्हणतात, येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाहो..पसायदानात मागितलेले तुझे सगळे पूर्ण होईल. तेव्हा येणे वरे ज्ञानदेवो सुखिया जाहला... जग सुखी झाले की ज्ञानोबा सुखी झाले. माऊलींना मला द्या म्हटलय पण, मज द्या म्हणताना, मला व्यक्तिगत नाही तर सगळ्या जगासाठी मागितलेले आहे. म्हणून ती विश्वप्रार्थना आहे. भविष्यात जगातील सर्व देश आणि संस्कृती एकत्र आल्या आणि सर्वांचे एक विश्वगीत जर कोणते असेल तर महाराष्ट्रातील ज्ञानोबारायांचे पसायदान हेच गावे लागणार आहे. मानवी जीवनाची उंची वाढविणे पसायदान हे आहे. संतांनी मानवी जीवन उदात्त आणि समृद्ध होण्यासाठी खूप खस्ता घेतलेल्या आहेत. ती कृतज्ञता संतश्रेष्ठ तुकोबारायांनी व्यक्त केली आहे. देऊनिया जीव, वढयेला साधियेला ठाव... हे सगळं करताना, हे सोपे काम नव्हते. कुणीतरी माऊलींचे चरित्र लिहिताना म्हटले होते. माय जॉय इज माय पब्लिक प्रॉपर्टी, बीटवीन मेन अ?ँड मी. माय पेन इज माय प्रायवेट प्रॉपर्टी.. माझा आनंद ही माझी सार्वजनिक मालमत्ता आहे.   ती लोकांना वाटण्यासाठी आहे. माझे दु:ख ही माझी प्रायवेट प्रॉपर्टी आहे. ती माज्यासाठी आहे. किती हा उदात्त विचार आहे. खरे तर आनंदाची उधळण करणारे महात्मे, संत याच मातीत वाढले, मोठे झाले. आकाशाऐवढे मोठे झाले. ह्यह्यअणु रेणूया थोकडा, तुका आकाशाएवढा... तुकोबारायांनी ४१ वर्षांच्या आयुष्यात एवढी क्रांती केली. माऊलींचे आयुष्यही वीस एकवीस वर्षांचे. सर्वसामान्य माणसांना मिळालेल्या आयुष्यात काही दीव्य करता येत नाही. मात्र, संत महात्मे हे जीवनासाठी प्रेरक असतात. त्यांच्या विचार-आचारातून आपणास चेतना मिळत असते. अशा संतांना लोकोत्तर जीवन जगता येते, त्यामुळे संतांचे विचार, संतसाहित्याचे वाचन आपण करायला हवे. त्यातून समृद्ध जीवन जगता येणार आहे.  

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर