शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

समृध्द जीवनासाठी संतविचार आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 19:01 IST

मानवी जीवनाची उंची वाढविणे पसायदान हे आहे...

- हभप चंद्रकांत महाराज वांजळे, (प्रसिद्ध प्रवचन, कीर्तनकार) वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानातून विश्वसुखाची प्रार्थना केली आहे. आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे, पसायदान हे . माऊलींचे पसायदान ही विश्वप्रार्थना आहे. माऊली जी विश्वप्रार्थना करताहेत, त्यात विश्वात्मक सुखाचे मागणे आहे. ते मिळाल्यानंतर त्यांचे असणारे विश्वात्मक गुरूं म्हणतात, येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाहो..पसायदानात मागितलेले तुझे सगळे पूर्ण होईल. तेव्हा येणे वरे ज्ञानदेवो सुखिया जाहला... जग सुखी झाले की ज्ञानोबा सुखी झाले. माऊलींना मला द्या म्हटलय पण, मज द्या म्हणताना, मला व्यक्तिगत नाही तर सगळ्या जगासाठी मागितलेले आहे. म्हणून ती विश्वप्रार्थना आहे. भविष्यात जगातील सर्व देश आणि संस्कृती एकत्र आल्या आणि सर्वांचे एक विश्वगीत जर कोणते असेल तर महाराष्ट्रातील ज्ञानोबारायांचे पसायदान हेच गावे लागणार आहे. मानवी जीवनाची उंची वाढविणे पसायदान हे आहे. संतांनी मानवी जीवन उदात्त आणि समृद्ध होण्यासाठी खूप खस्ता घेतलेल्या आहेत. ती कृतज्ञता संतश्रेष्ठ तुकोबारायांनी व्यक्त केली आहे. देऊनिया जीव, वढयेला साधियेला ठाव... हे सगळं करताना, हे सोपे काम नव्हते. कुणीतरी माऊलींचे चरित्र लिहिताना म्हटले होते. माय जॉय इज माय पब्लिक प्रॉपर्टी, बीटवीन मेन अ?ँड मी. माय पेन इज माय प्रायवेट प्रॉपर्टी.. माझा आनंद ही माझी सार्वजनिक मालमत्ता आहे.   ती लोकांना वाटण्यासाठी आहे. माझे दु:ख ही माझी प्रायवेट प्रॉपर्टी आहे. ती माज्यासाठी आहे. किती हा उदात्त विचार आहे. खरे तर आनंदाची उधळण करणारे महात्मे, संत याच मातीत वाढले, मोठे झाले. आकाशाऐवढे मोठे झाले. ह्यह्यअणु रेणूया थोकडा, तुका आकाशाएवढा... तुकोबारायांनी ४१ वर्षांच्या आयुष्यात एवढी क्रांती केली. माऊलींचे आयुष्यही वीस एकवीस वर्षांचे. सर्वसामान्य माणसांना मिळालेल्या आयुष्यात काही दीव्य करता येत नाही. मात्र, संत महात्मे हे जीवनासाठी प्रेरक असतात. त्यांच्या विचार-आचारातून आपणास चेतना मिळत असते. अशा संतांना लोकोत्तर जीवन जगता येते, त्यामुळे संतांचे विचार, संतसाहित्याचे वाचन आपण करायला हवे. त्यातून समृद्ध जीवन जगता येणार आहे.  

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर