शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

हीच संस्कृती आज अंध:काराकडे जात आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 03:49 IST

भारत हा एक संस्कृतिप्रधान देश मानला जातो.

- नीता ब्रह्मकुमारीभारत हा एक संस्कृतिप्रधान देश मानला जातो. भारताची प्राचीन संस्कृती ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या मार्गाने पुढे चालणारी, अंध:कारातून प्रकाशाकडे नेणारी मानली जाते. म्हणून प्रत्येक सण-प्रसंगात दीप प्रज्वलन, दिवा लावणे या प्रथा दिसून येतात. पण आज हीच संस्कृती अंध:काराकडे जात आहे. वाढदिवसाला ओवाळणी करून, तिलक लावून शुभकामना देण्याची पद्धत आज मेणबत्ती विझवून हॅपी बर्थडे बोलणारी झाली आहे. भारताची प्राचीन संस्कृती विसरून पाश्चात्त्य देशाच्या भोगविलासी संस्कृतीशी आपण हात मिळवत आहोत. भूक लागल्यावर खाणे ही प्रकृती, भूक लागल्यावर दुसऱ्याच्या हातचे काढून खाणे ही आहे विकृती, पण खात असताना कोणी आले तर त्यालाही खावयास देणे ही आहे संस्कृती. ही संस्कृती भारतामध्ये ‘अतिथी देवो भव’ म्हणून सांभाळताना दिसते. घरी आलेल्या पाहुण्याला देवाचेच रूप समजून त्याचा पाहुणचार प्रेमाने केला जातो. अनेक पद्धती आणि अनेक उत्सवांत भारतीय संस्कृतीचे दर्शन होते. प्रत्येक उत्सव आणि प्रथांमागे अनेक रहस्ये लपली आहेत. पण त्या रहस्यांना आपण कधी जाणून घेतले नाही. म्हणून आज तसे आपल्यामध्ये संस्कारही दिसून येत नाहीत. संस्कार आणि संस्कृती यांचा संबंध समजून घेण्यासारखा आहे. संस्कार अर्थात दैनंदिन जीवनामध्ये नियमितता आणणे, व्यवहारामध्ये सदगुणाचा समावेश करणे, प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्यता आणून धर्मयुक्त कार्य करणे हे संस्कारित असण्याची निशाणी आहे. अशा संस्कारी मनुष्यांनी अनेकांना जीवन जगण्याची कला शिकवली, त्या कलेला संस्कृती म्हटले जाते. वर्तमान परिस्थिती मात्र वेगळी दिसून येते. विज्ञानाने मनुष्याला अनेक साधने आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या. परंतु त्याचबरोबर आपली मानसिकताही दिवसेंदिवस बदलत गेली. अनेक चुकीच्या समजुती समाजामध्ये पसरत गेल्या आणि हीच सुंदर संस्कृती आज लोप पावताना दिसत आहे.