शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

हीच संस्कृती आज अंध:काराकडे जात आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 03:49 IST

भारत हा एक संस्कृतिप्रधान देश मानला जातो.

- नीता ब्रह्मकुमारीभारत हा एक संस्कृतिप्रधान देश मानला जातो. भारताची प्राचीन संस्कृती ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या मार्गाने पुढे चालणारी, अंध:कारातून प्रकाशाकडे नेणारी मानली जाते. म्हणून प्रत्येक सण-प्रसंगात दीप प्रज्वलन, दिवा लावणे या प्रथा दिसून येतात. पण आज हीच संस्कृती अंध:काराकडे जात आहे. वाढदिवसाला ओवाळणी करून, तिलक लावून शुभकामना देण्याची पद्धत आज मेणबत्ती विझवून हॅपी बर्थडे बोलणारी झाली आहे. भारताची प्राचीन संस्कृती विसरून पाश्चात्त्य देशाच्या भोगविलासी संस्कृतीशी आपण हात मिळवत आहोत. भूक लागल्यावर खाणे ही प्रकृती, भूक लागल्यावर दुसऱ्याच्या हातचे काढून खाणे ही आहे विकृती, पण खात असताना कोणी आले तर त्यालाही खावयास देणे ही आहे संस्कृती. ही संस्कृती भारतामध्ये ‘अतिथी देवो भव’ म्हणून सांभाळताना दिसते. घरी आलेल्या पाहुण्याला देवाचेच रूप समजून त्याचा पाहुणचार प्रेमाने केला जातो. अनेक पद्धती आणि अनेक उत्सवांत भारतीय संस्कृतीचे दर्शन होते. प्रत्येक उत्सव आणि प्रथांमागे अनेक रहस्ये लपली आहेत. पण त्या रहस्यांना आपण कधी जाणून घेतले नाही. म्हणून आज तसे आपल्यामध्ये संस्कारही दिसून येत नाहीत. संस्कार आणि संस्कृती यांचा संबंध समजून घेण्यासारखा आहे. संस्कार अर्थात दैनंदिन जीवनामध्ये नियमितता आणणे, व्यवहारामध्ये सदगुणाचा समावेश करणे, प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्यता आणून धर्मयुक्त कार्य करणे हे संस्कारित असण्याची निशाणी आहे. अशा संस्कारी मनुष्यांनी अनेकांना जीवन जगण्याची कला शिकवली, त्या कलेला संस्कृती म्हटले जाते. वर्तमान परिस्थिती मात्र वेगळी दिसून येते. विज्ञानाने मनुष्याला अनेक साधने आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या. परंतु त्याचबरोबर आपली मानसिकताही दिवसेंदिवस बदलत गेली. अनेक चुकीच्या समजुती समाजामध्ये पसरत गेल्या आणि हीच सुंदर संस्कृती आज लोप पावताना दिसत आहे.