शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मनाला सत्कार्यात व सद्विचारात प्रवृत्त करणारा...संतांचा विवेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 16:56 IST

संतांनी शिकविलेल्या अध्यात्माचा मुख्य परिणाम हा असतो की त्यामुळे मनुष्याचा 'विवेक' जागा होतो.

संतांनी शिकविलेल्या अध्यात्माचा मुख्य परिणाम हा असतो की त्यामुळे मनुष्याचा 'विवेक' जागा होतो़ अविवेक नाहीसा होतो़ दुर्बुद्धी जाते आणि सद्बुद्धी जागी होते़ वस्तुत: हा 'विवेक' म्हणजे सद्विचाराचा व सदाचरणाचा परिणामच असतो़ हा विवेकच परमार्थाचे महत्त्वाचे साधन असतो़ 'विवेक' दृढ झाल्यावाचून खरा परमार्थ जीवनात येऊ शकत नाही़ संतांच्या उपदेशवाणीचे सतत मनन-चिंतन केले असता हा विवेक क्रमाक्रमाने विकसित होत जातो.

विषयासक्तीमुळे विवेक दुर्बल होत असतो़ परंतु संतांच्या उपदेशातून विषयांची म्हणजेच इंद्रियजन्य भोगांची आसक्ती कमी होत असते़ आपल्या देहाचे विषयांशी आणि आपले स्वत:चे देहाशी अज्ञानाने तादात्म्य झालेले असते़ यासाठी, आपण देहाहून वेगळे आहोत, हा विवेक संत आपणास शिकवित असतात.

देह नव्हे मी हे सरे... उरला उरे विठ्ठल...

आपण देहातील आहोत हे ओळखणे हाच खरा विवेक होय. आज आपण समाजातील नैतिक विकासासाठी सद्सद्विवेक महत्त्वाचा मानतो़ माणसाची नीतिमत्ता विवेकाच्या अभावाने घसरत असते़ परंतु ही सद्सद्विवेकबुद्धी म्हणजेच सत्य आणि असत्याच्या स्वरुपाचा निर्णय करणारी बुद्धी प्रत्येकाची वेगळी असून उपयोगाची ठरत नाही़ कारण सत्य आणि असत्य या संकल्पना वस्तुनिष्ठ आहेत, व्यक्तीनिष्ठ नाहीत़ एका माणसाच्या बुद्धीला जे योग्य वाटते ते दुसऱ्या माणसाच्या बुद्धीला अयोग्य वाटू शकते़ परंतु सत्य, असत्य, नैतिक, अनैतिक अशा गोष्टी एखाद्या व्यक्तीच्या लहरीवर अवलंबून नसतात तर त्यामागे व्यापक-सखोल असा तत्वविचार असतो़ त्यामुळे संतांनी वेदशास्त्र, पुराणे, उपनिषदे यांच्या आधारावर आपला 'विवेक' सांगितला.

मन हे अत्यंत चंचल असते़ ते चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींकडे आकर्षित होते़ अशा मनाला चांगले कोणते वाईट कोणते, योग्य कोणते, अयोग्य कोणते याची जाणीव करून देणे व चांगल्याकडेच त्याची प्रवृत्ती घडवणे हे संतांच्या विचारांमधून सहजपणे साध्य होते़ 'मी देह नसून मी देव आहे' याचा अर्थ प्रत्येक माणसात देव आहे़ हा प्रत्येकांच्या ठिकाणी असलेला परमेश्वराचा अंश माणसाला असत्य, अन्याय, अत्याचार, काम-क्रोध अशा दुर्गुणांपासून दूर करतो़ हाच अंश संतांनी इतका विकसित केलेला असतो की त्यांचे मन हेच सत्य व असत्याविषयी प्रमाणभूत असते़ त्यामुळेच -

सत्य असत्यासी मन केले ग्वाही...

असे श्री तुकोबाराय म्हणतात़ परंतु त्यांचे मन म्हणजे केवळ त्यांची लहर नसते़ तर त्यांचे मन अध्यात्माच्या  ज्ञानाने संस्कारित झालेले विशुद्ध अंत:करण असते़ कारण त्यांनी जाणीवपूर्वक मनाला सांगितलेले असते की 'मना एक करी... म्हणे मी जाईन पंढरी...' श्री तुकोबारायांप्रमाणेच श्रीरामदास स्वामी मनाच्या श्लोकांमधून मनाला बोध करतात -

मना सज्जना भक्तिपंथेचि जावे...तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे...

कारण मन हेच माणसाला सत्कृत्य किंवा दुष्कृत्य करण्याला प्रवृत्त करीत असते़ मनाला सत्कार्यात व सद्विचारात प्रवृत्त करण्याचे कार्य संतांचा विवेक करीत असतो़ म्हणूनच श्री ज्ञानदेव 'संत तेथे विवेका' असे म्हणतात़

- प्रा. डॉ. शरदचंद्र देगलूरकर, श्री गुंडा महाराज संस्थान, देगलूऱ  

टॅग्स :spiritualअध्यात्मिकSocialसामाजिक