शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

मनाला सत्कार्यात व सद्विचारात प्रवृत्त करणारा...संतांचा विवेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 16:56 IST

संतांनी शिकविलेल्या अध्यात्माचा मुख्य परिणाम हा असतो की त्यामुळे मनुष्याचा 'विवेक' जागा होतो.

संतांनी शिकविलेल्या अध्यात्माचा मुख्य परिणाम हा असतो की त्यामुळे मनुष्याचा 'विवेक' जागा होतो़ अविवेक नाहीसा होतो़ दुर्बुद्धी जाते आणि सद्बुद्धी जागी होते़ वस्तुत: हा 'विवेक' म्हणजे सद्विचाराचा व सदाचरणाचा परिणामच असतो़ हा विवेकच परमार्थाचे महत्त्वाचे साधन असतो़ 'विवेक' दृढ झाल्यावाचून खरा परमार्थ जीवनात येऊ शकत नाही़ संतांच्या उपदेशवाणीचे सतत मनन-चिंतन केले असता हा विवेक क्रमाक्रमाने विकसित होत जातो.

विषयासक्तीमुळे विवेक दुर्बल होत असतो़ परंतु संतांच्या उपदेशातून विषयांची म्हणजेच इंद्रियजन्य भोगांची आसक्ती कमी होत असते़ आपल्या देहाचे विषयांशी आणि आपले स्वत:चे देहाशी अज्ञानाने तादात्म्य झालेले असते़ यासाठी, आपण देहाहून वेगळे आहोत, हा विवेक संत आपणास शिकवित असतात.

देह नव्हे मी हे सरे... उरला उरे विठ्ठल...

आपण देहातील आहोत हे ओळखणे हाच खरा विवेक होय. आज आपण समाजातील नैतिक विकासासाठी सद्सद्विवेक महत्त्वाचा मानतो़ माणसाची नीतिमत्ता विवेकाच्या अभावाने घसरत असते़ परंतु ही सद्सद्विवेकबुद्धी म्हणजेच सत्य आणि असत्याच्या स्वरुपाचा निर्णय करणारी बुद्धी प्रत्येकाची वेगळी असून उपयोगाची ठरत नाही़ कारण सत्य आणि असत्य या संकल्पना वस्तुनिष्ठ आहेत, व्यक्तीनिष्ठ नाहीत़ एका माणसाच्या बुद्धीला जे योग्य वाटते ते दुसऱ्या माणसाच्या बुद्धीला अयोग्य वाटू शकते़ परंतु सत्य, असत्य, नैतिक, अनैतिक अशा गोष्टी एखाद्या व्यक्तीच्या लहरीवर अवलंबून नसतात तर त्यामागे व्यापक-सखोल असा तत्वविचार असतो़ त्यामुळे संतांनी वेदशास्त्र, पुराणे, उपनिषदे यांच्या आधारावर आपला 'विवेक' सांगितला.

मन हे अत्यंत चंचल असते़ ते चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींकडे आकर्षित होते़ अशा मनाला चांगले कोणते वाईट कोणते, योग्य कोणते, अयोग्य कोणते याची जाणीव करून देणे व चांगल्याकडेच त्याची प्रवृत्ती घडवणे हे संतांच्या विचारांमधून सहजपणे साध्य होते़ 'मी देह नसून मी देव आहे' याचा अर्थ प्रत्येक माणसात देव आहे़ हा प्रत्येकांच्या ठिकाणी असलेला परमेश्वराचा अंश माणसाला असत्य, अन्याय, अत्याचार, काम-क्रोध अशा दुर्गुणांपासून दूर करतो़ हाच अंश संतांनी इतका विकसित केलेला असतो की त्यांचे मन हेच सत्य व असत्याविषयी प्रमाणभूत असते़ त्यामुळेच -

सत्य असत्यासी मन केले ग्वाही...

असे श्री तुकोबाराय म्हणतात़ परंतु त्यांचे मन म्हणजे केवळ त्यांची लहर नसते़ तर त्यांचे मन अध्यात्माच्या  ज्ञानाने संस्कारित झालेले विशुद्ध अंत:करण असते़ कारण त्यांनी जाणीवपूर्वक मनाला सांगितलेले असते की 'मना एक करी... म्हणे मी जाईन पंढरी...' श्री तुकोबारायांप्रमाणेच श्रीरामदास स्वामी मनाच्या श्लोकांमधून मनाला बोध करतात -

मना सज्जना भक्तिपंथेचि जावे...तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे...

कारण मन हेच माणसाला सत्कृत्य किंवा दुष्कृत्य करण्याला प्रवृत्त करीत असते़ मनाला सत्कार्यात व सद्विचारात प्रवृत्त करण्याचे कार्य संतांचा विवेक करीत असतो़ म्हणूनच श्री ज्ञानदेव 'संत तेथे विवेका' असे म्हणतात़

- प्रा. डॉ. शरदचंद्र देगलूरकर, श्री गुंडा महाराज संस्थान, देगलूऱ  

टॅग्स :spiritualअध्यात्मिकSocialसामाजिक