शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

... तर 'तुम्ही संसार जिंकला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 12:19 IST

एकीकडे आई-वडिलांचं ‘मन’ही द्वंद्व अवस्थेत राहते. शेवटी मुलाजवळ जावे तरी सुनेचे बोलणे सहन होत नाही. ती त्यांना स्वीकारतच नाही.

आई-वडील लहानपणापासून मुलांना प्रेम लावतात. त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांचे लाड पुरवितात. मुलगा मोठा होतो. प्रेमविवाह करतो. त्याची पत्नी त्याला आई-वडिलांपासून दूर ठेवते. मुलगा आनंदात राहतो. आई-वडील कुढत बसतात. त्या दोघांनाही या मुलाच्या कर्तव्यशून्यतेचा खूप राग येतो. त्याच्या धास्तीने आई मानसिक आजारी होते. अशा परिस्थितीत तिला लकवा होतो. वडील तिची पूर्णरीत्या सेवा करतात. कारण ती धर्मपत्नी असते. रोज तिला स्वयंपाक स्वत: करून खावू घालतात. मुलाला मुलगी होते. तिला असे वाटते माझी नात मी एकदातरी बघावी. पण तसा प्रसंग सून येऊ देत नाही. त्यांना टाकून बोलते. नवरा अनेकवेळेला समजावण्याचा प्रयत्न करतो. पण ती समजून घेत नाही. आई-वडिलांची दुरवस्था पाहून मुलगा चिडतो. त्याची घरात चीड चीड वाढते. कारण तो एकुलता एकच असतो. त्या मुलाची इकडे आड, तिकडे विहीर अशी मनोवस्था होते. एकीकडे आई-वडील, तर दुसरीकडे पत्नी या द्वंद्व अवस्थेत तो अडकतो. त्याचे ‘मन’ स्थिर नसते. रात्रंदिवस त्याच्या मनाची अवस्था बदलत राहते.

एकीकडे आई-वडिलांचं ‘मन’ही द्वंद्व अवस्थेत राहते. शेवटी मुलाजवळ जावे तरी सुनेचे बोलणे सहन होत नाही. ती त्यांना स्वीकारतच नाही. दोघेही नवरा-बायको आपल्या मुलाविषयी विचारात राहतात. शारीरिक त्रास - मानसिक त्रास या अवस्थेत मनाचे खंगलेपण, मनाची निराशा कधीतरी वाईट गोष्टींकडे धाव घेते. आत्मविश्वास हरवून बसलेले असतात. लहानपणापासूनच्या आठवणी सतावतात. मनाचे मनपण हरवलेले असते. फक्त निराशानेच जगायचे. आत्मानंद नाही. हरवलेले मन - पुन्हा कधीतरी जुनीपुराणी आठवण काढून जागे होते. कधीतरी मनाला वाटते. हे जीवन दिले नसते तर बरे झाले असते. ही अशी संतती देण्यापेक्षा वांझ ठेवले असतेस तर बरे झाले असते. मनाची अवस्था कालमानानुसार बदलत जाते. मनाला समजावणे एवढे सोपे काम नाही. मनोवस्था समयानुसार बदलते. त्यामुळे मनाला अगोदरच समजावा. संसार दु:खमूळ आहे. या दु:खमूळ संसारात राहून मनाला प्रसन्न ठेवणे जमले की तुम्ही संसार जिंकला.डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकNashikनाशिक