शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

रूप आणि रुपया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 03:59 IST

सुकर्माचे धन आणि गुणांची सुंदरता मनुष्याला या जीवनाच्या प्रवासामध्ये पदोपदी मदत करते

आपण कितीही सुंदर असलो तरी वयोमानानुसार वार्धक्य हे येतेच. निसर्गचक्र कुणासाठी थांबत नाही. कालानुरूप बदल हा निसर्गाचा स्थायीभावच आहे. त्यात निसर्गाविरुद्ध जाऊन कुणालाही त्याला विरोध करता येत नाही. प्रत्येक फक्त सुंदर व्यक्ती चांगला असतो किंवा सर्वांचा आवडता होतो, ही मान्यताच पूर्णत: चुकीची आहे. व्यक्तीच्या रूपापेक्षा त्याचे कर्तृत्व सगळ्यांच्या मानसपटलावर राहते. दीन-दु:खींना केलेली मदत, इतरांशी चांगला व्यवहार, कनवाळूपणा या सर्व गोष्टी मनाला स्पर्श करतात. आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये पैसा ही सर्वात मोठी आवश्यक बाब झाली आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी कोणताही भलाबुरा मार्ग अवलंबला जातो. आपण आज हे विसरलो आहोत की आपण काय कमवले यापेक्षा कसे कमवले हे महत्त्वाचे आहे. कारण ज्या कर्माने ते कमवले असेल ते कर्मच आपले मित्र किंवा शत्रू बनतात.

सुकर्माचे धन आणि गुणांची सुंदरता मनुष्याला या जीवनाच्या प्रवासामध्ये पदोपदी मदत करते. थोडेसे थांबून आपण स्वत:लाच विचारू या कीमाझा हा प्रवास सुखरूप पार होतोय की या मार्गामध्ये एकसारखे प्रतिकूल परिस्थितीचे स्पीड ब्रेकर येत आहेत? जर आपल्या ध्येयापर्यंत लवकरात लवकर पोहोचायचे असेल तर ज्ञानाच्या स्टेअरिंगवर जम बसवायला पाहिजे. कोणत्या मार्गाने आणि कसा मोड घ्यायचा याची समज असेल तर हा कठीण वाटणारा प्रवासही अतिशय सरळ वाटू लागेल. एक घडीचा हा डाव आहे. जीवन खूप छोटे आहे. रूप आणि रुपया यांना महत्त्व द्यावे. परंतु हे मिळवण्यासाठी विचार आणि कर्म यांचेही संतुलन राखावे. विचारांची सुंदरता नक्कीच आपल्या चेहऱ्याची सुंदरता वाढवेल आणि जिथे सुकर्माची पुंजी भरपूर कमवली असेल तर स्थूल धनसुद्धा आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. चला तर मग, विचारांची सुंदरता आणि कर्मांच्या धनाने स्वत:ला रूपवान आणि धनवान बनवू या. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक