शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

मनाची निवृत्ती ही विवेक, वैराग्य इत्यादींनीयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 10:40 IST

मनाची निवृत्ती 

मन हे एक असे महत्त्वाचे आहे की, प्रगती व अधोगती ही दोन्हीही त्याच्यावर अवलंबून आहे़ मनाच्या ठिकाणी निर्माण होणाºया विकारांमुळे जीवन अधोगतीला जाते आहे़ या अधोगतीतून बाहेर निघायचे असेल तर मनाला संतसंगाची गोडी लागायला पाहिजे़ याकरिता मनाने त्याची संसारिक प्रवृत्तीची आसक्ती कमी करून निवृत्तीचा स्वीकार करावा लागेल. मनाची निवृत्ती ही विवेक, वैराग्य इत्यादींनीयुक्त आहे़ विवेक आला की माणसाच्या जीवनातील अनेक प्रश्न संपून जातात़ संसाररूपी रोगावर ‘विचार’ हेच महाऔषध आहे़ शास्त्रकारांनी तीन गोष्टी सांगितल्या आहेत़ *  काही गोष्टींचा कधीच विचार     करू नका*  काही गोष्टींचा थोडा विचार करा* काही गोष्टींचा नेहमी विचार करासंसारिक गोष्टीचा कधीच विचार करू नका की ज्या निष्फळ आहेत़ संगती, प्रगती, संपत्ती, संततीचा थोडा विचार करा व ‘मी कोण आहे?’ अशा तत्त्वाचा नेहमी विचार करावा़मी कोण ऐसा करावा विचार।म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा।।अशा तत्त्वविचाराने माणूस या दु:खरूपी संसारातून बाहेर पडेल, अन्यथा अखंड दु:ख भोगावे लागेल़ माणसाला जीवनातील सार काय व असार काय हे समजले पाहिजे़ संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांगतात...त्रिगुण असार निर्गुण हे सा।सारासार विचार हरिपाठ।।अशा या सारासार विचाराने निर्माण झालेले वैराग्य हे खरे वैराग्य होय़ वैराग्याच्या गोष्टी बोलणे सोपे असते, पण अंगी आणणे कठीण असते़ विवेक, वैराग्य, इंद्रीयनिग्रह या सर्वांचा परिणाम म्हणजे वृत्ती, ही निवृत्ती होणे म्हणजे वृत्तीच्या ठिकाणी असलेली चंचलता निघून जाणे, वृत्तीची स्थिरता ही एकप्रकारची निवृत्तीच आहे़ ही निवृत्तीच या जीवाला निजबोधापर्यंत पोहोच करते़ मनाच्याच ठिकाणी प्रवृत्तीपासून निर्माण झालेला मोह आहे, तर याच मनाच्या ठिकाणी निवृत्तीपासून निर्माण झालेला निजबोध आहे़मोह हा या जीवाला सतत भुलविण्याचे काम करतो़ संत तुकाराम महाराज म्हणतात ना...विषय ओढी भुलले जीव!ही मोहाने निर्माण केलेली जीवाची विचिन्ह अवस्था आहे, तर याच मनाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या निजबोध हा या जीवाला ‘उन्मनी’ या अवस्थेपर्यंत घेऊन जातो़ तो कसा? याचा विचार पुढे करू!- ह.भ.प. जयवंत महाराज बोधलेधामणगावकर (पंढरपूर)

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीAdhyatmikआध्यात्मिक