शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

मनाची निवृत्ती ही विवेक, वैराग्य इत्यादींनीयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 10:40 IST

मनाची निवृत्ती 

मन हे एक असे महत्त्वाचे आहे की, प्रगती व अधोगती ही दोन्हीही त्याच्यावर अवलंबून आहे़ मनाच्या ठिकाणी निर्माण होणाºया विकारांमुळे जीवन अधोगतीला जाते आहे़ या अधोगतीतून बाहेर निघायचे असेल तर मनाला संतसंगाची गोडी लागायला पाहिजे़ याकरिता मनाने त्याची संसारिक प्रवृत्तीची आसक्ती कमी करून निवृत्तीचा स्वीकार करावा लागेल. मनाची निवृत्ती ही विवेक, वैराग्य इत्यादींनीयुक्त आहे़ विवेक आला की माणसाच्या जीवनातील अनेक प्रश्न संपून जातात़ संसाररूपी रोगावर ‘विचार’ हेच महाऔषध आहे़ शास्त्रकारांनी तीन गोष्टी सांगितल्या आहेत़ *  काही गोष्टींचा कधीच विचार     करू नका*  काही गोष्टींचा थोडा विचार करा* काही गोष्टींचा नेहमी विचार करासंसारिक गोष्टीचा कधीच विचार करू नका की ज्या निष्फळ आहेत़ संगती, प्रगती, संपत्ती, संततीचा थोडा विचार करा व ‘मी कोण आहे?’ अशा तत्त्वाचा नेहमी विचार करावा़मी कोण ऐसा करावा विचार।म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा।।अशा तत्त्वविचाराने माणूस या दु:खरूपी संसारातून बाहेर पडेल, अन्यथा अखंड दु:ख भोगावे लागेल़ माणसाला जीवनातील सार काय व असार काय हे समजले पाहिजे़ संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांगतात...त्रिगुण असार निर्गुण हे सा।सारासार विचार हरिपाठ।।अशा या सारासार विचाराने निर्माण झालेले वैराग्य हे खरे वैराग्य होय़ वैराग्याच्या गोष्टी बोलणे सोपे असते, पण अंगी आणणे कठीण असते़ विवेक, वैराग्य, इंद्रीयनिग्रह या सर्वांचा परिणाम म्हणजे वृत्ती, ही निवृत्ती होणे म्हणजे वृत्तीच्या ठिकाणी असलेली चंचलता निघून जाणे, वृत्तीची स्थिरता ही एकप्रकारची निवृत्तीच आहे़ ही निवृत्तीच या जीवाला निजबोधापर्यंत पोहोच करते़ मनाच्याच ठिकाणी प्रवृत्तीपासून निर्माण झालेला मोह आहे, तर याच मनाच्या ठिकाणी निवृत्तीपासून निर्माण झालेला निजबोध आहे़मोह हा या जीवाला सतत भुलविण्याचे काम करतो़ संत तुकाराम महाराज म्हणतात ना...विषय ओढी भुलले जीव!ही मोहाने निर्माण केलेली जीवाची विचिन्ह अवस्था आहे, तर याच मनाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या निजबोध हा या जीवाला ‘उन्मनी’ या अवस्थेपर्यंत घेऊन जातो़ तो कसा? याचा विचार पुढे करू!- ह.भ.प. जयवंत महाराज बोधलेधामणगावकर (पंढरपूर)

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीAdhyatmikआध्यात्मिक