शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

मनुष्याने सत्शील, स्नेहल बनावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 07:55 IST

उंच शिखरावर गेल्यास तेथील निरामय शांतता, निर्मलता, शीतलता ही मनुष्य शरीरावर, मनावर परिणाम करते.

मनुष्य हा सर्व प्राणिमात्रात श्रेष्ठ आहे. सर्व प्राणी-वनस्पती या सर्वांचे अवलोकन मनुष्य करतो, सृष्टीचे सौंदर्य न्हाळतो, त्याची गुणात्मकता तपासतो. अनुभव घेणे, त्या सृष्टीचा अनुभव कथन करणे ही सर्व कार्य मनुष्य करतो. कारण मनुष्य नसता तर या सृष्टीचे रहस्य कोणी जाणले नसते. मनुष्याने नेहमी चांगले जीवन व्यतीत करावे. उंच शिखरावर जाणे, कर्तृत्ववान बनणे, जीवनाचा आनंद घेणे ही कृती मनुष्य करतो. सर्वोच्च प्राणी म्हणून मनुष्याची गणना केली जाते. उंच शिखरावर गेल्यास तेथील निरामय शांतता, निर्मलता, शीतलता ही मनुष्य शरीरावर, मनावर परिणाम करते. उत्साहवर्धक ‘मन’ जीवन जगताना चेतना प्राप्त करुन देते. ‘चेतना’ ही मनाची प्रसन्नता आहे. मनाची प्रसन्नता वाढू लागली की, घबराहट संपते. जीवनात सफलता प्राप्त होते. विशाल बुद्धीचा अनुभव करता येतो. बुद्धीच्या जोरावरच जीवनात काहीतरी क्रांती घडू शकते. मनुष्य जीवनात सुखरूपी अमृत, दु:खरूपी विष पचवता आले पाहिजे. निंदारूपी विष पचवले की सुखाच्या अनुभूतीची वाट सापडते. कारण संतांनी सांगितले आहे, निंदा आणि स्तुती ही तर मानवी मनाचे भाव आहेत. 

निंदा मानणे न मानणे यात सुख-दु:ख अवलंबून आहे. जो प्राणी विकारयुक्त आहे, कुव्यसनात आहे, अडकलेला आहे, विषयभोगातच सर्वरूप सुख आहे याची कल्पना तो करतो. सुख असो दु:ख, ह्या दोन्ही बाजू मानवी मनावर अवलंबून आहेत. मनुष्यप्राणी या दोन्ही बाजूंना कसा समजून घेतो, यावर त्याचे भवितव्य अवलंबून असते. माणूस योग्य पदाला पोहोचला की तो जगाला उपदेश करण्याचा अधिकारी बनतो. उपदेश त्याचाच लागू होतो. जो सत्शील आहे. ज्याचे आचरण आणि वाणी एकमताने चालते. तोच या जगाला उपदेश करु शकतो. त्याचाच उपदेश जगाला मान्य होतो. त्याच्या उपदेशानुसारच लोक आचरण करतात. मनुष्याने स्नेहल बनावे. मनुष्याचे जीवन अमृतमय आहे. फक्त शुद्ध आचरणाने वागले तर...

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक