शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ध्यासातून सद्गुरू; ध्यानातून होते गुरुतत्वाची प्राप्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 13:15 IST

सद्गुरूच्या वात्सल्यपूर्ण शोधाने, कृपेने आणि मार्गदर्शनाने नराचा नारायण होतो. सर्व संतांनी आपल्या वाङमयात मनोभावे सद्गुरू महीमा वर्णन केला आहे.

अण्णासाहेब मोरे

भारतीय संस्कृतीत गुरुपरंपरेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आज गुरु पौर्णिमेचा मंगल पावन दिन आहे. गुरु पौर्णिमेलाच व्यास पौर्णिमादेखील म्हटले जाते. सर्व वेद, उपनिषदे, पुराणांचे रचनाकार व महाभारतसारख्या अजरामर राष्ट्रीय ग्रंथाचे सर्जक महर्षी व्यास यांचा हा स्मृतिदिन आहे. महर्षी व्यास हे ज्ञानगंगेचे उगमस्थान मानले जातात. श्री व्यासांच्या तत्त्वज्ञानाचा उगम व केंद्रबिंदू मनुष्य व मनुष्यता आहे. दिव्य प्रतिभा शिल्पी असलेल्या व्यास महर्षी स्मरणाचा आणि पूजनाचा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून हजारो वर्षांपासून साजरा करण्यात येतो. आध्यात्मिक भारतात गुरू-शिष्य नात्याला फार मोठे महानतेचे परिणाम व उंची लाभली आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचा सर्व पसारा हा गुरु-शिष्य संवादातून साकार झाला आहे. या संवादाचे सर्वोत्तम स्वरूप श्रीमद्भगवत गीता आहे. श्रीकृष्ण-अर्जुन या गुरु-शिष्याच्या नात्यातून अमूर्त ज्ञान शब्दप्रवाही बनते व निर्गुण ईश्वर सगुण साकारतो.

गुरु-शिष्याचा चिन्मय आदर्श भगवान शिव व जगदंब पार्वती आहे. भगवान दत्तात्रेय व त्यांचे अवतार चराचराचे संपूर्ण ब्रह्मांडाचे श्रीगुरू आहेत. ते सद्गुरू व गुरुतत्त्व आहेत. अज्ञानाचे निरसन होऊन मानवाला ज्ञान प्राप्तीची ओढ लागावी, ते ज्ञान प्रत्यक्ष अनुभवता यावे, त्या ज्ञानाने मीपणा व विकार नष्ट होऊन ज्ञानप्राप्तीसाठी प्राप्तीची जीवनात गुरूची आवश्यकता असते. गुरूमुळेच जीवनात मीपणा नष्ट होऊन विकार नाहीसे होतात. अंतर्बाह्य तेजोमयता धारण करण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर सद्गुरू बनतो.

सद्गुरूच्या वात्सल्यपूर्ण शोधाने, कृपेने आणि मार्गदर्शनाने नराचा नारायण होतो. सर्व संतांनी आपल्या वाङमयात मनोभावे सद्गुरू महीमा वर्णन केला आहे. सद्गुरू हा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा दाता आहे. भरभरून देणारा सद्गुरू हा परमउदार व निष्कांचन व निरपेक्ष आहे. सद्गुरूला शरण जाताच जन्मभराचे पाश तुटतात, अशी ग्वाही सर्व संतांनी दिली आहे.

बृहदारण्यकोपनिषदात ब्रह्मविद्येची आचार्य परंपरा विषद करताना तिचा प्रारंभ स्वयंभू परब्रह्मापासून सांगितला आहे. परमार्थ विद्या देणारे गुरू शिष्याला ज्ञानाच्या नित्य पौर्णिमेचे कैवल्य चांदणे अनुभवण्याचे सामर्थ्य प्राप्त करून देतात. मुंडकोषनिषदात म्हणले की, ईश्वराच्या ठिकाणी जेवढी श्रद्धा भक्ती असते, तेवढीच सद्गुरूच्या ठिकाणी असेल तर परमेश्वराचे नित्य दर्शन घडते.गुरूचा ध्यास शिष्याच्या मनी जडावा म्हणजे सद्गुरू शिष्याला सर्व सामर्थ्यांनी युक्त असे तेजस्वी, ज्ञानी बनवतात. या अर्थाने आपले शिष्यत्व विवेकाच्या आत्मप्रकाशात पारखून घेण्याचा सुदीन म्हणजे गुरूपौर्णिमा होय. ‘तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलाशी’ अशा चुकलेल्या माणसांना सुधारण्याचे कार्य सद्गुरू करतात.

प.पू. मोरे दादा या अर्थाने नेहमी म्हणत की, ‘गुरू से बडा गुरू का ध्यास’ ध्यासातून सद्गुरू व ध्यानातून गुरुतत्त्व मिळते. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे गुरूतत्त्वाचे पूर्ण तेजोमान निखळ विशुद्ध ज्ञान स्वरूप होय. तेच ब्रह्मानंदाचे उगमस्थान व सर्व सुखशांचीचे आश्रयस्थान आहेत. गुरुपौर्णिमेला श्री समर्थ महाराजांना आपले गुरूपद घेण्याची सविनय व मनोभावे प्रार्थना करावी.

(लेखक स्वामी समर्थ अध्यात्म केंद्राचे (दिंडोरीप्रणित) प्रमुख आहेत.)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक