शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

ध्यासातून सद्गुरू; ध्यानातून होते गुरुतत्वाची प्राप्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 13:15 IST

सद्गुरूच्या वात्सल्यपूर्ण शोधाने, कृपेने आणि मार्गदर्शनाने नराचा नारायण होतो. सर्व संतांनी आपल्या वाङमयात मनोभावे सद्गुरू महीमा वर्णन केला आहे.

अण्णासाहेब मोरे

भारतीय संस्कृतीत गुरुपरंपरेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आज गुरु पौर्णिमेचा मंगल पावन दिन आहे. गुरु पौर्णिमेलाच व्यास पौर्णिमादेखील म्हटले जाते. सर्व वेद, उपनिषदे, पुराणांचे रचनाकार व महाभारतसारख्या अजरामर राष्ट्रीय ग्रंथाचे सर्जक महर्षी व्यास यांचा हा स्मृतिदिन आहे. महर्षी व्यास हे ज्ञानगंगेचे उगमस्थान मानले जातात. श्री व्यासांच्या तत्त्वज्ञानाचा उगम व केंद्रबिंदू मनुष्य व मनुष्यता आहे. दिव्य प्रतिभा शिल्पी असलेल्या व्यास महर्षी स्मरणाचा आणि पूजनाचा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून हजारो वर्षांपासून साजरा करण्यात येतो. आध्यात्मिक भारतात गुरू-शिष्य नात्याला फार मोठे महानतेचे परिणाम व उंची लाभली आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचा सर्व पसारा हा गुरु-शिष्य संवादातून साकार झाला आहे. या संवादाचे सर्वोत्तम स्वरूप श्रीमद्भगवत गीता आहे. श्रीकृष्ण-अर्जुन या गुरु-शिष्याच्या नात्यातून अमूर्त ज्ञान शब्दप्रवाही बनते व निर्गुण ईश्वर सगुण साकारतो.

गुरु-शिष्याचा चिन्मय आदर्श भगवान शिव व जगदंब पार्वती आहे. भगवान दत्तात्रेय व त्यांचे अवतार चराचराचे संपूर्ण ब्रह्मांडाचे श्रीगुरू आहेत. ते सद्गुरू व गुरुतत्त्व आहेत. अज्ञानाचे निरसन होऊन मानवाला ज्ञान प्राप्तीची ओढ लागावी, ते ज्ञान प्रत्यक्ष अनुभवता यावे, त्या ज्ञानाने मीपणा व विकार नष्ट होऊन ज्ञानप्राप्तीसाठी प्राप्तीची जीवनात गुरूची आवश्यकता असते. गुरूमुळेच जीवनात मीपणा नष्ट होऊन विकार नाहीसे होतात. अंतर्बाह्य तेजोमयता धारण करण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर सद्गुरू बनतो.

सद्गुरूच्या वात्सल्यपूर्ण शोधाने, कृपेने आणि मार्गदर्शनाने नराचा नारायण होतो. सर्व संतांनी आपल्या वाङमयात मनोभावे सद्गुरू महीमा वर्णन केला आहे. सद्गुरू हा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा दाता आहे. भरभरून देणारा सद्गुरू हा परमउदार व निष्कांचन व निरपेक्ष आहे. सद्गुरूला शरण जाताच जन्मभराचे पाश तुटतात, अशी ग्वाही सर्व संतांनी दिली आहे.

बृहदारण्यकोपनिषदात ब्रह्मविद्येची आचार्य परंपरा विषद करताना तिचा प्रारंभ स्वयंभू परब्रह्मापासून सांगितला आहे. परमार्थ विद्या देणारे गुरू शिष्याला ज्ञानाच्या नित्य पौर्णिमेचे कैवल्य चांदणे अनुभवण्याचे सामर्थ्य प्राप्त करून देतात. मुंडकोषनिषदात म्हणले की, ईश्वराच्या ठिकाणी जेवढी श्रद्धा भक्ती असते, तेवढीच सद्गुरूच्या ठिकाणी असेल तर परमेश्वराचे नित्य दर्शन घडते.गुरूचा ध्यास शिष्याच्या मनी जडावा म्हणजे सद्गुरू शिष्याला सर्व सामर्थ्यांनी युक्त असे तेजस्वी, ज्ञानी बनवतात. या अर्थाने आपले शिष्यत्व विवेकाच्या आत्मप्रकाशात पारखून घेण्याचा सुदीन म्हणजे गुरूपौर्णिमा होय. ‘तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलाशी’ अशा चुकलेल्या माणसांना सुधारण्याचे कार्य सद्गुरू करतात.

प.पू. मोरे दादा या अर्थाने नेहमी म्हणत की, ‘गुरू से बडा गुरू का ध्यास’ ध्यासातून सद्गुरू व ध्यानातून गुरुतत्त्व मिळते. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे गुरूतत्त्वाचे पूर्ण तेजोमान निखळ विशुद्ध ज्ञान स्वरूप होय. तेच ब्रह्मानंदाचे उगमस्थान व सर्व सुखशांचीचे आश्रयस्थान आहेत. गुरुपौर्णिमेला श्री समर्थ महाराजांना आपले गुरूपद घेण्याची सविनय व मनोभावे प्रार्थना करावी.

(लेखक स्वामी समर्थ अध्यात्म केंद्राचे (दिंडोरीप्रणित) प्रमुख आहेत.)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक