शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वाचा बोलो वेदनीती करु संती केले ते...! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 14:12 IST

भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी नीतीमूल्ये जपणे व ते आचरणात आणने गरजेचे आहे. 

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अवतार हा धर्मरक्षणासाठी व नीतीची स्थापना करण्यासाठी झाला. प्रश्न असा पडतो की वेदाने सांगितलेली नीती कोणती..? नीतीचे स्वरुप काय आहे..? तर सज्जनहो.! नीती म्हणजेच सदाचार होय. मानवी जीवन आचारप्रधान असावे. सदाचारानेच मानवी जीवनाला मूल्य प्राप्त होते. नीती हे सर्व धर्मांचे मूळ आहे. मानवी जीवनाला, सदाचाराला प्रवृत्त करणे हेच वेदाच्या नीतीचे अंतिम ध्येय आहे. सदाचाराच्या दोन बाजू आहेत - एक सद्गुणाची वृद्धी ही भावात्मक बाजू तर दुसरी दुर्गुणाचा त्याग. प्रत्येक माणसाने सदाचाराने जगावे, दुराचाराचा त्याग करावा, यासाठी संतांनी प्रबोधन केले. प्रकृतीला नीतीचे बंधन आवश्यक आहे. नीतीशिवाय प्रकृती म्हणजेच विकृती होय. नीतीसह प्रकृती म्हणजेच संस्कृती होय. भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी नीतीमूल्ये जपणे व ते आचरणात आणने गरजेचे आहे. 

रामायणात एक सुंदर प्रसंग आला आहे. प्रभु रामचंद्राच्या आज्ञेने लक्ष्मण हे सीतामाईला वनवासात सोडतात. ती म्हणते, भाऊजी एकदा माझ्याकडे नीट काळजीपूर्वक बघा. भाऊजी रघुकुलाचा वंश माझ्या उदरात वाढतो आहे आणि माझा त्याग प्रभू करीत आहेत. लक्ष्मण संस्कृतीला साजेसे उत्तर देतो. तो म्हणाला, वहिनी, तुझे रुप मी दादा असतांना देखील बघितले नाही, ते रूप मी आज दादा नसतांना कसे पाहू..?दृष्टपूर्वं न ते रुपं पादौ दृष्टौ तवानघे ।कथमत्र हि पश्यामि रामेण रहितां वने ॥ 

यालाच भारतीय संस्कृती म्हणतात आणि ही संस्कृती टिकविण्यासाठी नीतीची गरज आहे. संस्कृती जीवन घडविते तर विकृती जीवन बिघडविते. संस्कृती मानवाच्या ठायी मांगल्य प्रस्थापित करते. प्रकृतीकडून संस्कृतीकडे जाणे यालाच विकास म्हणतात व प्रकृतीकडून विकृतीकडे जाणे याला ऱ्हास म्हणतात. आज संस्कृतीचे अभिसरण थांबत आहे की काय..? अशी शंका निर्माण होत आहे. कारण -परिवर्तन की धारामे हम इतने बदल गये ।बदल गया है सबकुछ हम हम नहीं रहे ॥ 

म्हणून नीतीचा आचार संवर्धित होण्याची नितांत गरज आहे. सदाचार हा समाजाला वारंवार शिकवावाच लागतो. तुकाराम महाराज म्हणतात -धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हासी ।वाचा बोलो वेदनीती करु संती केले ते ॥ 

संताचा अवतार हा जगाच्या कल्याणाकरिताच झाला. माणसाचे खरे कल्याण हे धर्मतत्वांचे पालन करण्यातच आहे. त्याशिवाय समाजधारणा साध्य होणार नाही. समाज नैतिक मूल्यांचे आचरण करणारा असेल तरच समाजात शांती नांदेल. यासाठी संतांनी वेदातील धर्म व वेदातील नीती निष्ठेने आचरली व समाजाला शिकवली. भागवत धर्माचे खरे सार यातच साठवलेले आहे.

(लेखक हे स्वत: राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा मोबाईल क्र. 9421344960 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक