शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजयोग :स्वस्थ व सुखी जीवनाचा आधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:23 IST

राजयोगाचा अर्थच आहे, आत्म्याचा एक सर्वश्रेष्ठ ज्योती पिता परमात्मा बरोबर संबंध.

आज प्रत्येक व्यक्तिशी इच्छा असते की जीवनात सुख, शांती, समाधान, स्वास्थ्य असावे. परंतु  आजच्या भौतिक जगात मनुष्य भौतिक साधन प्राप्त करण्याच्या मागे धावत आहे. भौतिक सुखाचा शोध घेत आहे. परंतु जेवढे भौतिक साधन, सुख, सुविधा उपलब्ध होत आहेत. तेवढा सुख शांती मनुष्यापासून दूर होत आहे व तो दु:खी होत चाललेला आहे. आपल्या वास्तविकतेपासून दूर होत आहे.मनुष्य अत्यंत बुध्दीवान प्राणी आहे. मनुष्याजवळ विवेकशक्ती आहे. सुदंर मन आहे, सुंदर विचार आहेत. परंतु मानवी मुल्यांचा ºहास व नकारात्मकता वाढल्याने मनुष्याच्या जीवनात दु:ख, परेशानी, तणाव याच्यात वाढ होत चालली आहे. सुख शांती प्राप्त करण्यासाठी मनुष्याच्या जीवनात राजयोगाची नितांत आवश्यकता आहे.  भारताच्या प्राचीन संस्कृतीतही योगाचे महत्वपूर्ण स्थान आहे. भारत सुरूवातीपासूनच संपुर्ण विश्वाला योग व आध्यात्मिकतेचे शिक्षण देत आहे. स्वामी विवेकानंदांनीही १८९३ मध्ये शिकागो धर्म संमेलनामध्ये आपल्या वक्तव्याव्दारे संपुर्ण जगासमोर भारताला योग गुरूच्या रूपात प्रसिध्द केले.भारताचा प्राचीन सर्वश्रेष्ठ योग, राजयोग आज जगामध्ये अनेक प्रकारचे योग, जप, तप, आसन ध्यान, प्राणायाम, हठयोग मुद्रा इत्यादी प्रसिध्द आहेत. ज्याव्दारे आपले शरीर स्वस्थ व निरोगी होण्यास मदत होते. परंतु ब्रम्हकुमारी संस्थेमध्ये मागील ७८ वर्षापासून पूर्ण विश्वात पसरलेल्या ९००० सेवा केंद्राच्या माध्यमातून शिव परमात्माने दिलेल्या ज्ञान व राजयोगाचे शिक्षण दिले जाते. ज्याव्दारे लाखो लोकांनी आपल्या जीवनात सुख-शांती प्राप्त केली.राजयोगाचा विधीराजयोग म्हणजे प्रार्थना, मंत्र जपने व विचार शून्य अवस्था नाही. राजयोगाचा एक विधी आहे. राजयोगाचा अर्थच आहे, आत्म्याचा एक सर्वश्रेष्ठ ज्योती पिता परमात्मा बरोबर संबंध.ज्याप्रमाणे चांदणीचे चकोर बरोबर, मिराचे श्रीकृष्ण बरोबर दिव्य प्रेम आहे. त्याचप्रमाणे परमात्म्याच्या आत्म्याशी दिव्य प्रेमपूर्ण आठवण व संबंधातच राजयोग म्हणतात. परंतु त्यासाठी आत्मा व परमात्माचे यतार्थ ज्ञान असावयास हवे, हे ब्रम्हाकुमारी संस्थेत दिले जाते.ईश्वराची आठवण सहज येण्यासाठी चार आधार आहेत. कारण आज बहूतेक लोक ही तक्रार करतात की, मन परमात्म्यामध्ये लागत नाही. पहिला आधार ओळख - जेथे ओळख असते तेथे आठवण येते. स्वत:ची ओळख - मी एक आत्मा आणि सुक्ष्म ज्योती, दोन्ही भुवयांच्यामध्ये चमकणारा अजर-अमर, अविनाशी सितारा, शरीर विनाशी पंचतत्वाचा पुतळा, शरीराला चालविणारी शक्ती आत्मा, आत्मा ज्याची आठवण करावयाची, योग्य लावायचा तो परमात्मा शिव सर्व आत्म्याचा पिता, ज्याला सर्व देवांनी पुजले. सर्व धर्मात ज्याची मान्यता आहे. जो सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यांचे रूप आत्म्याप्रमाणे ज्योती आहेत. पण ते गुणाचे सिंधू आहे. सर्व शक्तीवान आहेत. दुसरा आधार संबंध जेथे संबंध तेथे आठवण परमात्म्याशी मुख्य रूपात ६ संबंध जोडू शकतो. १) टिचर-स्टूडंट, २) गुरू व शिष्य, ३) दोस्त, ४) साजन-सजनी, ५) पती-पत्नी, ६) ईश्वराला आपला मुलगा समजा, भक्ती मार्गात आपण म्हणतो, तुम्ही हो माता, पिता, बंधु, सखा, स्वामी पण राजयोगाच्या आधारावर प्रॅक्टीकल त्या संबंधाची अनुभूती करू शकतो. तिसरा आधार स्नेह, पे्रम - जेथे प्रेम तेथे स्वाभाविकच आठवण येते. परमात्म्याशी जवळचा संबंध जोडला की प्रेम उत्पन्न होते. तेव्हा आठवण करण्याची गरज नाही. स्वाभाविक आठवण येते.चौथा आधार प्राप्ती - कोणाकडून काही फायदा आहे. काही मिळणार असेल तर आठवण येते. स्वार्थाच्या आधारावर आठवण, परिचय आधारावर आठवण करण्यास मेहनत लागते. आठवण करावी लागते संबंधाच्या आधारावर आठवण सतावते. स्नेहाच्या आधारावर आठवण समावून जाते तल्लीन होते. प्राप्तीच्या आधारावर आठवण - स्वार्थी आठवण. परमात्म्याशी आपली आठवण सामावून जाणारी  असावी. त्या आठवणीतून सुख मिळेल. संबंध जर पक्का असेल त्याच्याविषयी प्रेम आपोआप निर्माण होईल तेथे आठवण आपोआप येईल.भक्त प्रल्हादाने माता-पित्याच्या रूपात आठवण केली तर ईश्वर माता-पिता बनले. अर्जुनाने दोस्ताच्या रूपात आठवण केली तर ईश्वर दोस्त बनले. संत मिराबाईने प्रियतमाच्या रूपात आठवण केली तर प्रियतम बनले. सती अनुसयाने मुलाच्या स्वरूपात आठवण केली तर मुलगा बनले. ईश्वर जगात अशी शक्ती आहे की आपण जो संबंध जोडू तो संबंध ते प्रामाणिक निभावतात. अशा प्रकारे आपण सहज राजयोग शिकुन आपले प्रॅक्टीकल योगी जीवन बनवू शकतो.राजयोगाचे फायदेराजयोग खºया अर्थाने जीवन जगण्याची कला शिकवतो, राजयोगाव्दारे प्रत्येक कर्मात, सफलता येते, एकाग्रता वाढते, मनोबल वाढते, विचारात दृढता येते, तणाव दूर होवून निश्चीत आनंदी जीवन बनते, विकारावर विजय प्राप्त करून दिव्य गुणांची धारणा होते, विचारात शुध्दता येते, दृष्टीकोन सकारात्मक व शुध्द बनतो.

 

- बी.के.शकुंतला दिदी,ब्रम्हाकुमारीज् सेवा केंद्र,खामगाव.जि.बुलडाणा 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकYogaयोग