शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गुणसंपत्ती हेच खरे वैभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 12:10 IST

ज्ञानाने संपन्न असणारा नेहमीकरिता कधीच गरिबीत राहत नाही आणि एखादा खूप वैभवशाली, समृद्ध आहे; परंतु मूर्ख असेल तर त्याच्याजवळ वैभव हे टिकून राहत नाही.

सर्वसामान्य लोक घरदार, जमीन, सुखसाधने आणि द्रव्य यालाच ऐश्वर्य समजतात; परंतु ऐश्वर्य मोजायचे असेल तर ज्ञान आणि कर्तृत्वात मोजायला हवे. कारण ज्ञानाने संपन्न असणारा नेहमीकरिता कधीच गरिबीत राहत नाही आणि एखादा खूप वैभवशाली, समृद्ध आहे; परंतु मूर्ख असेल तर त्याच्याजवळ वैभव हे टिकून राहत नाही. अशा प्रकारची अनेक उदाहरणे समाज जीवनात प्रत्ययास येतात.भगवंताने गुणांनाच महत्त्व दिले आहे. त्यासंबंधीचे एक उदाहरण दृष्टीसमोर येते. बलरामाची वत्सला नावाची मुलगी होती. ती दुर्योधन पुत्र लक्ष्मणास देण्याचे बलरामांनी ठरविले. कारण लक्ष्मण हा ऐश्वर्यशाली घरातील होता; परंतु ती वत्सला मुलगी अर्जुन पुत्र अभिमन्यू यास देण्याचे गोपालकृष्णांनी बलरामास सुचविले. बलराम म्हणाले, कृष्णा अभिमन्यू हा वनवासी आहे. त्याच्याजवळ वैभव नाही. काय उपयोग? परंतु कृष्णाने बलरामाची समजूत घालून वत्सला अभिमन्यूला दिली. कारण तो गुणाने श्रीमंत होता. गीतेनेसुद्धा गुणांनाच श्रीमंती संबोधिले आहे. जीवनामध्ये ज्ञान ही खरी संपत्ती आहे. कारण ज्ञानातून वैभव निर्माण होऊ शकते. वैभवातून ज्ञान निर्माण होण्याची काही खात्री नसते. हे त्रिवार सत्य आहे. म्हणूनच विद्यार्थी जीवनात गुणांचे भांडवल जमा करता आले पाहिजे. गुण संपत्तीनेच आपले जीवन समृद्ध होते आणि दुर्गुणामुळे जीवनाचे सूत्र पूर्णत: विस्कटून जाते.श्रीमद्भगवद्गीतेत संपत्तीचे दोन प्रकार सांगितले आहेत १) दैवी संपत्ती २) आसुरी संपत्ती. १६ व्या अध्यायात दैवी संपत्तीचे २६ गुण आहेत. दैवी संपत्तीचा पहिला गुण निर्भयता असून, शेवटचा गुण नम्रता आहे. दैवी संपत्तीला भरती आली तर जीवनाची दिवाळी होते. ओहोटी लागली तर जीवनाचे दिवाळे वाजते. दैवी संपत्तीमुळे प्रकृती संस्कृत होते. दैवी संपत्ती मिळविण्यासाठी रवींद्रनाथ म्हणतात आपण संपूर्ण शरणागती (प्रभूचरणी) स्वीकारली पाहिजे.आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक सुखानंदाचा नाश करणारे ६ दुर्गण आहेत.दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध : पारुष्यमेवचअज्ञानं चाभि जातस्य पार्थ संपदमासुरीम अ १६/४ (गीता)ह्यालाच आसुरी संपत्ती म्हटले आहे. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोरता, अज्ञानामुळे माणसाची दुर्गती होते. ज्ञानेश्वर माउली म्हणतात,धातयाही गेलिया शरण । त्रिदोषी न चुके मरणतथा तिहिंची दुही जाण । साही दोष हे ।।जीवनात दैवी गुण मिळविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्याकरिता शुद्ध स्वरूपी ज्ञान आणि दैवी संपत्तीवर श्रद्धाभाव जपला पाहिजे. भारतीय संस्कृतीने शुद्ध ज्ञानावर अधिष्ठित अनेक श्रद्धा सामाजिक मनात रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. गीताशास्त्राच्या मते चांगले कर्म करीत राहावे.एका छोट्या मुलाने ८५ वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला आंब्याचे झाड लावताना पाहिले. तो म्हणाला, ‘आजोबा! ह्या झाडाचे आंबे तुम्हाला खायला मिळणार नाही कारण तुमचे वयोमान खूप झाले. तेव्हा आजोबांनी उत्तर दिले, बाळ ज्या आंब्याची फळे मी खाल्ली ते झाड मी थोडेच लावले होते. कोणीतरी पूर्वजांनी लावले. त्यांचे हे सत्कर्म. आपल्या जीवनातील मोठी कामे याच विशाल दृष्टीतून होत असतात. फळाची अपेक्षा न करता श्रेष्ठ कर्म आपल्या जीवनात पूर्ण होतीलच असे नाही; पण सत्कर्म गुण जोपासला पाहिजे. कर्मापेक्षा कर्माकडे पाहण्याची आंतरिक दृष्टी महत्त्वाची. आपल्या सर्वच कर्मांनी ईश्वराची पूजा करावी. जीवनातील प्रत्येक काम ईश्वरार्पण भावनेने करावे. कर्म कोणत्या भावनेने करीत आहो, याला महत्त्व आहे. जेथे-जेथे श्रेष्ठता आहे, गुणांचा उत्कर्ष आहे, शील कर्माचे सौंदर्य आहे, तेथे-तेथे भगवंताचे अधिक तेज प्रगट झाले आहे.- ज्ञानेश्वर मिरगे(शेगाव) 

टॅग्स :Akolaअकोलाspiritualअध्यात्मिक