शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये थरार! AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग, भाजपा इच्छुकांचा कारनामा
2
शक्तिप्रदर्शन करत आला, पण अर्जच विसरला! धापा टाकत कार्यकर्ता अखेर अर्ज घेऊन आला
3
Amit Shah : Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले
4
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
5
मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या किती संयुक्त सभा होणार?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
नाराजी टाळण्यासाठी एबी फॉर्मबाबत सस्पेन्स, उमेदवारीसाठी आज अखेरचा दिवस : युतीची शक्यता कमीच
7
उद्धवसेना, मनसेने अमराठी उमेदवारांनाही दिलं तिकीट; 'मराठीचा नारा' देणाऱ्या ठाकरे बंधूंचं काय आहे 'गणित'?
8
जालना मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा; शिंदेसेना-भाजपात १२ प्रभागांतील जागांवर एकमत
9
Nashik Municipal Corporation Election : नाशकात शिंदेसेना-राष्ट्रवादी एकत्र; महायुतीत फूट तर मविआत एकजूट, भाजपकडून 'ही' नावं निश्चित
10
काहीतरी मोठं घडणार! चीनची आक्रमक हालचाल, तैवानला सैन्याने वेढा घातला; विमानांची उड्डाणेही रद्द
11
Municipal Election 2026: सुरुवात झाली! अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेची युती तुटली...
12
वादळाने दृष्टी हिरावली, 'दिव्यदृष्टी'ने भाकितं वर्तवली; बाबा वेंगा कोण होत्या? त्यांनी खरंच हे सगळं लिहून ठेवलंय?
13
फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून?
14
विरोधकांच्या एकीला तडे; वसई-विरारमध्ये उद्धवसेना स्वबळावर, महायुतीतील मित्रपक्षाचा पाठिंबा
15
बच्चू कडूंच्या प्रहारची उद्धवसेनेसोबत युती, पण उमेदवार लढणार मशाल चिन्हावर!
16
Travel : चला, प्रेमाच्या शहरात! आयफेल टॉवर अन् सीन नदीच्या काठावर फिरण्यासाठी असा करा परफेक्ट प्लॅन
17
मिशन बंगाल; अमित शाहांनी रणनीती आखली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींचा सामना करणार...
18
मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून ५६ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध, अमराठी आणि मुस्लिम चेहऱ्यांना दिलं प्राधान्य   
19
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
20
बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका
Daily Top 2Weekly Top 5

गुणसंपत्ती हेच खरे वैभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 12:10 IST

ज्ञानाने संपन्न असणारा नेहमीकरिता कधीच गरिबीत राहत नाही आणि एखादा खूप वैभवशाली, समृद्ध आहे; परंतु मूर्ख असेल तर त्याच्याजवळ वैभव हे टिकून राहत नाही.

सर्वसामान्य लोक घरदार, जमीन, सुखसाधने आणि द्रव्य यालाच ऐश्वर्य समजतात; परंतु ऐश्वर्य मोजायचे असेल तर ज्ञान आणि कर्तृत्वात मोजायला हवे. कारण ज्ञानाने संपन्न असणारा नेहमीकरिता कधीच गरिबीत राहत नाही आणि एखादा खूप वैभवशाली, समृद्ध आहे; परंतु मूर्ख असेल तर त्याच्याजवळ वैभव हे टिकून राहत नाही. अशा प्रकारची अनेक उदाहरणे समाज जीवनात प्रत्ययास येतात.भगवंताने गुणांनाच महत्त्व दिले आहे. त्यासंबंधीचे एक उदाहरण दृष्टीसमोर येते. बलरामाची वत्सला नावाची मुलगी होती. ती दुर्योधन पुत्र लक्ष्मणास देण्याचे बलरामांनी ठरविले. कारण लक्ष्मण हा ऐश्वर्यशाली घरातील होता; परंतु ती वत्सला मुलगी अर्जुन पुत्र अभिमन्यू यास देण्याचे गोपालकृष्णांनी बलरामास सुचविले. बलराम म्हणाले, कृष्णा अभिमन्यू हा वनवासी आहे. त्याच्याजवळ वैभव नाही. काय उपयोग? परंतु कृष्णाने बलरामाची समजूत घालून वत्सला अभिमन्यूला दिली. कारण तो गुणाने श्रीमंत होता. गीतेनेसुद्धा गुणांनाच श्रीमंती संबोधिले आहे. जीवनामध्ये ज्ञान ही खरी संपत्ती आहे. कारण ज्ञानातून वैभव निर्माण होऊ शकते. वैभवातून ज्ञान निर्माण होण्याची काही खात्री नसते. हे त्रिवार सत्य आहे. म्हणूनच विद्यार्थी जीवनात गुणांचे भांडवल जमा करता आले पाहिजे. गुण संपत्तीनेच आपले जीवन समृद्ध होते आणि दुर्गुणामुळे जीवनाचे सूत्र पूर्णत: विस्कटून जाते.श्रीमद्भगवद्गीतेत संपत्तीचे दोन प्रकार सांगितले आहेत १) दैवी संपत्ती २) आसुरी संपत्ती. १६ व्या अध्यायात दैवी संपत्तीचे २६ गुण आहेत. दैवी संपत्तीचा पहिला गुण निर्भयता असून, शेवटचा गुण नम्रता आहे. दैवी संपत्तीला भरती आली तर जीवनाची दिवाळी होते. ओहोटी लागली तर जीवनाचे दिवाळे वाजते. दैवी संपत्तीमुळे प्रकृती संस्कृत होते. दैवी संपत्ती मिळविण्यासाठी रवींद्रनाथ म्हणतात आपण संपूर्ण शरणागती (प्रभूचरणी) स्वीकारली पाहिजे.आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक सुखानंदाचा नाश करणारे ६ दुर्गण आहेत.दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध : पारुष्यमेवचअज्ञानं चाभि जातस्य पार्थ संपदमासुरीम अ १६/४ (गीता)ह्यालाच आसुरी संपत्ती म्हटले आहे. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोरता, अज्ञानामुळे माणसाची दुर्गती होते. ज्ञानेश्वर माउली म्हणतात,धातयाही गेलिया शरण । त्रिदोषी न चुके मरणतथा तिहिंची दुही जाण । साही दोष हे ।।जीवनात दैवी गुण मिळविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्याकरिता शुद्ध स्वरूपी ज्ञान आणि दैवी संपत्तीवर श्रद्धाभाव जपला पाहिजे. भारतीय संस्कृतीने शुद्ध ज्ञानावर अधिष्ठित अनेक श्रद्धा सामाजिक मनात रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. गीताशास्त्राच्या मते चांगले कर्म करीत राहावे.एका छोट्या मुलाने ८५ वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला आंब्याचे झाड लावताना पाहिले. तो म्हणाला, ‘आजोबा! ह्या झाडाचे आंबे तुम्हाला खायला मिळणार नाही कारण तुमचे वयोमान खूप झाले. तेव्हा आजोबांनी उत्तर दिले, बाळ ज्या आंब्याची फळे मी खाल्ली ते झाड मी थोडेच लावले होते. कोणीतरी पूर्वजांनी लावले. त्यांचे हे सत्कर्म. आपल्या जीवनातील मोठी कामे याच विशाल दृष्टीतून होत असतात. फळाची अपेक्षा न करता श्रेष्ठ कर्म आपल्या जीवनात पूर्ण होतीलच असे नाही; पण सत्कर्म गुण जोपासला पाहिजे. कर्मापेक्षा कर्माकडे पाहण्याची आंतरिक दृष्टी महत्त्वाची. आपल्या सर्वच कर्मांनी ईश्वराची पूजा करावी. जीवनातील प्रत्येक काम ईश्वरार्पण भावनेने करावे. कर्म कोणत्या भावनेने करीत आहो, याला महत्त्व आहे. जेथे-जेथे श्रेष्ठता आहे, गुणांचा उत्कर्ष आहे, शील कर्माचे सौंदर्य आहे, तेथे-तेथे भगवंताचे अधिक तेज प्रगट झाले आहे.- ज्ञानेश्वर मिरगे(शेगाव) 

टॅग्स :Akolaअकोलाspiritualअध्यात्मिक