शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
4
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
5
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
6
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
7
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
8
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
9
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
10
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
11
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
12
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
13
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
14
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
15
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
16
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
18
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
19
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
20
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

सकारात्मक विचारानेच जीवनात यशप्राप्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 17:09 IST

संत तुकाराम माऊलींनी अत्यंत मार्मिक स्वरूपात कर्माची फळे वरीलप्रमाणे वर्णन केली आहेत. मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर सद्विचार सद्वर्तन यांची कास धरून मोक्ष पंत आगमन करणे शक्य आहे.

- भालचंद्र संगनवारबीज तेंचि फळ येईल शेवटी ।लाभ हनितुटी ज्याची तया।।संत तुकाराम माऊलींनी अत्यंत मार्मिक स्वरूपात कर्माची फळे वरीलप्रमाणे वर्णन केली आहेत. मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर सद्विचार सद्वर्तन यांची कास धरून मोक्ष पंत आगमन करणे शक्य आहे. असे असतानादेखील काम, क्रोध, मद, मत्सर अशा गुणांचा अंगीकार केला जातो. आणि शेवटी काय तर हे कसे झाले यावर चिंता करीत बसतो. आयुष्यभराची कामे केली. त्याचे फळ निश्चितच प्राप्त होते. चांगल्या गोष्टी अंगीकार केल्यास चांगल्या गोष्टी दृष्टिक्षेपात येतात. 

पेरिलीया एरंड । ऊस मागील कवण्या तोंड ।। 

आपल्या शेतात जर एरंड लावले असेल तर ऊस येईल आणि मी त्याचा गोड रस तयार करण्याची अपेक्षा फक्त मूर्ख व्यक्तीच करतात. आपल्या आजूबाजूच्या विविध प्रवृत्ती दिसून येतात. सर्व वाईटच घडते आहे असे नाही. कित्येक व्यक्ती आणि प्रसंग या ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती देऊन जातात. बहुतांशी ध्येयवेडे समाजाच्या, निसर्गाच्या, परंपरेच्या वाढीसाठी रात्रंदिवस कष्ट करताना दिसतात. त्यांना कोणीही प्रेरित करीत नाही तर ते अंत:प्रेरणेने कार्य करताना दिसतात. ईश्वराचा पाईक या नात्याने चांगल्या विचारांनी ते प्रेरित असतात आणि समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. हे करीत असताना मात्र ते अत्यंत निर्विकार व निरागस पद्धतीने त्यांचे कार्य करतात. जसे काही मानवरुपात आगात शक्ती अवतरले आहे. या कार्याचा मात्र ते कधी दंभाचार, गर्व, मत्सर अथवा गवगवा करीत नाही. या उलट ते म्हणतात,

फोडीले भांडार धन्याचा हा माल ।तेथे मी हमाल भार वाही ।।

या भूमातेचे, निसर्गाचे व समाजाचे प्रत्येक प्राणिमात्राला अनंत उपकार आहेत. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत निसर्गावर व समाजावर अवलंबून राहावे लागते. त्यात स्वत:च्या श्रमाचा वाटा असणे क्रमप्राप्त आहे. तो श्रमाचा वाटा किती प्रमाणात आहे, याला महत्त्व नसून तो किती सात्विक भावनेने व प्रेरणेने केलेला आहे, याला महत्त्व आहे. याचे एक उदाहरण म्हणजे एका जंगलात वणवा पेटला होता. वाढली झाडे, पाणी तर आगीच्या भक्ष्यस्थानी होते तर त्यासोबत उभी डोलदार झाडेदेखील गिळंकृत करीत होती. आपापल्यापरीने सर्वांनी मिळून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न स्थानिक करीत होते. त्यामध्येच एक चिमणी आपल्या चोचीत जेवढे पाण्याचे थेंब असतील तेवढे थेंब  घ्यायचे आणि जेथे वणवा पेटला होता त्यावर आणून शिडकाव करू लागली. असा आग विझविण्याचा चिमणीचा प्रयत्न चालूच होता. ही बाब तेवढीच सत्य होती की, तिच्या योगदानाने फारसा फरक पडणार नव्हता. तेवढ्यात दुसºया पक्ष्याने विचारले की, हे तू काय करतेस? तुला माहिती आहे तुझ्या इवल्याशा चोचीतील पाण्याने या आगीवर नियंत्रण आणले जाऊ शकत नाही. त्यावर त्या चिमणीने उत्तर दिले... हे मी जाणते; परंतु प्रयत्न करणाºयाच्या यादीत मी असेल. जेणेकरून हताशी, निरुत्साही प्रवृत्ती माझ्याजवळदेखील फिरकणार नाही. समाजात जाणून-बुजून अलिप्त स्वरूपाच्या काही व्यक्ती असतात. जसे त्यांची या पृथ्वीतळाशी काही देणेघेणे नाही आणि या भूतलावर ते पाहुणे आहेत. त्यांचे विश्व हे स्व म्हणजेच मी आणि माझे यामध्येच विलुप्त झालेले आहे. अशा अनुभूतीबाबत संत कबीर म्हणतात,बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजूर। पण ती को छाया नही फल लागे अति दूर ।।खजुराच्या झाडासारखे मोठे होऊन काही समाजाच्या उपयोगाचे नाही तर आपल्यात सकारात्मक समाजहित साधावे हीच अपेक्षा.

(लेखक वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक