शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

सकारात्मक विचारानेच जीवनात यशप्राप्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 17:09 IST

संत तुकाराम माऊलींनी अत्यंत मार्मिक स्वरूपात कर्माची फळे वरीलप्रमाणे वर्णन केली आहेत. मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर सद्विचार सद्वर्तन यांची कास धरून मोक्ष पंत आगमन करणे शक्य आहे.

- भालचंद्र संगनवारबीज तेंचि फळ येईल शेवटी ।लाभ हनितुटी ज्याची तया।।संत तुकाराम माऊलींनी अत्यंत मार्मिक स्वरूपात कर्माची फळे वरीलप्रमाणे वर्णन केली आहेत. मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर सद्विचार सद्वर्तन यांची कास धरून मोक्ष पंत आगमन करणे शक्य आहे. असे असतानादेखील काम, क्रोध, मद, मत्सर अशा गुणांचा अंगीकार केला जातो. आणि शेवटी काय तर हे कसे झाले यावर चिंता करीत बसतो. आयुष्यभराची कामे केली. त्याचे फळ निश्चितच प्राप्त होते. चांगल्या गोष्टी अंगीकार केल्यास चांगल्या गोष्टी दृष्टिक्षेपात येतात. 

पेरिलीया एरंड । ऊस मागील कवण्या तोंड ।। 

आपल्या शेतात जर एरंड लावले असेल तर ऊस येईल आणि मी त्याचा गोड रस तयार करण्याची अपेक्षा फक्त मूर्ख व्यक्तीच करतात. आपल्या आजूबाजूच्या विविध प्रवृत्ती दिसून येतात. सर्व वाईटच घडते आहे असे नाही. कित्येक व्यक्ती आणि प्रसंग या ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती देऊन जातात. बहुतांशी ध्येयवेडे समाजाच्या, निसर्गाच्या, परंपरेच्या वाढीसाठी रात्रंदिवस कष्ट करताना दिसतात. त्यांना कोणीही प्रेरित करीत नाही तर ते अंत:प्रेरणेने कार्य करताना दिसतात. ईश्वराचा पाईक या नात्याने चांगल्या विचारांनी ते प्रेरित असतात आणि समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. हे करीत असताना मात्र ते अत्यंत निर्विकार व निरागस पद्धतीने त्यांचे कार्य करतात. जसे काही मानवरुपात आगात शक्ती अवतरले आहे. या कार्याचा मात्र ते कधी दंभाचार, गर्व, मत्सर अथवा गवगवा करीत नाही. या उलट ते म्हणतात,

फोडीले भांडार धन्याचा हा माल ।तेथे मी हमाल भार वाही ।।

या भूमातेचे, निसर्गाचे व समाजाचे प्रत्येक प्राणिमात्राला अनंत उपकार आहेत. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत निसर्गावर व समाजावर अवलंबून राहावे लागते. त्यात स्वत:च्या श्रमाचा वाटा असणे क्रमप्राप्त आहे. तो श्रमाचा वाटा किती प्रमाणात आहे, याला महत्त्व नसून तो किती सात्विक भावनेने व प्रेरणेने केलेला आहे, याला महत्त्व आहे. याचे एक उदाहरण म्हणजे एका जंगलात वणवा पेटला होता. वाढली झाडे, पाणी तर आगीच्या भक्ष्यस्थानी होते तर त्यासोबत उभी डोलदार झाडेदेखील गिळंकृत करीत होती. आपापल्यापरीने सर्वांनी मिळून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न स्थानिक करीत होते. त्यामध्येच एक चिमणी आपल्या चोचीत जेवढे पाण्याचे थेंब असतील तेवढे थेंब  घ्यायचे आणि जेथे वणवा पेटला होता त्यावर आणून शिडकाव करू लागली. असा आग विझविण्याचा चिमणीचा प्रयत्न चालूच होता. ही बाब तेवढीच सत्य होती की, तिच्या योगदानाने फारसा फरक पडणार नव्हता. तेवढ्यात दुसºया पक्ष्याने विचारले की, हे तू काय करतेस? तुला माहिती आहे तुझ्या इवल्याशा चोचीतील पाण्याने या आगीवर नियंत्रण आणले जाऊ शकत नाही. त्यावर त्या चिमणीने उत्तर दिले... हे मी जाणते; परंतु प्रयत्न करणाºयाच्या यादीत मी असेल. जेणेकरून हताशी, निरुत्साही प्रवृत्ती माझ्याजवळदेखील फिरकणार नाही. समाजात जाणून-बुजून अलिप्त स्वरूपाच्या काही व्यक्ती असतात. जसे त्यांची या पृथ्वीतळाशी काही देणेघेणे नाही आणि या भूतलावर ते पाहुणे आहेत. त्यांचे विश्व हे स्व म्हणजेच मी आणि माझे यामध्येच विलुप्त झालेले आहे. अशा अनुभूतीबाबत संत कबीर म्हणतात,बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजूर। पण ती को छाया नही फल लागे अति दूर ।।खजुराच्या झाडासारखे मोठे होऊन काही समाजाच्या उपयोगाचे नाही तर आपल्यात सकारात्मक समाजहित साधावे हीच अपेक्षा.

(लेखक वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक