शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सकारात्मक विचार प्रगतीकडे नेणारा : हभप चंद्रकांत महाराज वांजळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 12:30 IST

खरे तर मानवी जन्म, जीवन मिळणे ही अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची बाब आहे.

- संत साहित्याचे आणि संत विचारांचे महत्त्व मनुष्य जीवनात आहे. ‘दुर्लभम् मनुष्य देहो...’, अशी एक भूमिका संत महात्म्यांनी आणि रचनाकारांनी अनेक ठिकाणी मांडली आहे. जगद्गुरू शंकराचार्यांनीही जीवन उन्नत करणारे विचार मांडले आहेत. शंकराचार्य एका ठिकाणी म्हणतात, ‘साधू संत संग्रह या देवाच्या अनुग्रहासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत. मनुष्यत्व, मोक्षत्व, महापुरुष संचया. महापुरुषांचा असणारा आश्रय किंवा महापुरुषांची असलेली संगती. या तीन गोष्टी शास्त्रकारांनी अत्यंत दुर्लभ मानल्या आहेत. यातील प्रथम क्रमांक जर कोणता आहे, तो मनुष्यत्वाचा आहे. मनुष्यजन्माचा आहे.खरे तर मानवी जन्म, जीवन मिळणे ही अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची बाब आहे. अर्थात ही देवदुर्लभ बाब आहे. मानवी जीवन मिळून मला परमात्मा पाहिजे, देव पाहिजे अशा स्वरूपाची आणि तीव्र स्वरूपाची लालसा, अंत:करणात असणे याला मोक्षत्व म्हणतात. मानवी जीवन आणि मोक्षत्व परिपूर्ण करण्याचा संत-महात्म्यांचा समागम, या तीन गोष्टी दुर्लभ आहेत. नंतरच्या दोन गोष्टी आपण जरी दूर ठेवल्या तरी प्रथम क्रमांक त्यांनी मनुष्यत्वास दिला आहे. आयुष्याच्या साधनेत सच्चिदानंद पदवी घेणे, आपल्याला जे आयुष्य मिळाले आहे, त्या आयुष्यात आपणास सचिदानंद पदापर्यंत पोहोचता आले पाहिजे. ही लालसा जीवन उद्धारक आहे. जुने कीर्तनकार किंवा जुने संप्रदायिक विचारवंत जीवनाविषयी एक चिंतन नेहमी मांडत असत. मानवी जन्म, मानवी देह, देवलोकांना मिळाला नाही, पण मानवी देहाचे महत्त्व त्यांना कळाले. परंतु पशू, पक्षी यांना मानवी देह मिळाला नाही आणि कळालाही नाही. पण मानवी जीवनाची शोकांतिका आहे. ज्याना देह मिळाला; पण कळाला नाही, ते कळून देण्यासाठी संत साहित्य किंवा शास्त्र आहे. संत साहित्य आणि संतांचे विचार हे जीवनास पुढे नेणारे असतात. प्रगती करणारे असतात. अर्थात जीवनाविषयीची ही चर्चा आजच नाही तर किंबहुना  युगानुयुगे ही चर्चा सुरू आहे. देह हे परमात्म्याच्या प्राप्तीचे साधन आहे. 

(हभप चंद्रकांतमहाराज वांजळे, प्रसिद्ध प्रवचन, कीर्तनकार) ......

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक