शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

सकारात्मक विचार प्रगतीकडे नेणारा : हभप चंद्रकांत महाराज वांजळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 12:30 IST

खरे तर मानवी जन्म, जीवन मिळणे ही अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची बाब आहे.

- संत साहित्याचे आणि संत विचारांचे महत्त्व मनुष्य जीवनात आहे. ‘दुर्लभम् मनुष्य देहो...’, अशी एक भूमिका संत महात्म्यांनी आणि रचनाकारांनी अनेक ठिकाणी मांडली आहे. जगद्गुरू शंकराचार्यांनीही जीवन उन्नत करणारे विचार मांडले आहेत. शंकराचार्य एका ठिकाणी म्हणतात, ‘साधू संत संग्रह या देवाच्या अनुग्रहासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत. मनुष्यत्व, मोक्षत्व, महापुरुष संचया. महापुरुषांचा असणारा आश्रय किंवा महापुरुषांची असलेली संगती. या तीन गोष्टी शास्त्रकारांनी अत्यंत दुर्लभ मानल्या आहेत. यातील प्रथम क्रमांक जर कोणता आहे, तो मनुष्यत्वाचा आहे. मनुष्यजन्माचा आहे.खरे तर मानवी जन्म, जीवन मिळणे ही अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची बाब आहे. अर्थात ही देवदुर्लभ बाब आहे. मानवी जीवन मिळून मला परमात्मा पाहिजे, देव पाहिजे अशा स्वरूपाची आणि तीव्र स्वरूपाची लालसा, अंत:करणात असणे याला मोक्षत्व म्हणतात. मानवी जीवन आणि मोक्षत्व परिपूर्ण करण्याचा संत-महात्म्यांचा समागम, या तीन गोष्टी दुर्लभ आहेत. नंतरच्या दोन गोष्टी आपण जरी दूर ठेवल्या तरी प्रथम क्रमांक त्यांनी मनुष्यत्वास दिला आहे. आयुष्याच्या साधनेत सच्चिदानंद पदवी घेणे, आपल्याला जे आयुष्य मिळाले आहे, त्या आयुष्यात आपणास सचिदानंद पदापर्यंत पोहोचता आले पाहिजे. ही लालसा जीवन उद्धारक आहे. जुने कीर्तनकार किंवा जुने संप्रदायिक विचारवंत जीवनाविषयी एक चिंतन नेहमी मांडत असत. मानवी जन्म, मानवी देह, देवलोकांना मिळाला नाही, पण मानवी देहाचे महत्त्व त्यांना कळाले. परंतु पशू, पक्षी यांना मानवी देह मिळाला नाही आणि कळालाही नाही. पण मानवी जीवनाची शोकांतिका आहे. ज्याना देह मिळाला; पण कळाला नाही, ते कळून देण्यासाठी संत साहित्य किंवा शास्त्र आहे. संत साहित्य आणि संतांचे विचार हे जीवनास पुढे नेणारे असतात. प्रगती करणारे असतात. अर्थात जीवनाविषयीची ही चर्चा आजच नाही तर किंबहुना  युगानुयुगे ही चर्चा सुरू आहे. देह हे परमात्म्याच्या प्राप्तीचे साधन आहे. 

(हभप चंद्रकांतमहाराज वांजळे, प्रसिद्ध प्रवचन, कीर्तनकार) ......

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक