शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

आनंद तरंग - कृत्रिम आणि उथळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 22:57 IST

जग हे एक अस्वस्थ, चंचल वाऱ्यासारखं असतं, आता प्रश्न हा निर्माण होतो की, याला म्हणायचं तरी काय? त्यासाठी एक अभंग आहे

विजयराज बोधनकरएखादा सुशिक्षित तरुण पंढरपूरच्या वारीत सहभागी होऊन टिळा, माळा घालून अभंगवाणी म्हणायला लागला, तर हे अज्ञानी जग लगेच त्याला म्हणेल, अजूनही अंधश्रद्धेच्या जगातच वावरतोय वाटतं! त्यानेच टाय, कोट घालून एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमधून मिटिंगचे फोटो फेसबुकवर टाकले, तर जग लगेच म्हणेल, व्वा प्रगती केली पोराने. तोच तरुण एखाद्या मोठ्या टॉवरमधल्या फ्लॅटमध्ये राहायला गेला तर जग म्हणेल, एकदम टॉवरमध्ये? काही तरी काळंबेरं दिसतंय! आला कुठून इतका पैसा? कुणी सुशिक्षित रिक्षातून फिरताना दिसला तर जग नक्की कपाळावर आठ्या घालून म्हणेल, जमली नाही वाटतं अजून करिअरची गणितं? अजूनही रिक्षानेच फिरतोय? कुणी युरोप, अमेरिकेवरून स्वत:चे फेसबुकवर फोटो आपलोड केले, तर मग त्याची आरती ओवाळून जग नक्की म्हणेल की, फारच मोठी भरारी घेतली बरं का?

जग हे एक अस्वस्थ, चंचल वाऱ्यासारखं असतं, आता प्रश्न हा निर्माण होतो की, याला म्हणायचं तरी काय? त्यासाठी एक अभंग आहे आणि तो म्हणजे, ‘का रे भुललाशी वरलीया रंगा?’ हे बेभरवशाचं जग वरच्या दिसणाºया आवरणावर भाळत राहतं, पण ते माणसाच्या अंतरंगी कुठला, किती ज्ञानी, सुसंस्कृत आहे याचा अभ्यास न करता वरवर दिसणाºया मृगजळाकडे बघून बोलत सुटतं. अशा उथळ बोलण्यावर, प्रशंसेवर, चेष्टा करण्यावर जो विचार करीत बसतो तो मानसिकदृष्ट्या खचतच जातो. असे समजावे हे बहुरूपी जग अजून त्याला उमजलेच नाही. इथे महत्त्वाचे हे आहे की, चंचल जगाचा विचार करून जगण्यापेक्षा बुद्धिमतेचा, आनंदाचा विचार करून आयुष्याचा प्रवास करणारा उज्ज्वल आयुष्य जगू शकतो, भ्रम निर्माण करणाºयाकडे, दु:खाकडे, सुखाकडे जो पाठ फिरवेल, त्याकडे सदैव आनंदाच्या उत्तरांचीच गंगाजळी असेल. या कृत्रिम जगापासून आणि उथळ समाजापासून जो मुक्त राहील, तोच अध्यात्माचा, आनंदाचा, यशाचा वारकरी होत जाईल. 

टॅग्स :PandharpurपंढरपूरAdhyatmikआध्यात्मिक