शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आनंद तरंग - भौतिक प्रकृतीपल्याड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 05:42 IST

आनंद तरंग

सद्गुरू जग्गी वासुदेव   

एक मनुष्य जर त्याच्या परम प्रकृतीच्या प्राप्तीसाठी इच्छुक नसेल, जर तो स्वत:ला एक स्वयं-सुखी मांसाचा गोळा बनविण्याच्या प्रयत्नात असेल, तर अशा प्रकारचे जगणे एक अगदी क्षुद्र पातळीचे जगणे आहे. आज जगात या प्रकारचं जगणं रूढ होत आहे. जीवनशैली पूर्णपणे बदलून गेली आहे. निसर्गापासून मनुष्य दूर जात आहे आणि कृत्रिम जगात, आभासी दुनियेत जगत आहे. अन्नापासून साऱ्याच बाबी बनावटी होत चालल्या आहेत. जगणंच भेसळयुक्त झालं आहे. आधुनिक काळात वावरणारा मनुष्य अशा कचकड्याच्या जीवनशैलीच्या मागे झटत आहे. उर फुटेपर्यंत धावत आहे. एखाद्या व्यक्तीत भीती, लालसा, राग, चिंता, न्यूनगंड, अहंकार असे अनेक दोष असू शकतात, पण जोपर्यंत तो भौतिक अस्तित्वाच्या वर उठण्यासाठी प्रयत्नशील आहे, तोवर त्याला वाव आहे. पण जर कोणी केवळ भौतिक प्रकृतीच्या समाधानाप्रती समर्पित असेल, तर त्याच्यासाठी कुठलाच मार्ग नाही. त्याचे परत मागे फिरण्याचे मार्ग संपलेले असतात. दोर नियतेने कापून टाकलेले असतात. जेव्हा एक मनुष्य असा विचार करतो, ‘मी म्हणजे सर्वस्व, मी जे काही आहे तेच सर्वकाही आहे.

मी जे काही जाणतो, ते परिपूर्ण आहे, माझं अस्तित्व म्हणजे सर्वस्व’ या प्रकारची मानवी अवस्था अगदी निकृष्ट आहे. ही भावनाच पूर्णपणे चुकीची आहे. त्यात अहंचा दर्प असतो. खोटा समज अधिकाधिक पोखरत जातो, हे त्याला कळतही नाही. जेव्हा त्याला हे कळायला सुरु वात होते की, आपल्याशिवाय या जगात विशाल असं काहीतरी प्राप्त करण्याजोगं आहे, हे आध्यात्मिक प्रक्रियेत पहिलं पाऊल आहे. जेव्हा मनुष्याला याची जाणीव होऊ लागते की, ‘मी जिथं आहे ते पुरेसं नाही, अस्तित्वात आणखी पुष्कळ काहीतरी आहे. फक्त माझं अस्तित्व म्हणजे सर्वस्व नव्हे,’ याची जाणीव होते, तेव्हा त्याची आध्यात्मिक प्रक्रिया आधीच सुरू झालेली असेल. हा उन्नत्तीचा मार्गच त्याला मोठ्या उंचीवर घेऊन जातो. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक