शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आनंद तरंग - भौतिक प्रकृतीपल्याड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 05:42 IST

आनंद तरंग

सद्गुरू जग्गी वासुदेव   

एक मनुष्य जर त्याच्या परम प्रकृतीच्या प्राप्तीसाठी इच्छुक नसेल, जर तो स्वत:ला एक स्वयं-सुखी मांसाचा गोळा बनविण्याच्या प्रयत्नात असेल, तर अशा प्रकारचे जगणे एक अगदी क्षुद्र पातळीचे जगणे आहे. आज जगात या प्रकारचं जगणं रूढ होत आहे. जीवनशैली पूर्णपणे बदलून गेली आहे. निसर्गापासून मनुष्य दूर जात आहे आणि कृत्रिम जगात, आभासी दुनियेत जगत आहे. अन्नापासून साऱ्याच बाबी बनावटी होत चालल्या आहेत. जगणंच भेसळयुक्त झालं आहे. आधुनिक काळात वावरणारा मनुष्य अशा कचकड्याच्या जीवनशैलीच्या मागे झटत आहे. उर फुटेपर्यंत धावत आहे. एखाद्या व्यक्तीत भीती, लालसा, राग, चिंता, न्यूनगंड, अहंकार असे अनेक दोष असू शकतात, पण जोपर्यंत तो भौतिक अस्तित्वाच्या वर उठण्यासाठी प्रयत्नशील आहे, तोवर त्याला वाव आहे. पण जर कोणी केवळ भौतिक प्रकृतीच्या समाधानाप्रती समर्पित असेल, तर त्याच्यासाठी कुठलाच मार्ग नाही. त्याचे परत मागे फिरण्याचे मार्ग संपलेले असतात. दोर नियतेने कापून टाकलेले असतात. जेव्हा एक मनुष्य असा विचार करतो, ‘मी म्हणजे सर्वस्व, मी जे काही आहे तेच सर्वकाही आहे.

मी जे काही जाणतो, ते परिपूर्ण आहे, माझं अस्तित्व म्हणजे सर्वस्व’ या प्रकारची मानवी अवस्था अगदी निकृष्ट आहे. ही भावनाच पूर्णपणे चुकीची आहे. त्यात अहंचा दर्प असतो. खोटा समज अधिकाधिक पोखरत जातो, हे त्याला कळतही नाही. जेव्हा त्याला हे कळायला सुरु वात होते की, आपल्याशिवाय या जगात विशाल असं काहीतरी प्राप्त करण्याजोगं आहे, हे आध्यात्मिक प्रक्रियेत पहिलं पाऊल आहे. जेव्हा मनुष्याला याची जाणीव होऊ लागते की, ‘मी जिथं आहे ते पुरेसं नाही, अस्तित्वात आणखी पुष्कळ काहीतरी आहे. फक्त माझं अस्तित्व म्हणजे सर्वस्व नव्हे,’ याची जाणीव होते, तेव्हा त्याची आध्यात्मिक प्रक्रिया आधीच सुरू झालेली असेल. हा उन्नत्तीचा मार्गच त्याला मोठ्या उंचीवर घेऊन जातो. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक