शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

आनंद तरंग - भौतिक प्रकृतीपल्याड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 05:42 IST

आनंद तरंग

सद्गुरू जग्गी वासुदेव   

एक मनुष्य जर त्याच्या परम प्रकृतीच्या प्राप्तीसाठी इच्छुक नसेल, जर तो स्वत:ला एक स्वयं-सुखी मांसाचा गोळा बनविण्याच्या प्रयत्नात असेल, तर अशा प्रकारचे जगणे एक अगदी क्षुद्र पातळीचे जगणे आहे. आज जगात या प्रकारचं जगणं रूढ होत आहे. जीवनशैली पूर्णपणे बदलून गेली आहे. निसर्गापासून मनुष्य दूर जात आहे आणि कृत्रिम जगात, आभासी दुनियेत जगत आहे. अन्नापासून साऱ्याच बाबी बनावटी होत चालल्या आहेत. जगणंच भेसळयुक्त झालं आहे. आधुनिक काळात वावरणारा मनुष्य अशा कचकड्याच्या जीवनशैलीच्या मागे झटत आहे. उर फुटेपर्यंत धावत आहे. एखाद्या व्यक्तीत भीती, लालसा, राग, चिंता, न्यूनगंड, अहंकार असे अनेक दोष असू शकतात, पण जोपर्यंत तो भौतिक अस्तित्वाच्या वर उठण्यासाठी प्रयत्नशील आहे, तोवर त्याला वाव आहे. पण जर कोणी केवळ भौतिक प्रकृतीच्या समाधानाप्रती समर्पित असेल, तर त्याच्यासाठी कुठलाच मार्ग नाही. त्याचे परत मागे फिरण्याचे मार्ग संपलेले असतात. दोर नियतेने कापून टाकलेले असतात. जेव्हा एक मनुष्य असा विचार करतो, ‘मी म्हणजे सर्वस्व, मी जे काही आहे तेच सर्वकाही आहे.

मी जे काही जाणतो, ते परिपूर्ण आहे, माझं अस्तित्व म्हणजे सर्वस्व’ या प्रकारची मानवी अवस्था अगदी निकृष्ट आहे. ही भावनाच पूर्णपणे चुकीची आहे. त्यात अहंचा दर्प असतो. खोटा समज अधिकाधिक पोखरत जातो, हे त्याला कळतही नाही. जेव्हा त्याला हे कळायला सुरु वात होते की, आपल्याशिवाय या जगात विशाल असं काहीतरी प्राप्त करण्याजोगं आहे, हे आध्यात्मिक प्रक्रियेत पहिलं पाऊल आहे. जेव्हा मनुष्याला याची जाणीव होऊ लागते की, ‘मी जिथं आहे ते पुरेसं नाही, अस्तित्वात आणखी पुष्कळ काहीतरी आहे. फक्त माझं अस्तित्व म्हणजे सर्वस्व नव्हे,’ याची जाणीव होते, तेव्हा त्याची आध्यात्मिक प्रक्रिया आधीच सुरू झालेली असेल. हा उन्नत्तीचा मार्गच त्याला मोठ्या उंचीवर घेऊन जातो. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक