शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Pitru Paksha 2019 : पितृपक्षात यापैकी एक तरी काम नक्की करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 09:08 IST

प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार जमेल तसे करावे व पितरांचे स्मरण केल्याशिवाय राहू नये, असे शास्त्र सांगते.

भाद्रपद कृष्णपक्ष हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो व या काळात आपले पितर पृथ्वीवर येतात, असे शास्त्रात सांगितलेले आहे. या काळात पितरांना उद्देशून श्राद्ध करण्यास सांगितलेले आहे. परंतु अनेकांना अनेक अडचणींमुळे ते करणे शक्य होत नाही. त्यांनी या अडचणींच्या स्थितीच्या काळात काय करावे? असा प्रश्न साहजिकच पडतो. परंतु त्याचे उत्तरही शास्त्राने दिलेले आहे. प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार जमेल तसे करावे व पितरांचे स्मरण केल्याशिवाय राहू नये, असे शास्त्र सांगते. तुम्ही ज्या स्थितीत असाल त्या स्थितीत जमेल असे कर्म करून पितरांचे स्मरण करण्याची शास्त्राने सोय करून ठेवलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने पुढीलपैकी एक तरी प्रकार अवलंबून पितरांचे स्मरण करावे व त्यांच्या ऋणातून थोडे तरी उतराई व्हावे, असे शास्त्र सांगते.

१) श्राद्ध दिनी अभिप्रेत ब्राह्मण मिळाले नाहीत तर जसे ब्राह्मण मिळतील, तसे सांगून श्राद्ध करावे. परंतु कोणत्याही स्थिती चुकवू नये.

२) मातृ श्राद्ध दिनी ब्राह्मण मिळाले नाहीत तर सुवासिनी सांगून श्राद्ध करावे.

३) अनेक ब्राह्मण मिळाले नाहीत तर एक ब्राह्मण सांगून श्राद्ध करावे. जो ब्राह्मण मिळाला असेल त्याला पितृस्थानी बसवावे. देवस्थानी शालिग्राम आदि देवतेची स्थापना करून नेहमीप्रमाणे संकल्प करून श्राद्ध करावे. ते पान नंतर गाईस द्यावे किंवा पाण्यात सोडावे.

४) कोणीच ब्राह्मण मिळाले नाहीत तर दर्भाचे ब्राह्मण बसवावेत व यथाविधी श्राद्ध करावे. यास चट श्राद्ध असे म्हणतात.

५) स्वत: श्राद्ध करण्यास राजकार्य, तुरुंगवास, रोग किंवा इतर काही कारणाने असमर्थता असल्यास पुत्र, शिष्य किंवा ब्राह्मणद्वारा श्राद्ध करावे.

६) आमश्राद्ध म्हणजे शिधा देऊन श्राद्ध करावे. यात भोजनाला अनुसरून असणाऱ्या कृत्यांखेरीज बाकी सर्व विधी नेहमीप्रमाणे करावेत. प्रत्येक भोजनाला लागतो त्यापेक्षा अधिक शिधा ब्राह्मणाला द्यावा. संकटकाळी भोजनाइतकाच दिला तरी चालतो.

७) हिरण्यश्राद्ध म्हणजे द्रव्यद्वारा श्राद्ध करावे. प्रयोगात तसा उल्लेख करावा. भोजनाला लागणा-या खर्चापेक्षा जास्त, यथाशक्ती द्रव्यद्यावे. या श्राद्धात पिंडदान करीत नाहीत.

८) संकल्पविधी म्हणजेच पिंडदानाखेरीज बाकी सर्व विधी करावेत. आवाहन, स्वधा शब्द, पिंड, अग्नौकरण, विकीर व अर्घ्यदान हे विधी प्रस्तुत श्राद्धात करीत नाहीत.

९) ब्रह्मार्पणविधी म्हणजे ब्राह्मणांना बोलावून, हातपाय धुतल्यावर आसनावर बसवावे. पंचोपचाराने पूजन करून भोजन घालावे. पितृस्वरूपी जनार्दनवासुदेवो प्रीयताम असा संकल्प करावा.

१०) होम श्राद्ध म्हणजे द्रव्य व ब्राह्मण यांच्या अभावी अन्न शिजवून उदीरतामवर या सूक्ताची प्रत्येक ऋचा म्हणून अग्नीत होम करावा. (हाश्राद्धविधी उत्तरक्रियेच्या वेळी करतात.)

११) पिंड श्राद्ध म्हणजे संकल्पपूर्वक केवळ पिंडदान करावे. ब्राह्मणभोजन वगैरे विधी येथे करीत नाहीत.

१२) वरील काहीही करण्यास असमर्थ असलेल्या माणसाने उदकपूर्व कुंभ द्यावा.

१३) थोडे अन्न द्यावे.

१४) तीळ द्यावेत.

१५) थोडी दक्षिणा द्यावी.

१६) यथाशक्ती थोडे धान्य द्यावे.

१७) गाईला गवत घालावे.

१८) केवळ पिंड द्यावेत. (अन्य विधी करू नयेत.)

१९) स्रान करून तीळयुक्त पाण्याने पितृतर्पण करावे.

२०) थोडे गवत जाळावे.

२१) श्राद्धदिनी उपवास करावा.

२२) श्राद्धविधी वाचावा.

२३) यापेकी काहीही करणे शक्य नसेल तर रानात जाऊन गवताची काडी सूर्यादि लोकपालांना दाखवून पुढील गद्य मंत्र उच्चस्वराने म्हणावा : माझ्याजवळ श्राद्धोपयोगी धनसंपत्ती वगैरे काही नाही. मी सर्व पितरांना नमस्कार करतो. माझ्या भक्तीने माझे सर्व पितर तृप्त होवोत. माझे हात वर करून मी प्रस्तुत प्रार्थना करीत आहे.

२४) निर्मनुष्य अरण्यात जाऊन हात वर करून उच्चस्वराने म्हणावे- हे पितरांनो, मी निर्धन व अन्नरहित आहे. मला पितृऋणातून मुक्त करा.

२५) दक्षिणेकडे तोंड करून रूदन करावे. या सर्व प्रकारांवरून एक गोष्ट ध्यानात येईल की, प्रतिवर्षी येणा-या श्राद्धदिनी व पितृपक्षात पितरांना उद्देशून काही तरी केल्याशिवाय राहू नये, असे शास्त्रकारांचे म्हणणे आहे. सध्या साधारणत: लोकांत सपिंडक श्राद्ध, ब्रह्मार्पण, हिरण्यश्राद्ध किंवा आमश्राद्ध करण्याची प्रथा आहे. इतरही आचारांचा प्रचार क्वचितस्थळी सुरू आहे.

- संकलन : सुमंत अयाचित

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक