शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

तराजूच्या काट्याइतके काटेकोर व्हा, समोरच्याला भरभरून द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 14:48 IST

मानवी वृत्ती गुण-दोषाने भरली आहे. धर्म आणि अध्यात्मातून  माणसातील दुर्गूणांचा संहार करणारा विचार मिळतो. परमार्थाची शिकवण मिळते.

- धर्मराज हल्लाळे

कुराणमधील अध्याय ५५ सूरह अर रहमानमधील आयत ९ मध्ये म्हटले आहे, ‘न्यायपूर्ण रितीने ठीकठीक वजन करा आणि तराजुने तोलताना वजन कमी करू नका.’ अर्थात व्यवहारात आणि जीवनात आपली उक्ती जशी, तशी कृती असली पाहिजे. आपले वर्तन न्यायपूर्ण असले पाहिजे. जे दूसऱ्याला द्यायचे आहे किंबहुना जे काही समोरच्याचे आहे त्याला देताना ठीकठीक वजन करा. तोलताना वजन कमी करू नका. म्हणजेच समोरच्याच्या वाट्याचे त्याला सर्वार्थाने दिले पाहिजे.

मानवी वृत्ती गुण-दोषाने भरली आहे. धर्म आणि अध्यात्मातून माणसातील दुर्गूणांचा संहार करणारा विचार मिळतो. परमार्थाची शिकवण मिळते. सातत्यानेच सद्गुणांचा पुरस्कार केला जातो. तरीही माणूस स्वार्थाच्या अवतीभोवती फिरतो. स्वत:ला अधिकचे मिळाले पाहिजे आणि दुसऱ्याला देताना कमी दिले पाहिजे, ही सामान्य वृत्ती सामान्य माणसांमध्ये असते.  त्या वृत्तीला रोखणारा विचार कुराणने दिला आहे. आयातीमध्ये जे नमूद केले आहे ते केवळ व्यापार आणि व्यवहाराच्या दृष्टीने नाही. एकूणच मानवी स्वभावाला सद्वर्तनाकडे घेऊन जाणारे भाष्य केले आहे. नक्कीच आपला व्यवहार हा पारदर्शक असला पाहिजे. त्याच्यात खोट नसावी. लुबाडणूक नसावी. अगदी त्याच प्रमाणे आपल्या स्वभावातही इतराचे वाईट व्हावे हे नसावे. वस्तू देणे असो की ज्ञान देणे असो, ते तोलताना कमी तोलू नये. ज्याचा-त्याचा हिस्सा त्याला मिळाला पाहिजे. तिथे स्वार्थ आड येऊ नये. जो न्याय आपल्याला हवा आहे तोच इतरांनाही दिला जावा, ही भावना असली पाहिजे.  

मानवी स्वभाव स्वार्थाने पछाडलेला आहे. ज्यामुळे समोरच्याला देताना वजन कमी करण्याची वृत्ती बळावते. परिणामी आपण न्याय करत नाही अर्थात आपल्याकडून अन्याय होतो. जो ईश्वराला अमान्य आहे. आपणाला मिळालेली कोणतीही भूमिका असो ती प्रामाणिकपणे बजावली पाहिजे. व्यापारी असाल तर शब्दश: तराजूतील धान्य योग्यच रित्या मोजले पाहिजे़ शिक्षक असाल तर योग्य स्वरूपात ज्ञानदान केले पाहिजे. कुटुंब प्रमुख असाल की गाव प्रमुख असाल तुमचा व्यवहार हा तराजूच्या काट्यावर सर्वांसाठी समान आणि योग्यपणे जोखणारा पाहिजे. अगदी रक्ताचे नाते असो की मित्रत्वाचे नाते ते तराजूच्या काट्याइतकेच काटेकोर असले पाहिजे. अर्थात कोणाच्याही पारड्यात अन्यायाचे ओझे जाणार नाही, ही काळजी घेणाराच खऱ्या अर्थाने अध्यात्म जाणतो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक