शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

संयमाचा आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 05:08 IST

प्रत्येक गोष्टीचा बहरण्याचा एक काळ असतो. तोच काळ भान ठेवून जपला तर काळ प्रत्येकाला जपण्यासाठी वचनबद्ध असतो.

- विजयराज बोधनकरसंयम आणि शांती ही मानवी जगण्यातली सर्वांत सुंदर गोष्ट आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे झाड. बिजातून जन्म घेताना आणि नकळत विस्तारत जाताना त्याच्या वाढत्या पसाऱ्याचा कुणालाही अंदाजसुद्धा येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात बहरण्याचा काळ येत असतो.त्या त्या काळात तो तो माणूस बहरत जातो. यशाच्या पायऱ्या चढत जातो आणि संयम शांतीच्या मार्गावरच त्याचा प्रवासही सर्वांना सुखावह वाटत असतो. शांती आणि संयमाच्या दोरीलाच यशाच्या चाव्या बांधलेल्या असतात. प्रत्येक गोष्टीचा बहरण्याचा एक काळ असतो. तोच काळ भान ठेवून जपला तर काळ प्रत्येकाला जपण्यासाठी वचनबद्ध असतो. ज्ञानाच्या जाणिवेच्या परिक्रमेचासुद्धा एक कालावधी असतो. पृथ्वीवरच्या प्रत्येकाच्या बहरण्याचा कालावधी नियतीने ठरवून दिला आहे. म्हणून तर कुठल्याही नोकरीत अनुभवाच्या व्याप्तीनंतरच बढती मिळत जाते. कुठल्याही विषयाचे कौशल्य एकाएकी मिळत नसते. त्यासाठी संयमाने ज्ञानाचे ग्रहण करावे लागते़ जाणीव नावाची गोष्टसुद्धा फक्त पुस्तकी ज्ञानाचेच प्राप्त होत नसते. आजच्या तरुणाला प्रगतीसाठी संयम आणि शांतीची गरज आहे. यश मिळविण्यासाठी उमेदीच्या काळात तरी शॉर्टकट शोधू नये. जितका प्रदीर्घ प्रवास तितकी जाणिवेची श्रीमंती वाढताना दिसते. त्या त्या क्षेत्राच्या कालमर्यादेतच यश प्राप्त होण्याची शक्यता असते; आणि त्याचमुळे क्षेत्र असो कुटुंब असो त्यावर संयमाचा आणि शांतीचा आशीर्वाद असेल तर सुंदर जग आपल्या मुठीत आनंदाने यायला तयार असते़ तोच खरा सुखकारक जीवनप्रवास असतो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक