शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

संयमाचा आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 05:08 IST

प्रत्येक गोष्टीचा बहरण्याचा एक काळ असतो. तोच काळ भान ठेवून जपला तर काळ प्रत्येकाला जपण्यासाठी वचनबद्ध असतो.

- विजयराज बोधनकरसंयम आणि शांती ही मानवी जगण्यातली सर्वांत सुंदर गोष्ट आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे झाड. बिजातून जन्म घेताना आणि नकळत विस्तारत जाताना त्याच्या वाढत्या पसाऱ्याचा कुणालाही अंदाजसुद्धा येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात बहरण्याचा काळ येत असतो.त्या त्या काळात तो तो माणूस बहरत जातो. यशाच्या पायऱ्या चढत जातो आणि संयम शांतीच्या मार्गावरच त्याचा प्रवासही सर्वांना सुखावह वाटत असतो. शांती आणि संयमाच्या दोरीलाच यशाच्या चाव्या बांधलेल्या असतात. प्रत्येक गोष्टीचा बहरण्याचा एक काळ असतो. तोच काळ भान ठेवून जपला तर काळ प्रत्येकाला जपण्यासाठी वचनबद्ध असतो. ज्ञानाच्या जाणिवेच्या परिक्रमेचासुद्धा एक कालावधी असतो. पृथ्वीवरच्या प्रत्येकाच्या बहरण्याचा कालावधी नियतीने ठरवून दिला आहे. म्हणून तर कुठल्याही नोकरीत अनुभवाच्या व्याप्तीनंतरच बढती मिळत जाते. कुठल्याही विषयाचे कौशल्य एकाएकी मिळत नसते. त्यासाठी संयमाने ज्ञानाचे ग्रहण करावे लागते़ जाणीव नावाची गोष्टसुद्धा फक्त पुस्तकी ज्ञानाचेच प्राप्त होत नसते. आजच्या तरुणाला प्रगतीसाठी संयम आणि शांतीची गरज आहे. यश मिळविण्यासाठी उमेदीच्या काळात तरी शॉर्टकट शोधू नये. जितका प्रदीर्घ प्रवास तितकी जाणिवेची श्रीमंती वाढताना दिसते. त्या त्या क्षेत्राच्या कालमर्यादेतच यश प्राप्त होण्याची शक्यता असते; आणि त्याचमुळे क्षेत्र असो कुटुंब असो त्यावर संयमाचा आणि शांतीचा आशीर्वाद असेल तर सुंदर जग आपल्या मुठीत आनंदाने यायला तयार असते़ तोच खरा सुखकारक जीवनप्रवास असतो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक