शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

संयमाचा आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 05:08 IST

प्रत्येक गोष्टीचा बहरण्याचा एक काळ असतो. तोच काळ भान ठेवून जपला तर काळ प्रत्येकाला जपण्यासाठी वचनबद्ध असतो.

- विजयराज बोधनकरसंयम आणि शांती ही मानवी जगण्यातली सर्वांत सुंदर गोष्ट आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे झाड. बिजातून जन्म घेताना आणि नकळत विस्तारत जाताना त्याच्या वाढत्या पसाऱ्याचा कुणालाही अंदाजसुद्धा येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात बहरण्याचा काळ येत असतो.त्या त्या काळात तो तो माणूस बहरत जातो. यशाच्या पायऱ्या चढत जातो आणि संयम शांतीच्या मार्गावरच त्याचा प्रवासही सर्वांना सुखावह वाटत असतो. शांती आणि संयमाच्या दोरीलाच यशाच्या चाव्या बांधलेल्या असतात. प्रत्येक गोष्टीचा बहरण्याचा एक काळ असतो. तोच काळ भान ठेवून जपला तर काळ प्रत्येकाला जपण्यासाठी वचनबद्ध असतो. ज्ञानाच्या जाणिवेच्या परिक्रमेचासुद्धा एक कालावधी असतो. पृथ्वीवरच्या प्रत्येकाच्या बहरण्याचा कालावधी नियतीने ठरवून दिला आहे. म्हणून तर कुठल्याही नोकरीत अनुभवाच्या व्याप्तीनंतरच बढती मिळत जाते. कुठल्याही विषयाचे कौशल्य एकाएकी मिळत नसते. त्यासाठी संयमाने ज्ञानाचे ग्रहण करावे लागते़ जाणीव नावाची गोष्टसुद्धा फक्त पुस्तकी ज्ञानाचेच प्राप्त होत नसते. आजच्या तरुणाला प्रगतीसाठी संयम आणि शांतीची गरज आहे. यश मिळविण्यासाठी उमेदीच्या काळात तरी शॉर्टकट शोधू नये. जितका प्रदीर्घ प्रवास तितकी जाणिवेची श्रीमंती वाढताना दिसते. त्या त्या क्षेत्राच्या कालमर्यादेतच यश प्राप्त होण्याची शक्यता असते; आणि त्याचमुळे क्षेत्र असो कुटुंब असो त्यावर संयमाचा आणि शांतीचा आशीर्वाद असेल तर सुंदर जग आपल्या मुठीत आनंदाने यायला तयार असते़ तोच खरा सुखकारक जीवनप्रवास असतो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक