शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरा नेईन गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 16:21 IST

वारकरी होऊन पंढरीला जाण्यात जो आनंद आहे तो तसे जाण्यात नाही. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज सांगतात,

वारकरी होऊन पंढरीला जाण्यात जो आनंद आहे तो तसे जाण्यात नाही. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज सांगतात, ‘होय होय वारकरी’ ‘पाहे पाहे रे पंढरी १ ‘काय करावी साधने, फळ अवघेची येणे २ ‘अभिमान नुरे’ ‘कोड अवघेची पुरे’ ३ ‘तुका म्हणे डोळा’ ‘विठो बैसला सावळा ४ हा तुकाराम महाराजांचा मोलाचा उपदेश आहे. वारी म्हटले कि एक वेगळाच आनंद सोहळा असतो वारी या शब्दाचा अर्थ होतो. येरझरा करणे इतरही काही देवांच्या त्यांचे भक्त वारी करीत असतात. अगदी खंडोबाची वारी असते, कुलदैवताची सुद्धा वारी असते. हल्ली तर साईबाबाची सुद्धा वारी आणि पालखी निघत असते. अनंत काळापासून वारी म्हटले कि पंढरपूरचीच असे रूढ झाले आहे. पांडुरंग आणि वारी एक समीकरण आहे. पाण्यात मासा झोप घेतो कसा ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ याप्रमाणे असे सहज पंढरपूरला जाण्यात जेवढा आनंद नाही तेवढा आनंद वारकरी होऊन जाण्यात आहे. एखादी सासुरवाशीण जेव्हा आपल्या माहेरी जाते तेव्हा तिला जो आनंद होतो तेवढा आनंद नव्हे त्यापेक्षा जास्त आनंद वारकरी होऊन जाण्यात आहे. संतांनी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी’ ‘बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. पुंडलीक आहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू, माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा, एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण. अर्थात वारकरी होणे म्हणजे एक व्रत आहे. एक साधना आहे. पतिव्रता जशी आपल्या पतीशी एकनिष्ठ असते तसे वारकरी विठ्ठलाशिवाय दुस-या दैवताची भक्ती करीत नाही.एक धरिला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती. या न्यायाने आचरण करीत असतो. वारकरी होण्याकरिता काही महत्वाच्या बाबी असतात. गळ्यात १०८ मण्यांची तुलसीची माळ धारण करावी लागते. कपाळाला ऊर्ध्व पुंड्र, गोपीचंदन व बुक्का लावावा लागतो. पवित्र तुलसीची माळ वारकरी संप्रदायातील एखाद्या संत पदावर पोहचलेल्या, शाब्दे परेच निष्णातम, अशा महात्म्याला शरण जावून ती माळ धारण करावी लागते. जेव्हा माळ गळ्यात घालतो तेव्हा तो महात्मा त्या वारक-याला सांगतो कि, ‘येथून पुढे खोटे बोलायचे नाही, गळ्यातून माळ काढायची नाही. हि माळ आता मरेपर्यंत गळ्यातच राहणार, परस्त्री मातेसमान मानावी, चोरी, लबाडी करायची नाही. आषाढी, कार्तिकी एकादशी पंढरीची वारी करायची. देहू, आळंदी, पैठण व इतर संतांच्या स्थानाकडे आवर्जून जायचे असा थोडक्यात वारकरी संप्रदायाचा आचार धर्म असतो.भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिलेगुरुकुल भागवाताश्रम, चिचोंडी(पाटील)ता. नगरमो. ९४२२२२०६०३

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर