शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

तुका झालासे कळस, भजन करा सावकाश...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 19:26 IST

जीवनाला आनंदाने सामोरे जाण्याची दीक्षा ही वारी देते.

हभप. चंद्रकांत महाराज वांजळे

वारी हा एक आनंद सोहळा आहे. निसर्गातील अनुकूल प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत देत हा सोहळा मार्गस्थ होत असतो. आनंदाला सामोरे जाणे आणि आनंद घेणारा हा सोहळा आहे. कोणत्याही प्रकारचा शीण वाटत नाही़ वारकरी नामघोष करीत वारीची वाट चालत असतात. जीवनाला आनंदाने सामोरे जाण्याची दीक्षा ही वारी देते. यात लोकशिक्षण आहे. कुणी म्हणेन, महिनाभराची वारी झाली उर्वरित दिवसांचे काय? घड्याळाला चावी दिली की दोन दिवस घड्याळ चालते. त्यानुसार वारी केली की वर्षभर ऊर्जा देते. मानवी विचारांची खूप चांगल्या स्वरूपांची उधळण होत असते. ऊर्जा वाढविणारी ही वारी आहे. या संप्रदायाचा पाया ज्ञानोबारायांनी घातला आहे. अर्थात तो ज्ञानाचा आहे. संतकृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया.., हे कार्य काही एक दोन शतकात झालेले नाही. तर एकाने पाया रचावा याप्रमाणे ज्ञानदेव महाराजांनी पाया रचला. नामा तयाचा किंकर, त्यानें केला हा विस्तार,नामदेवरायांनी या मंदिराच्या भिंती बांधल्या. प्रसार केला.जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत.,  तो शांतीचा खांब आहे. आणि तुका झालासे कळस, भजन करा सावकाश..असे भागवत धर्माच्या मंदिराचे वर्णन संत बहिणाबाई यांनी केले आहे. परिपूर्णता तुकोबारायांनी दिली. भजन सावकाश करा, म्हणजे खूप वेळ घालविणे असा नाही तर, सावकाश. अत्यंत व्यापक भाव ठेवून हे विश्वची माझे घरे...या भावनेने भक्ती करा, असा आहे. जन-जनार्दन ही एकनाथमहाराजांनी केलेली भजनाची व्याख्या आहे. तर देवही बोलतात म्हणून माझे भजना, उचित तोची अर्जुना, गगन जैसे अंलिगणा, गगणाचिया...ह्ण गगन होण्याकरिता दुसरे गगन असावे लागते. माझे भजन करण्यासाठी मीच व्हावे लागते. मीच होऊनी पांडवा, करती सेवा.. अशी सेवा वारीची असते. म्हणून नामदेवमहाराज अशी वारी करणाऱ्यांस पंढरीच्या वाटेवर पाऊल पडण्यासाठी अनंत जन्माची पुण्याई असावी लागते. असे एका चरणात म्हणतात. खरे तर ही अतिशयोक्ती वाटेलही कदाचित. संत वाङ्मयाचा आपण जर थोडा आधार घेतला. तर ह्यह्यवाराणसी एक मास, गोंदावरी एक दिवस, पंढरी पाऊन परियसा ऐसा महिमा नामाचा.... याचाच अर्थ वाराणसी-गोदावरी आणि पंढरीच्या वाटेवरील प्रत्येक पावलातून मिळणारे पुण्य एकच आहे.चंद्रकांत महाराज वांजळे

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकPandharpur Wariपंढरपूर वारी