शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
2
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
3
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
4
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
5
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
6
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
7
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
8
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
9
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
10
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
11
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
12
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
13
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
14
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
15
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
16
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
17
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
18
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
19
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
20
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
Daily Top 2Weekly Top 5

एका वाटसरूनं विचारलं, ‘आजोबा, हे शेत कुणाचं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 09:18 IST

‘सब भूमी गोपालकी!’ हे सत्य मानून जर आपण जगलो तर अखंड आनंदात, समाधानात राहू. नाही तर झगडा, संघर्ष, युद्ध ठरलेलं आहेच.’

- रमेश सप्रे

एक वाटसरू चालून थकल्यावर एका शेताच्या कडेला असलेल्या झाडाखाली बसला. त्या थंड सावलीत त्याला बरं वाटलं. समोरचं शेत गर्द हिरव्या रंगात डोलत होतं. भरघोस असलेलं पीक पाहून त्याला वाटू लागलं- ‘देवाजीने करुणा केली। शेते पिकून पिवळी झाली।।’ ही भावना मनात आली; पण मस्तकात दुसरंच वारं घोंगावू लागलं. हे शेत जर शेतक-यानं नांगरलच नसतं तर नि त्यात बी पेरलं नसतं तर? नंतर वाढलेलं तण काढून खत घातलं नसतं तर? असं गच्च पीक आलं असतं का शेतात? यात ‘देवाजीची करुणा’ कुठून आली?

हा विचार मनात घोळत असताना एक म्हातारा म्हणून तिथं आला. त्याला या वाटसरूनं विचारलं, ‘आजोबा, हे शेत कुणाचं?’ काहीशा थरथरत्या आवाजात म्हणाले, ‘अवो, ज्योतिबाचं.’ काहीतरी काम असल्यामुळे आजोबा निघून गेले. तेवढय़ात तिथं एक प्रौढ व्यक्ती आली. साधारण पन्नाशीतली. न राहवून वाटसरूनं पुन्हा त्याला विचारलं, ‘काका, हे शेत कुणाचं हो?’ काकांनी उत्तर दिलं, ‘अहो, धोंडीबाचं.’ ‘पण आता एक आजोबा म्हणाले ‘ज्योतिबाचं’ या वाटसरूच्या उत्तरावर ती व्यक्ती म्हणाली, ‘अहो, हे शेत आधी ज्योतिबाचंच होतं; पण तो गेल्यानंतर त्याचा मुलगा धोंडिबा इथं शेती करू लागला.’ ‘असं होय!’ असं वाटसरू बोलण्यापूर्वी ते काकाही निघून गेले.

मनातल्या मनात तो वाटसरू शेतीसाठी करत असलेल्या कष्टाबद्दल धोंडिबाचं कौतुक करत असतानाच एक तिशीतला तरुण तिथं आला. सहज म्हणून त्यालाही वाटसरूनं विचारलं, ‘दादा हे शेत कुणाचं?’ यावर तो तरुण म्हणाला, ‘कोंडिबाचं’ आश्चर्यानं वाटसरू विचारता झाला, ‘एका आजोबांनी सांगितलं की हे शेत ज्योतिबाचं; नंतर एक काका म्हणाले की हे शेत धोंडिबाचं नि आता तुम्ही म्हणताय कोंडिबाचं! असं कसं?’ यावर हसून तो तरुण म्हणाला, ‘अहो, आजोबांच्या आठवणीतलं शेत ज्योतिबाचंच, त्याचप्रमाणे काका म्हणतात तेही बरोबर आहे. कारण त्यांनी ज्योतिबाच्या मृत्यूनंतर धोंडिबाला शेतात राबताना पाहिलंय. माझं विचाराल तर गेल्याच वर्षी हे शेत धोंडिबानं मुलीच्या लग्नासाठी कोंडिबाला विकलं. कोंडिबाचं शेतीचं ज्ञान अलिकडचं. बघा नं त्यानं कसं झकास पीक काढलंय?’ तो दादाही त्याच्या कामासाठी निघून गेला.

वाटसरू आता शिदोरी उघडून, शेजारच्या विहिरीतलं थंडगार पाणी आणून खायला बसणार इतक्यात आणखी त्याच्या सारखाच दुसरा वाटसरू आला. त्यानंही शेजारी बसून आपली शिदोरी सोडली. एकानं आपलं कालवण दुस-याला दिलं तर त्यानं त्याची भाजी याला दिली. दोघं गप्पा करत जेवू लागले. ‘काय गंमत आहे नाही!’ या पहिल्या वाटसरूच्या उद्गारावर दुसरा आश्चर्यभरल्या चेह-यानं पाहू लागला. ‘कसली गंमत?’ या त्याच्या उद्गारावर पहिला म्हणाला, ‘एकाच प्रश्नाची तीन तीन उत्तरं’ नंतर त्यानं घडलेला सारा प्रकार सांगितला. यावर दुसरा वाटसरू म्हणाला ‘तीनच कशाला, असंख्य उत्तरं असू शकतात अशा प्रश्नांची. म्हणजे असं पाहा- ज्योतिबाच्या आधीही हे शेत कुणा सदोबाचं, त्याच्या पूर्वी कुणा मर्तोबाचं, त्याच्यापूर्वी.. अशी ही साखळी संपणारच नाही आणि आज जरी हे कोंडिबाचं असलं तरी नंतर काही वर्षानी हे शेत जयदेवाचं.. महादेवाचं असू शकतं. नव्हे असणारच! ‘मग हे शेत नक्की कुणाचं’ या पहिल्या वाटसरूच्या प्रश्नावर दुसरा शांतपणे म्हणाला- तुम्हीच विचार करा की! अहो, ज्यानं हे शेत निर्माण केलं तोच पहिला नि खरा मालक असला पाहिजे ना? थांबा तुम्हाला एका साधूनं सांगितलेली गोष्टच सांगतो.

एका कुटुंबातील वडील वारल्यानंतर त्यांच्या शेताची मालकी दोन मुलांकडे आली. वाटणी करताना शेताच्या मध्ये घातलेल्या बांधावरून दोघांच्यात भांडण सुरू झालं. दोघांचं म्हणणं एकच, शेताच्या माझ्या भागात हा बांध तू बांधलायस. हे भांडण इतकं तीव्र झालं की दोघांनी एकमेकांवर कु-हाडीनं प्राणघातक हल्ला केला. त्यात एक मेला तर दुसरा रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिला. अत्यवस्थ होता म्हणून गावातल्या डॉक्टरकडे त्याला नेलं. त्याच्या रडणा:या आईला पाहून डॉक्टर म्हणाले, ‘मी  आहे ना, घाबरू नकोस, मी याचे प्राण वाचवीन.’ प्रत्यक्ष काही दिवसांपूर्वीच अपघातात जखमी झालेल्या स्वत:च्या मुलाचा जीव या डॉक्टरला वाचवता आला नव्हता.

हे सांगून तो साधू म्हणाला, ‘देव दोनदा हसला. एकदा त्या मुलांनी माझं शेत. माझं शेत’ असं म्हणत एकमेकांवर जीवघेणा हल्ला केला तेव्हा देव हसला. दुस-यावेळी देव हसला जेव्हा तो डॉक्टर ‘मी तुझ्या मुलाला वाचवीन’ असं म्हणाला तेव्हा! आपण माणसं ज्या ज्यावेळी ‘मी, माझं’ असं म्हणतो त्या त्या वेळी देव आपल्याला हसत असतो हे लक्षात ठेवायला हवं.’ ही गोष्ट सांगून दुसरा वाटसरू पहिल्याला म्हणाला, ‘कोणत्याही प्रश्नाचं मूळ नि एकच उत्तर हेच आहे. ‘सब भूमी गोपालकी!’ हे सत्य मानून जर आपण जगलो तर अखंड आनंदात, समाधानात राहू. नाही तर झगडा, संघर्ष, युद्ध ठरलेलं आहेच.’

पहिल्या वाटसरूला हे सारं पटलं नि तो म्हणाला, ‘अगदी बरोबर. देवानं सृष्टीच म्हणजे ही जमीन, पाणी, आकाश, वारा, सूर्यप्रकाश निर्माण केला नसता तर कोंडिबा काय किंवा धोंडिबा काय कोणतं शेत करणार होता नि कसलं पीक काढणार होता? म्हटलंय ते खरंच आहे. देवाजीने करूणा केली। शेते पिकुनि पिवळी झाली।।

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक