शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

पूर्वोत्तर क्षण दुर्लभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 05:38 IST

कधीतरी सुखाचा गोड क्षण भेटतो त्याला स्थिर करता आलं पाहिजे़ हेच सूत्राला अपेक्षित आहे़

- बा. भो. शास्त्रीकधीतरी सुखाचा गोड क्षण भेटतो त्याला स्थिर करता आलं पाहिजे़ हेच सूत्राला अपेक्षित आहे़ मागची खंत व पुढची चिंता या फटीत आपण जगतो़ म्हणून दु:खी असतो़ प्रथम भेटलेला सुखाचा क्षण शेवटच्या क्षणाला जोडणं हे सोपं नाही़, ते दुर्लभ आहे़‘‘याजसाठी केला होता अट्टाहासशेवटचा दिन गोड व्हावा’’हा अट्टाहास महत्त्वाचा आहे़ हाच निर्धार समजला पाहिजे़ ध्येय गाठल्याशिवाय थांबायचे नाही़, ही प्रतिज्ञा सूत्रात अपेक्षित आहे़‘पूर्वोत्तर क्षण दुर्लभ’या गोड सूत्रात स्वामींनी धन व कणाचं महत्त्व व्यवहारासाठी मान्य केलं, पण ते दुर्लभ नाही़ क्षण दुर्लभ आहे़ पैशाने मानवनिर्मित सर्वच वस्तू आपण खरेदी करू शकतो़ पण गेला क्षण विकत मिळत नाही़ श्वास व विश्वासाचं मार्केट नसतं़ जीवन असंख्य क्षणांच्या समूहाने ते बनलेलं आहे़ दहा रुपये हरवले तर आपण दु:खी होतो़, पण एका क्षणात लाभणारी सुवर्णसंधी सजग नसल्याने निघून जाते, तेव्हा खंत वाटत नाही़ इथंच आपलं नियोजन चुकलेलं असतं़श्रीचक्रधरांनी आपल्या सूत्रात चांगल्या व वाईट क्षणांचा परिचय करून दिला आहे़ क्षणात अपघात घडतो़ हत्या बलात्काराचा एक क्षणाने आरंभ होतो व कुठल्या तरी क्षणाने संपतो़ या दोन क्षणांतले आपण खूप वाईट असतो़ गोळी झाडायला अथवा बॉम्ब टाकायला क्षणाचा काळ लागतो़ त्यामुळे हिंसा होते. त्याचे दुष्परिणाम हजारो वर्षे भोगावे लागतात़ अविचाराचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागतो. म्हणूनच प्रत्येक क्षणाला विचाराने कृती करणे आवश्यक असते, ही बाब प्रत्येकाने लक्षात घेऊन तशी कृती करणे हेच महत्त्वाचे होय.