शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वोत्तर क्षण दुर्लभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 05:38 IST

कधीतरी सुखाचा गोड क्षण भेटतो त्याला स्थिर करता आलं पाहिजे़ हेच सूत्राला अपेक्षित आहे़

- बा. भो. शास्त्रीकधीतरी सुखाचा गोड क्षण भेटतो त्याला स्थिर करता आलं पाहिजे़ हेच सूत्राला अपेक्षित आहे़ मागची खंत व पुढची चिंता या फटीत आपण जगतो़ म्हणून दु:खी असतो़ प्रथम भेटलेला सुखाचा क्षण शेवटच्या क्षणाला जोडणं हे सोपं नाही़, ते दुर्लभ आहे़‘‘याजसाठी केला होता अट्टाहासशेवटचा दिन गोड व्हावा’’हा अट्टाहास महत्त्वाचा आहे़ हाच निर्धार समजला पाहिजे़ ध्येय गाठल्याशिवाय थांबायचे नाही़, ही प्रतिज्ञा सूत्रात अपेक्षित आहे़‘पूर्वोत्तर क्षण दुर्लभ’या गोड सूत्रात स्वामींनी धन व कणाचं महत्त्व व्यवहारासाठी मान्य केलं, पण ते दुर्लभ नाही़ क्षण दुर्लभ आहे़ पैशाने मानवनिर्मित सर्वच वस्तू आपण खरेदी करू शकतो़ पण गेला क्षण विकत मिळत नाही़ श्वास व विश्वासाचं मार्केट नसतं़ जीवन असंख्य क्षणांच्या समूहाने ते बनलेलं आहे़ दहा रुपये हरवले तर आपण दु:खी होतो़, पण एका क्षणात लाभणारी सुवर्णसंधी सजग नसल्याने निघून जाते, तेव्हा खंत वाटत नाही़ इथंच आपलं नियोजन चुकलेलं असतं़श्रीचक्रधरांनी आपल्या सूत्रात चांगल्या व वाईट क्षणांचा परिचय करून दिला आहे़ क्षणात अपघात घडतो़ हत्या बलात्काराचा एक क्षणाने आरंभ होतो व कुठल्या तरी क्षणाने संपतो़ या दोन क्षणांतले आपण खूप वाईट असतो़ गोळी झाडायला अथवा बॉम्ब टाकायला क्षणाचा काळ लागतो़ त्यामुळे हिंसा होते. त्याचे दुष्परिणाम हजारो वर्षे भोगावे लागतात़ अविचाराचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागतो. म्हणूनच प्रत्येक क्षणाला विचाराने कृती करणे आवश्यक असते, ही बाब प्रत्येकाने लक्षात घेऊन तशी कृती करणे हेच महत्त्वाचे होय.