शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

पूर्वोत्तर क्षण दुर्लभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 05:38 IST

कधीतरी सुखाचा गोड क्षण भेटतो त्याला स्थिर करता आलं पाहिजे़ हेच सूत्राला अपेक्षित आहे़

- बा. भो. शास्त्रीकधीतरी सुखाचा गोड क्षण भेटतो त्याला स्थिर करता आलं पाहिजे़ हेच सूत्राला अपेक्षित आहे़ मागची खंत व पुढची चिंता या फटीत आपण जगतो़ म्हणून दु:खी असतो़ प्रथम भेटलेला सुखाचा क्षण शेवटच्या क्षणाला जोडणं हे सोपं नाही़, ते दुर्लभ आहे़‘‘याजसाठी केला होता अट्टाहासशेवटचा दिन गोड व्हावा’’हा अट्टाहास महत्त्वाचा आहे़ हाच निर्धार समजला पाहिजे़ ध्येय गाठल्याशिवाय थांबायचे नाही़, ही प्रतिज्ञा सूत्रात अपेक्षित आहे़‘पूर्वोत्तर क्षण दुर्लभ’या गोड सूत्रात स्वामींनी धन व कणाचं महत्त्व व्यवहारासाठी मान्य केलं, पण ते दुर्लभ नाही़ क्षण दुर्लभ आहे़ पैशाने मानवनिर्मित सर्वच वस्तू आपण खरेदी करू शकतो़ पण गेला क्षण विकत मिळत नाही़ श्वास व विश्वासाचं मार्केट नसतं़ जीवन असंख्य क्षणांच्या समूहाने ते बनलेलं आहे़ दहा रुपये हरवले तर आपण दु:खी होतो़, पण एका क्षणात लाभणारी सुवर्णसंधी सजग नसल्याने निघून जाते, तेव्हा खंत वाटत नाही़ इथंच आपलं नियोजन चुकलेलं असतं़श्रीचक्रधरांनी आपल्या सूत्रात चांगल्या व वाईट क्षणांचा परिचय करून दिला आहे़ क्षणात अपघात घडतो़ हत्या बलात्काराचा एक क्षणाने आरंभ होतो व कुठल्या तरी क्षणाने संपतो़ या दोन क्षणांतले आपण खूप वाईट असतो़ गोळी झाडायला अथवा बॉम्ब टाकायला क्षणाचा काळ लागतो़ त्यामुळे हिंसा होते. त्याचे दुष्परिणाम हजारो वर्षे भोगावे लागतात़ अविचाराचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागतो. म्हणूनच प्रत्येक क्षणाला विचाराने कृती करणे आवश्यक असते, ही बाब प्रत्येकाने लक्षात घेऊन तशी कृती करणे हेच महत्त्वाचे होय.