शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

शांत मन ध्येय गाठते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 08:52 IST

शांत मनात दु:खाला थारा नसतो. शांतीचा वास मनुष्याच्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे. शांतीशिवाय आनंद नाही आणि आनंदाशिवाय शांती नाही.

साधकाचे ‘मन’ पवित्र असते. पवित्र मन मनाला सात्त्विक समाधान देते. नवरात्रीच्या नऊ माळा म्हणजे मनाच्या नऊ पायऱ्या १) मन:शांती २) मन-भक्ती ३) मन:शक्ती ४) मनकृती ५) मनवृत्ती ६) मन जागृती ७) मन-प्रकृती ८) मनदेवी ९) मनस्मृती या मनाच्या अवस्था साधकाजवळ असतात. मनाच्या प्रत्येक कृतीमागे त्याचे अवलोकन महत्त्वाचं असते. मनाच्या वृत्तीचा परिणाम मनाच्या शक्तीवर होता. मन:शक्तीचा परिणाम त्याच्या कृतीवर- कृतीचा परिणाम वृत्तीवर- वृत्तीचा परिणाम प्रकृतीवर- प्रकृतीचा परिणाम मनजागृतीवर- मन स्मृतीचा परिणाम मनदेवीवर- अशी शृंखला मनाच्या कप्प्यात असते. त्यानुसार साधकाच्या मनाची अवस्था परिपक्व होेते. साधकाच्या मनात अनेक विचारांना थारा नसतो. ते मन आपल्या इष्ट देवतेच्या शोधात असते. त्याच्या मनाची एकवृत्ती असते. अशा मनाला एकत्वाची जाणीव होते. ते मन एकाग्रतेत असते. एकाग्र मन शांतीला जन्म देते. शांती चित्ताला समाधान देते. समाधानी चित्त प्रसन्नतेची वलयं निर्माण करतात. प्रसन्न तेथे वलयातून सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. म्हणून साधकाजवळ सकारात्मक ऊर्जावलयं असतात. साधकाच्या सान्निध्यात राहिल्यास चित्तास समाधान मिळते. वाईट वासनांचा त्याग होतो. त्याचे भ्रमित मन शांतीत परावर्तित होते.

शांत मनात कुठलीही विकृती नसते. म्हणून साधकाचे मन शांतीत परावर्तित झालेले असते. शांत मनात दु:खाला थारा नसतो. शांतीचा वास मनुष्याच्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे. शांतीशिवाय आनंद नाही आणि आनंदाशिवाय शांती नाही. हे मानवी जीवनाचे मूळसूत्र आहे. तेच सूत्र साधक साधत असतात. म्हणून तर संतांनी म्हटले आहे, ‘शांतिपर ते नाही सुख । येर अवघेची दु:ख ।। शांती ज्या मनात असते ते मन प्रभावशाली असते. त्या मनाची शक्ती अनंतपटीने ऊर्जा निर्माण करते. ज्या ठिकाणी शांती असते तेथे काळाची गती खुंटत असते. म्हणून साधकाच्या जीवनात शांतीला खूप महत्त्व आहे. शांतीच्या सहवासात साधक न्हाऊन निघतो. त्याच्या मनाची विश्रांती शांतीच असते. म्हणून साधकाचे मन शांतीत परावर्तित झालेले असते. शांत मन सर्वांवर मात करून आपले ध्येय गाठत असते.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक