शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

शांत मन ध्येय गाठते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 08:52 IST

शांत मनात दु:खाला थारा नसतो. शांतीचा वास मनुष्याच्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे. शांतीशिवाय आनंद नाही आणि आनंदाशिवाय शांती नाही.

साधकाचे ‘मन’ पवित्र असते. पवित्र मन मनाला सात्त्विक समाधान देते. नवरात्रीच्या नऊ माळा म्हणजे मनाच्या नऊ पायऱ्या १) मन:शांती २) मन-भक्ती ३) मन:शक्ती ४) मनकृती ५) मनवृत्ती ६) मन जागृती ७) मन-प्रकृती ८) मनदेवी ९) मनस्मृती या मनाच्या अवस्था साधकाजवळ असतात. मनाच्या प्रत्येक कृतीमागे त्याचे अवलोकन महत्त्वाचं असते. मनाच्या वृत्तीचा परिणाम मनाच्या शक्तीवर होता. मन:शक्तीचा परिणाम त्याच्या कृतीवर- कृतीचा परिणाम वृत्तीवर- वृत्तीचा परिणाम प्रकृतीवर- प्रकृतीचा परिणाम मनजागृतीवर- मन स्मृतीचा परिणाम मनदेवीवर- अशी शृंखला मनाच्या कप्प्यात असते. त्यानुसार साधकाच्या मनाची अवस्था परिपक्व होेते. साधकाच्या मनात अनेक विचारांना थारा नसतो. ते मन आपल्या इष्ट देवतेच्या शोधात असते. त्याच्या मनाची एकवृत्ती असते. अशा मनाला एकत्वाची जाणीव होते. ते मन एकाग्रतेत असते. एकाग्र मन शांतीला जन्म देते. शांती चित्ताला समाधान देते. समाधानी चित्त प्रसन्नतेची वलयं निर्माण करतात. प्रसन्न तेथे वलयातून सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. म्हणून साधकाजवळ सकारात्मक ऊर्जावलयं असतात. साधकाच्या सान्निध्यात राहिल्यास चित्तास समाधान मिळते. वाईट वासनांचा त्याग होतो. त्याचे भ्रमित मन शांतीत परावर्तित होते.

शांत मनात कुठलीही विकृती नसते. म्हणून साधकाचे मन शांतीत परावर्तित झालेले असते. शांत मनात दु:खाला थारा नसतो. शांतीचा वास मनुष्याच्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे. शांतीशिवाय आनंद नाही आणि आनंदाशिवाय शांती नाही. हे मानवी जीवनाचे मूळसूत्र आहे. तेच सूत्र साधक साधत असतात. म्हणून तर संतांनी म्हटले आहे, ‘शांतिपर ते नाही सुख । येर अवघेची दु:ख ।। शांती ज्या मनात असते ते मन प्रभावशाली असते. त्या मनाची शक्ती अनंतपटीने ऊर्जा निर्माण करते. ज्या ठिकाणी शांती असते तेथे काळाची गती खुंटत असते. म्हणून साधकाच्या जीवनात शांतीला खूप महत्त्व आहे. शांतीच्या सहवासात साधक न्हाऊन निघतो. त्याच्या मनाची विश्रांती शांतीच असते. म्हणून साधकाचे मन शांतीत परावर्तित झालेले असते. शांत मन सर्वांवर मात करून आपले ध्येय गाठत असते.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक