शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

शांत मन ध्येय गाठते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 08:52 IST

शांत मनात दु:खाला थारा नसतो. शांतीचा वास मनुष्याच्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे. शांतीशिवाय आनंद नाही आणि आनंदाशिवाय शांती नाही.

साधकाचे ‘मन’ पवित्र असते. पवित्र मन मनाला सात्त्विक समाधान देते. नवरात्रीच्या नऊ माळा म्हणजे मनाच्या नऊ पायऱ्या १) मन:शांती २) मन-भक्ती ३) मन:शक्ती ४) मनकृती ५) मनवृत्ती ६) मन जागृती ७) मन-प्रकृती ८) मनदेवी ९) मनस्मृती या मनाच्या अवस्था साधकाजवळ असतात. मनाच्या प्रत्येक कृतीमागे त्याचे अवलोकन महत्त्वाचं असते. मनाच्या वृत्तीचा परिणाम मनाच्या शक्तीवर होता. मन:शक्तीचा परिणाम त्याच्या कृतीवर- कृतीचा परिणाम वृत्तीवर- वृत्तीचा परिणाम प्रकृतीवर- प्रकृतीचा परिणाम मनजागृतीवर- मन स्मृतीचा परिणाम मनदेवीवर- अशी शृंखला मनाच्या कप्प्यात असते. त्यानुसार साधकाच्या मनाची अवस्था परिपक्व होेते. साधकाच्या मनात अनेक विचारांना थारा नसतो. ते मन आपल्या इष्ट देवतेच्या शोधात असते. त्याच्या मनाची एकवृत्ती असते. अशा मनाला एकत्वाची जाणीव होते. ते मन एकाग्रतेत असते. एकाग्र मन शांतीला जन्म देते. शांती चित्ताला समाधान देते. समाधानी चित्त प्रसन्नतेची वलयं निर्माण करतात. प्रसन्न तेथे वलयातून सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. म्हणून साधकाजवळ सकारात्मक ऊर्जावलयं असतात. साधकाच्या सान्निध्यात राहिल्यास चित्तास समाधान मिळते. वाईट वासनांचा त्याग होतो. त्याचे भ्रमित मन शांतीत परावर्तित होते.

शांत मनात कुठलीही विकृती नसते. म्हणून साधकाचे मन शांतीत परावर्तित झालेले असते. शांत मनात दु:खाला थारा नसतो. शांतीचा वास मनुष्याच्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे. शांतीशिवाय आनंद नाही आणि आनंदाशिवाय शांती नाही. हे मानवी जीवनाचे मूळसूत्र आहे. तेच सूत्र साधक साधत असतात. म्हणून तर संतांनी म्हटले आहे, ‘शांतिपर ते नाही सुख । येर अवघेची दु:ख ।। शांती ज्या मनात असते ते मन प्रभावशाली असते. त्या मनाची शक्ती अनंतपटीने ऊर्जा निर्माण करते. ज्या ठिकाणी शांती असते तेथे काळाची गती खुंटत असते. म्हणून साधकाच्या जीवनात शांतीला खूप महत्त्व आहे. शांतीच्या सहवासात साधक न्हाऊन निघतो. त्याच्या मनाची विश्रांती शांतीच असते. म्हणून साधकाचे मन शांतीत परावर्तित झालेले असते. शांत मन सर्वांवर मात करून आपले ध्येय गाठत असते.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक