शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 18:46 IST

मानवी स्वभावाचे अनेक पैलू आहेत. त्या त्या स्वभावानुसार आनंद, दु:ख वाट्याला येत असते.

- धर्मराज हल्लाळेमानवी स्वभावाचे अनेक पैलू आहेत. त्या त्या स्वभावानुसार आनंद, दु:ख वाट्याला येत असते. संतांनी कर्मसिद्धांताला मोठे महत्त्व दिले आहे. आपण जसे वागू तशीच प्रतिक्रिया समोरून येते. अर्थात आपले चित्त, हेतू शुद्ध असेल तर शत्रूसुद्धा मित्र होऊ शकतो. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून कृतीला हेतूची जोड दिली आहे. आपण जे वागतो वा बोलतो त्या पाठीमागे कोणता हेतू आहे, यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. एखादे काम करीत असताना चूक झाली अथवा ते काम योग्यरीतीने पार पडले नाही तर त्याचा अर्थ सर्व चुकले असे होत नाही. कृतीच्या मागील भावना मोलाची असते. आई-वडील आपल्या मुलाला कठोर शब्दात समज देतात, याचा अर्थ त्यांच्या हृदयात कायम क्रोध असतो असे नाही. त्या कठोर शब्दांमागेही आपल्या अपत्याचे हित दडलेले असते.स्पष्टपणे बोलणे हा गुण असला तरी अनेकदा स्पष्ट बोलणारे जवळच्यांना मुकतात. तात्कालिक कठोरतेमुळे दुखावलेली माणसे दुरावतात. खरे तर त्या शब्दप्रहाराने न दुखावता त्या मागच्या हेतूकडे लक्ष वेधले पाहिजे. मी चुकलो होतो, माझ्यात सुधारणा व्हावी म्हणून मला हे ऐकावे लागले, असे समजून घेणारा हेतूकडे लक्ष देत असतो.चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती... हे कसे घडते? चांगला विचार मनात ठेवून आपण शत्रूबरोबरही तितक्याच प्रामाणिकपणे जेव्हा वागतो तेव्हा तो शत्रूही नकळत आपला मित्र बनतो. द्वेष भावनेतून आनंद निर्माण होत नाही. ज्याच्याशी पटत नाही त्याच्याशी वाईट वागत राहिलो, त्याच्या उणिवा सांगत राहिलो तर अंतर वाढतच जाते. मात्र आपण जेव्हा सद्हेतूने सद्वर्तनाच्या मार्गावर चालत राहतो तेव्हा शत्रुत्वाचा थांबा मागे पडतो. निर्मळ मनाचा माणूस प्रत्येकात दडला आहे. त्यावर अनेक रूपांची छाया पडते. ती कशी दूर करतो आणि आपल्या निर्मळ विचारांना कसे पेरतो, यावर नात्याची वीण घट्ट होत जाते.