शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
2
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
3
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
4
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
5
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
6
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
7
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
8
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
9
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
10
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
11
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
12
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
13
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
14
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
15
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
16
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
17
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
18
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
19
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
20
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या

चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 18:46 IST

मानवी स्वभावाचे अनेक पैलू आहेत. त्या त्या स्वभावानुसार आनंद, दु:ख वाट्याला येत असते.

- धर्मराज हल्लाळेमानवी स्वभावाचे अनेक पैलू आहेत. त्या त्या स्वभावानुसार आनंद, दु:ख वाट्याला येत असते. संतांनी कर्मसिद्धांताला मोठे महत्त्व दिले आहे. आपण जसे वागू तशीच प्रतिक्रिया समोरून येते. अर्थात आपले चित्त, हेतू शुद्ध असेल तर शत्रूसुद्धा मित्र होऊ शकतो. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून कृतीला हेतूची जोड दिली आहे. आपण जे वागतो वा बोलतो त्या पाठीमागे कोणता हेतू आहे, यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. एखादे काम करीत असताना चूक झाली अथवा ते काम योग्यरीतीने पार पडले नाही तर त्याचा अर्थ सर्व चुकले असे होत नाही. कृतीच्या मागील भावना मोलाची असते. आई-वडील आपल्या मुलाला कठोर शब्दात समज देतात, याचा अर्थ त्यांच्या हृदयात कायम क्रोध असतो असे नाही. त्या कठोर शब्दांमागेही आपल्या अपत्याचे हित दडलेले असते.स्पष्टपणे बोलणे हा गुण असला तरी अनेकदा स्पष्ट बोलणारे जवळच्यांना मुकतात. तात्कालिक कठोरतेमुळे दुखावलेली माणसे दुरावतात. खरे तर त्या शब्दप्रहाराने न दुखावता त्या मागच्या हेतूकडे लक्ष वेधले पाहिजे. मी चुकलो होतो, माझ्यात सुधारणा व्हावी म्हणून मला हे ऐकावे लागले, असे समजून घेणारा हेतूकडे लक्ष देत असतो.चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती... हे कसे घडते? चांगला विचार मनात ठेवून आपण शत्रूबरोबरही तितक्याच प्रामाणिकपणे जेव्हा वागतो तेव्हा तो शत्रूही नकळत आपला मित्र बनतो. द्वेष भावनेतून आनंद निर्माण होत नाही. ज्याच्याशी पटत नाही त्याच्याशी वाईट वागत राहिलो, त्याच्या उणिवा सांगत राहिलो तर अंतर वाढतच जाते. मात्र आपण जेव्हा सद्हेतूने सद्वर्तनाच्या मार्गावर चालत राहतो तेव्हा शत्रुत्वाचा थांबा मागे पडतो. निर्मळ मनाचा माणूस प्रत्येकात दडला आहे. त्यावर अनेक रूपांची छाया पडते. ती कशी दूर करतो आणि आपल्या निर्मळ विचारांना कसे पेरतो, यावर नात्याची वीण घट्ट होत जाते.