शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

मनासाठी विचारांचे पोषण गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 04:13 IST

नकारात्मक विचार वाढले, तर मन कमकुवत होईल. यामुळे शारीरिक आणि मानसिक आजारांना वाट मिळेल.

- माता अमृतानंदमयीशरीराला अन्नाची गरज असते, त्याचप्रमाणे मनाला चांगल्या विचारांच्या पोषणाची गरज असते. कोणत्या प्रकारचे अन्न आरोग्यासाठी फायदेशीर असते आणि कोणत्या प्रकारचे धोकादायक असते हे माहीत असणे आवश्यक आहे. त्यानुसार आपण आपला आहार ठरवायला हवा. आपण केवळ गोडच पदार्थ खाल्ले, तर आपले शरीर आजारांना बळी पडेल. त्याचप्रमाणे जर नकारात्मक विचार वाढले, तर मन कमकुवत होईल. यामुळे शारीरिक आणि मानसिक आजारांना वाट मिळेल. मन हे विचारांचा प्रवाह असते. जर विचार नसतील, तर मन नसेल. मनावर नियंत्रण ठेवायचे असेल, तर आपल्या विचारांबाबत जागरूक व्हायला हवे. कोणते विचार स्वीकारायचे आणि कोणते झिडकारायचे याबाबत आपण कायम सावध असले पाहिजे. पंतप्रधानांनी कायम त्यांच्या मंत्र्यांवर देखरेख करायला हवी. त्यांच्या बुद्धिमत्तेची क्षमता त्यांना माहीत असायला हवीच, त्यांची मते आणि सूचना कितपत स्वीकारायच्या हेही माहीत असायला हवे. जर त्यांनी मंत्री म्हणेल ते सर्व ऐकले आणि फारसा सारासार विचार न करता कार्यवाही केली, तर त्यांना आपले पद गमवावे लागेल. हीच गोष्ट विचारांनाही लागू होते. विचार समजून घेणे आणि त्यानुसार त्यांना हाताळणे अतिशय आवश्यक आहे. तसे न झाल्यास ते विनाश करतील. शेत पिकते तिथे तण माजतातच. ते अधूनमधून मुळापासून काढून टाकले पाहिजेत. नाहीतर ते सर्व खत शोषून पिकाचा नाश करतील. मात्र, आपण पिकांना योग्य वेळेस पुरेसे पाणी आणि खत द्यायला हवे. कीटकांमुळे पिकाचा नाश होऊ नये यासाठी कीटकनाशके फवारली पाहिजेत. त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्याच प्रकारे नकारात्मक विचार आपोआप फोफावत असतात, त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज पडत नाही. मात्र, चांगल्या विचारांच्या मशागतीसाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक