शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
3
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
4
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
7
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
8
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
9
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
10
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
11
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
12
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
13
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
14
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
15
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
16
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
17
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
18
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
19
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
20
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Daily Top 2Weekly Top 5

मनासाठी विचारांचे पोषण गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 04:13 IST

नकारात्मक विचार वाढले, तर मन कमकुवत होईल. यामुळे शारीरिक आणि मानसिक आजारांना वाट मिळेल.

- माता अमृतानंदमयीशरीराला अन्नाची गरज असते, त्याचप्रमाणे मनाला चांगल्या विचारांच्या पोषणाची गरज असते. कोणत्या प्रकारचे अन्न आरोग्यासाठी फायदेशीर असते आणि कोणत्या प्रकारचे धोकादायक असते हे माहीत असणे आवश्यक आहे. त्यानुसार आपण आपला आहार ठरवायला हवा. आपण केवळ गोडच पदार्थ खाल्ले, तर आपले शरीर आजारांना बळी पडेल. त्याचप्रमाणे जर नकारात्मक विचार वाढले, तर मन कमकुवत होईल. यामुळे शारीरिक आणि मानसिक आजारांना वाट मिळेल. मन हे विचारांचा प्रवाह असते. जर विचार नसतील, तर मन नसेल. मनावर नियंत्रण ठेवायचे असेल, तर आपल्या विचारांबाबत जागरूक व्हायला हवे. कोणते विचार स्वीकारायचे आणि कोणते झिडकारायचे याबाबत आपण कायम सावध असले पाहिजे. पंतप्रधानांनी कायम त्यांच्या मंत्र्यांवर देखरेख करायला हवी. त्यांच्या बुद्धिमत्तेची क्षमता त्यांना माहीत असायला हवीच, त्यांची मते आणि सूचना कितपत स्वीकारायच्या हेही माहीत असायला हवे. जर त्यांनी मंत्री म्हणेल ते सर्व ऐकले आणि फारसा सारासार विचार न करता कार्यवाही केली, तर त्यांना आपले पद गमवावे लागेल. हीच गोष्ट विचारांनाही लागू होते. विचार समजून घेणे आणि त्यानुसार त्यांना हाताळणे अतिशय आवश्यक आहे. तसे न झाल्यास ते विनाश करतील. शेत पिकते तिथे तण माजतातच. ते अधूनमधून मुळापासून काढून टाकले पाहिजेत. नाहीतर ते सर्व खत शोषून पिकाचा नाश करतील. मात्र, आपण पिकांना योग्य वेळेस पुरेसे पाणी आणि खत द्यायला हवे. कीटकांमुळे पिकाचा नाश होऊ नये यासाठी कीटकनाशके फवारली पाहिजेत. त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्याच प्रकारे नकारात्मक विचार आपोआप फोफावत असतात, त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज पडत नाही. मात्र, चांगल्या विचारांच्या मशागतीसाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक