शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

मनःशांती- शांती व क्रांतीचा मध्य साधता आला तरच जीवन खऱ्या अर्थाने सुखी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 20:47 IST

स्वामी विवेकानंद म्हणतात, नीती ही सुखाचा पाया आहे. सत्य व नीती आकाशातून जमिनीवर फेकले तरी क्षणात उभे राहण्याची त्यांच्यात ताकद असते. 

-डॉ. दत्ता कोहिनकर- प्राचार्य शिवाजीराव भोसलेंना एकदा पोलिस आयुक्तांनी विचारलं, सर.. स्नेहसंमेलनाला पोलीस बंदोबस्त न मागवता तुमच्या विद्यापीठाचं स्नेहसंमेलन शांततेत कसं काय पार पडलं ? यापूर्वीच्या कुलगुरूंनी पोलीस बंदोबस्त घेऊन देखील भांडणे व हाणामाऱ्या व्हायच्याच. शेवटी जास्त पोलीस फाटा पाठवावा लागायचा. तुमच्यात काय दैवी शक्ती वगैरे आहे का ? हसत-हसत शिवाजीराव भोसले म्हणाले, साहेब बरीचशी टारगट गुन्हेगारी प्रवृत्तीची मुले आमच्या विद्यापीठात आहेत. काही जण तर टोळीनेच कॉलेजमध्ये फिरत असतात. दुमडलेल्या बाह्या खाली घेऊन, वाकून मला आदराने नमस्कार करतात. स्नेहसंमेलनाला मी फक्त कोट घालून एका कोपऱ्यात स्टेजजवळ उभा होतो. अडीच ते तीन हजार विद्यार्थी शांतपणे बसून होते,प्राचार्य-भोसले सर समोरच उभेत आहेत, एवढाच विचार मुलांच्या मनात घर करायचा. 2500 ते 3000 विद्यार्थी शांतपणे बसून गॅदरिंग शांततेत पार पडले, याचा अर्थ कमिशनर साहेब सज्जनला या जगात मान आहे. सद्गुणांची केवढी ही परिणामकता. जसजसे आपण नीतिमत्तेचे सद्गुणांचे आचरण करतो, तेव्हा निसर्गाची सारी शक्ती आपणांस पूर्णत: साहाय्य करत असते.  नीतिमान शब्दात एक प्रकारची ताकद असते, स्वामी विवेकानंद म्हणतात, नीती ही सुखाचा पाया आहे. सत्य व नीती आकाशातून जमिनीवर फेकले तरी क्षणात उभे राहण्याची त्यांच्यात ताकद असते. एकदा यंग्स मठ व चर्चिल विमानाने चालले होते. यंग्स मठ चर्चिलला म्हणाले, तुम्हाला गांधी माहित आहेत का ? त्यांना तुम्हाला भेटायचे का ? चर्चिल यंग्स मठला म्हणाले - मला गांधीजी माहिती आहेत पण मी त्यांना भेटू  इच्छित नाही. कारण जर मी त्यांना भेटलो तर ते माझे विचार व माझा दृष्टीकोन बदलून टाकतील. सद्गुणांची केवढी ही ताकद, सदगुणी माणसाच्या विचारात समोरच्या व्यक्तीला पूर्णत: बदलण्याची ताकद असते. नारदमुनींच्या सहवासात वाल्या कोळी - संत वाल्मीकी होतो तर अनेकांच्या हत्या करणारा अंगुलीमाल भगवान बुध्दांच्या संपर्कात येऊन भिक्षू होऊन निर्वाणाचा अधिकारी होतो. म्हणून समर्थ रामदास म्हणतात..  मना तूचि रे एक क्रिया करावी । सदा संगती सज्जनांची धरावी ॥ परंतु आधुनिक युगात कधी-कधी सज्जनाला दुर्जन त्रास देऊ पाहतात. त्यावेळी मात्र सद्गुणी माणसाने पूर्ण शक्तीनिशी त्यांचा बिमोड करावयास हवा. बुध्दाचा मध्यम मार्ग धारण करावयास हवा बुध्द म्हणतात, शरीर व वाणीने कठोर कर्म करताना फक्त मनात पूर्णत: करूणा व मैत्री असू द्या. कटूता येऊ देऊ नका. स्टीफन कोव्हे देखील म्हणतात क्रिया करा - प्रतिक्रिया नकोकुंभार मडके बनवताना खाली मैत्रीचा हात ठेवून वरून मडके बउवतो ते मजबूत करण्यासाठी - तोडण्यासाठी नव्हे, म्हणून मनात मैत्री - करूणा ठेवून अन्यायाचा प्रतिकार करा.गीतेत भगवान श्रीकृष्ण अजुर्नास म्हणतात, अर्जुना, समोर तुझे बांधव - गुरू-चुलते असतील तरी तू शस्त्र उचल व त्यांना मार. कारण अधर्माचा नाश करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे.फक्त अधर्माविरूध्द लढताना आपण धर्माची पायरी म्हणजे सद्गुण व नीतिमत्ता सोडू नये. मनात मैत्री व करूणा असू द्यावी. शेवटी शांती व क्रांतीचा मध्य साधता आला तरच जीवन खऱ्या अर्थाने सुखी होईल. (लेखक व्याख्याते असून त्यांच्या"मनाची मशागत "या पुस्तकाला बेस्ट सेलर चा दर्जा मिळाला आहे. संपर्क 9822632630)

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक