शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

मनःशांती- शांती व क्रांतीचा मध्य साधता आला तरच जीवन खऱ्या अर्थाने सुखी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 20:47 IST

स्वामी विवेकानंद म्हणतात, नीती ही सुखाचा पाया आहे. सत्य व नीती आकाशातून जमिनीवर फेकले तरी क्षणात उभे राहण्याची त्यांच्यात ताकद असते. 

-डॉ. दत्ता कोहिनकर- प्राचार्य शिवाजीराव भोसलेंना एकदा पोलिस आयुक्तांनी विचारलं, सर.. स्नेहसंमेलनाला पोलीस बंदोबस्त न मागवता तुमच्या विद्यापीठाचं स्नेहसंमेलन शांततेत कसं काय पार पडलं ? यापूर्वीच्या कुलगुरूंनी पोलीस बंदोबस्त घेऊन देखील भांडणे व हाणामाऱ्या व्हायच्याच. शेवटी जास्त पोलीस फाटा पाठवावा लागायचा. तुमच्यात काय दैवी शक्ती वगैरे आहे का ? हसत-हसत शिवाजीराव भोसले म्हणाले, साहेब बरीचशी टारगट गुन्हेगारी प्रवृत्तीची मुले आमच्या विद्यापीठात आहेत. काही जण तर टोळीनेच कॉलेजमध्ये फिरत असतात. दुमडलेल्या बाह्या खाली घेऊन, वाकून मला आदराने नमस्कार करतात. स्नेहसंमेलनाला मी फक्त कोट घालून एका कोपऱ्यात स्टेजजवळ उभा होतो. अडीच ते तीन हजार विद्यार्थी शांतपणे बसून होते,प्राचार्य-भोसले सर समोरच उभेत आहेत, एवढाच विचार मुलांच्या मनात घर करायचा. 2500 ते 3000 विद्यार्थी शांतपणे बसून गॅदरिंग शांततेत पार पडले, याचा अर्थ कमिशनर साहेब सज्जनला या जगात मान आहे. सद्गुणांची केवढी ही परिणामकता. जसजसे आपण नीतिमत्तेचे सद्गुणांचे आचरण करतो, तेव्हा निसर्गाची सारी शक्ती आपणांस पूर्णत: साहाय्य करत असते.  नीतिमान शब्दात एक प्रकारची ताकद असते, स्वामी विवेकानंद म्हणतात, नीती ही सुखाचा पाया आहे. सत्य व नीती आकाशातून जमिनीवर फेकले तरी क्षणात उभे राहण्याची त्यांच्यात ताकद असते. एकदा यंग्स मठ व चर्चिल विमानाने चालले होते. यंग्स मठ चर्चिलला म्हणाले, तुम्हाला गांधी माहित आहेत का ? त्यांना तुम्हाला भेटायचे का ? चर्चिल यंग्स मठला म्हणाले - मला गांधीजी माहिती आहेत पण मी त्यांना भेटू  इच्छित नाही. कारण जर मी त्यांना भेटलो तर ते माझे विचार व माझा दृष्टीकोन बदलून टाकतील. सद्गुणांची केवढी ही ताकद, सदगुणी माणसाच्या विचारात समोरच्या व्यक्तीला पूर्णत: बदलण्याची ताकद असते. नारदमुनींच्या सहवासात वाल्या कोळी - संत वाल्मीकी होतो तर अनेकांच्या हत्या करणारा अंगुलीमाल भगवान बुध्दांच्या संपर्कात येऊन भिक्षू होऊन निर्वाणाचा अधिकारी होतो. म्हणून समर्थ रामदास म्हणतात..  मना तूचि रे एक क्रिया करावी । सदा संगती सज्जनांची धरावी ॥ परंतु आधुनिक युगात कधी-कधी सज्जनाला दुर्जन त्रास देऊ पाहतात. त्यावेळी मात्र सद्गुणी माणसाने पूर्ण शक्तीनिशी त्यांचा बिमोड करावयास हवा. बुध्दाचा मध्यम मार्ग धारण करावयास हवा बुध्द म्हणतात, शरीर व वाणीने कठोर कर्म करताना फक्त मनात पूर्णत: करूणा व मैत्री असू द्या. कटूता येऊ देऊ नका. स्टीफन कोव्हे देखील म्हणतात क्रिया करा - प्रतिक्रिया नकोकुंभार मडके बनवताना खाली मैत्रीचा हात ठेवून वरून मडके बउवतो ते मजबूत करण्यासाठी - तोडण्यासाठी नव्हे, म्हणून मनात मैत्री - करूणा ठेवून अन्यायाचा प्रतिकार करा.गीतेत भगवान श्रीकृष्ण अजुर्नास म्हणतात, अर्जुना, समोर तुझे बांधव - गुरू-चुलते असतील तरी तू शस्त्र उचल व त्यांना मार. कारण अधर्माचा नाश करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे.फक्त अधर्माविरूध्द लढताना आपण धर्माची पायरी म्हणजे सद्गुण व नीतिमत्ता सोडू नये. मनात मैत्री व करूणा असू द्यावी. शेवटी शांती व क्रांतीचा मध्य साधता आला तरच जीवन खऱ्या अर्थाने सुखी होईल. (लेखक व्याख्याते असून त्यांच्या"मनाची मशागत "या पुस्तकाला बेस्ट सेलर चा दर्जा मिळाला आहे. संपर्क 9822632630)

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक