शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
4
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
5
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
6
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
7
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
8
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
9
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
10
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
11
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
12
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
13
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
14
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
15
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
16
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
17
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
18
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
19
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
20
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २६, माणूस ही परमेश्वराची प्रतिकृती आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 11:27 IST

माणसाची बुध्दी ही दुधारी आहे. एखादे दुधारी शस्त्र ज्याला दोन्ही बाजूंनी धार असते तशी माणसाची बुध्दी ही दुधारी आहे म्हणजे ती विनाश करू शकते तशी ती उत्कर्ष  देखील करु शकते,विकासही करु शकते.

ठळक मुद्देपरमेश्वराने माणूस ही आपली प्रतिकृती निर्माण केलेली आहे म्हणूनच माणूस प्रतिसृष्टी निर्माण करू शकतोमाणसाने देव व्हायचे की दानव व्हायचे हा प्रश्न माणसाच्या समोर आहे

सदगुरू श्री वामनराव पैमाणसाची बुध्दी ही दुधारी आहे. एखादे दुधारी शस्त्र ज्याला दोन्ही बाजूंनी धार असते तशी माणसाची बुध्दी ही दुधारी आहे म्हणजे ती विनाश करू शकते तशी ती उत्कर्ष  देखील करु शकते,विकासही करु शकते. पण ही बुध्दी विनाशाकडे जास्त झुकते व विकासाकडे जात नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे. जर माणसाने आपल्या बुध्दीचा वापर चांगल्या गोष्टींसाठी केला तर तो या जगाचे नंदनवन करू शकतो कारण माणूस ही परमेश्वराची प्रतिकृती आहे. माणसाने जशी प्रतिसृष्टी निर्माण केली तसे परमेश्वराने माणूस ही आपली प्रतिकृती निर्माण केलेली आहे. त्याचसोबत हे ही लक्षांत ठेवली पाहिजे की परमेश्वराने माणूस ही आपली प्रतिकृती निर्माण केलेली आहे म्हणूनच माणूस प्रतिसृष्टी निर्माण करू शकतो.

माणूस हा परमेश्वराचे प्रतिक आहे म्हणूनच माणसाने सुखी होण्यासाठी काय केले पाहिजे हया प्रश्नाचे उत्तर आपोआप आले. लोकांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांचे भस्म करण्यापेक्षा लोकांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशिर्वाद द्या. आपले वाडवडिल आपल्या डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद देतात. मला मला काही लोक सांगतात आमच्या डोक्यावर हात ठेवा. त्याला बरे वाटते म्हणून मी ठेवतो. आपण त्याला आशिर्वाद देण्यासाठी त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि भस्मासूर त्याचे भस्म करण्यासाठीच त्याच्या डोक्यावर हात ठेवत होता. अशी जगात दोन माणसे आहेत. सूर व असूर अशी दोन प्रकारची माणसे या जगात आहेत. देव व दानव दोन्ही माणसांत आहे. माणसाने देव व्हायचे की दानव व्हायचे हा प्रश्न माणसाच्या समोर आहे.

आपण म्हणतो माणसासमोर अनेक प्रश्न आहेत पण मी म्हणतो माणसाच्यापुढे एकच प्रश्न आहे व तो म्हणजे आपण देव व्हायचे की दानव व्हायचे. देव व्हायचे ठरविले की माणसाचे सर्व प्रश्न सुटतात व तो सुखी होतो व त्याने दानव व्हायचे ठरविले किंवा ठरवायला कशाला पाहिजे तो दानव झालेलाच आहे व त्यामुळेच सर्व प्रश्न निर्माण झालेले आहेत. घरामध्ये, दारामध्ये, समाजामध्ये, राष्ट्रामध्ये कुठेही बघा सर्वत्र प्रश्न, समस्या, संकटे, दु:ख हे सर्व पहायला मिळते याचे कारण माणूस आपल्या बुध्दीचा वापर जसा करायला पाहिजे तसा करत नाही. तो देव होत नाही तर तो दानव होतो. माणूस जर देवाची प्रतिकृती आहे तर तो देव होण्याऐवजी दानव का होतो. त्याचे एक कारण असे की पाणी हे जमिनीवर पडले की ते खालच्या दिशेने वहाते तसे माणसाचा कल हा सखल दिशेला जातो.