शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २६, माणूस ही परमेश्वराची प्रतिकृती आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 11:27 IST

माणसाची बुध्दी ही दुधारी आहे. एखादे दुधारी शस्त्र ज्याला दोन्ही बाजूंनी धार असते तशी माणसाची बुध्दी ही दुधारी आहे म्हणजे ती विनाश करू शकते तशी ती उत्कर्ष  देखील करु शकते,विकासही करु शकते.

ठळक मुद्देपरमेश्वराने माणूस ही आपली प्रतिकृती निर्माण केलेली आहे म्हणूनच माणूस प्रतिसृष्टी निर्माण करू शकतोमाणसाने देव व्हायचे की दानव व्हायचे हा प्रश्न माणसाच्या समोर आहे

सदगुरू श्री वामनराव पैमाणसाची बुध्दी ही दुधारी आहे. एखादे दुधारी शस्त्र ज्याला दोन्ही बाजूंनी धार असते तशी माणसाची बुध्दी ही दुधारी आहे म्हणजे ती विनाश करू शकते तशी ती उत्कर्ष  देखील करु शकते,विकासही करु शकते. पण ही बुध्दी विनाशाकडे जास्त झुकते व विकासाकडे जात नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे. जर माणसाने आपल्या बुध्दीचा वापर चांगल्या गोष्टींसाठी केला तर तो या जगाचे नंदनवन करू शकतो कारण माणूस ही परमेश्वराची प्रतिकृती आहे. माणसाने जशी प्रतिसृष्टी निर्माण केली तसे परमेश्वराने माणूस ही आपली प्रतिकृती निर्माण केलेली आहे. त्याचसोबत हे ही लक्षांत ठेवली पाहिजे की परमेश्वराने माणूस ही आपली प्रतिकृती निर्माण केलेली आहे म्हणूनच माणूस प्रतिसृष्टी निर्माण करू शकतो.

माणूस हा परमेश्वराचे प्रतिक आहे म्हणूनच माणसाने सुखी होण्यासाठी काय केले पाहिजे हया प्रश्नाचे उत्तर आपोआप आले. लोकांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांचे भस्म करण्यापेक्षा लोकांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशिर्वाद द्या. आपले वाडवडिल आपल्या डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद देतात. मला मला काही लोक सांगतात आमच्या डोक्यावर हात ठेवा. त्याला बरे वाटते म्हणून मी ठेवतो. आपण त्याला आशिर्वाद देण्यासाठी त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि भस्मासूर त्याचे भस्म करण्यासाठीच त्याच्या डोक्यावर हात ठेवत होता. अशी जगात दोन माणसे आहेत. सूर व असूर अशी दोन प्रकारची माणसे या जगात आहेत. देव व दानव दोन्ही माणसांत आहे. माणसाने देव व्हायचे की दानव व्हायचे हा प्रश्न माणसाच्या समोर आहे.

आपण म्हणतो माणसासमोर अनेक प्रश्न आहेत पण मी म्हणतो माणसाच्यापुढे एकच प्रश्न आहे व तो म्हणजे आपण देव व्हायचे की दानव व्हायचे. देव व्हायचे ठरविले की माणसाचे सर्व प्रश्न सुटतात व तो सुखी होतो व त्याने दानव व्हायचे ठरविले किंवा ठरवायला कशाला पाहिजे तो दानव झालेलाच आहे व त्यामुळेच सर्व प्रश्न निर्माण झालेले आहेत. घरामध्ये, दारामध्ये, समाजामध्ये, राष्ट्रामध्ये कुठेही बघा सर्वत्र प्रश्न, समस्या, संकटे, दु:ख हे सर्व पहायला मिळते याचे कारण माणूस आपल्या बुध्दीचा वापर जसा करायला पाहिजे तसा करत नाही. तो देव होत नाही तर तो दानव होतो. माणूस जर देवाची प्रतिकृती आहे तर तो देव होण्याऐवजी दानव का होतो. त्याचे एक कारण असे की पाणी हे जमिनीवर पडले की ते खालच्या दिशेने वहाते तसे माणसाचा कल हा सखल दिशेला जातो.