शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
5
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
6
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
7
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
8
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
9
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
10
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
11
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
12
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
13
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
14
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
15
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
16
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
17
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
18
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
19
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
20
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला

श्रीमंत बनायला अन् गरीब बनायला माणूसच कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 06:15 IST

श्रीमंतीचं शास्त्र आहे अन् गरिबीची कारणं आहेत. श्रीमंत बनायला अन् गरीब बनायला माणूसच कारणीभूत असतो. श्रीमंतीचं शास्त्र फारच सोपं आहे. या शास्त्रात फक्त चांगलाच विचार करायचा आहे.

- विजयराज बोधनकरश्रीमंतीचं शास्त्र आहे अन् गरिबीची कारणं आहेत. श्रीमंत बनायला अन् गरीब बनायला माणूसच कारणीभूत असतो. श्रीमंतीचं शास्त्र फारच सोपं आहे. या शास्त्रात फक्त चांगलाच विचार करायचा आहे. श्रीमंत माणसं सकारात्मक म्हणजे यशाचाच विचार करतात. म्हणून त्यांच्या पदरात यशच पडतं आणि गरिबी टिकवणारी माणसं नकारात्मक म्हणजे अपयशाचा विचार करतात. त्यांच्या पदरात अपयशच पडतं. देव हा सकारात्मक विचार करायला लावणारा मार्ग आहे. पण गरीब माणसं देवाजवळ फक्त आपली गाºहाणी घालतात. अडचणी आपण निर्माण करतो. त्या सोडवायच्यासुद्धा आपणच. त्यात देव काहीही सहकार्य करू शकत नाही.देव हा नेमकं काय देतो तर नवा विचार आणि प्रेरणा देतो. बुद्धी हे असं एक कपाट आहे ज्यात माणूस आपले अनंत विचार, बालपणापासूनच्या आठवणी, घडून गेलेल्या घटनांचे तपशील, पुस्तकातून वाचलेल्या गोष्टी, कथा, व्यथा, भेटलेल्या चित्रविचित्र माणसांचे अनुभव, अचानक सुचलेल्या नवकल्पना, मित्रांनी, गुरूजनांनी, मातापित्यांनी दिलेले मौलिक सल्ले अशा अनेक गोष्टी मेंदू आपल्या कप्प्याकप्प्यात साठवून ठेवतो आणि योग्य वेळी योग्य गोष्टीचा वापर करतो. ज्याची बुद्धी सतत निसर्गाकडून, समाजाकडून प्रेरणा घेत कृती करीत असतो आणि तोच कृतिशील मानव मनाने, धनाने, तनाने श्रीमंत होऊ शकतो. यात देव फक्त एक दुवा असतो.जो मानव बुद्धीचा काहीच वापर करीत नसेल तर त्याला गरिबी अधिक गिळत जाते. अशा गरिबांनी कितीही तीर्थयात्रा केल्या, पूजापाठ केले, व्रतवैकल्ये केली तरी देव त्याच्या पदरात गरिबीच टाकत राहतो. कारण देव झोपणाऱ्याला झोप देतो आणि बुद्धीने चालणाºयाला बुद्धी देतो. हेच श्रीमंतीचं शास्त्र आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक