शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

Mahashivratri : महादेवाची पूजा करताना बेलपत्र का अर्पण करतात? जाणून घ्या कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 10:09 IST

महाशिवरात्रीला भगवान महादेवाला वेगवेगळ्या गोष्टींसह बेलपत्रही अर्पण केलं जातं. पण याचं कारण अनेकांना माहीत नसतं. तेच कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

(Image Credit : Social Media)

महाशिवरात्रीचा उत्सव देशभरात साजरा केला जात आहे. भाविक भगवान शिवाची पूजा-अर्चना करून महादेवाला प्रसन्न केलं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. भाविक या दिवशी पूजा करताना महादेवाच्या पिंडिवर बेलपत्र वाहतात. पण हे का वाहतात याचं कारण अनेकांना माहीत नसतं. याबाबत काही आख्यायिका आहेत.

काय आहे कारण?

(Image Credit : Social Media)

हिंदू पुराणांमधील एक प्रचलित कथा आहे. या कथेनुसार, समुद्र मंथनावेळी जेव्हा अमृतसाठी देव आणि दानवांमध्ये युद्ध सुरू झाले होते. त्यावेळी अमृताआधी समुद्रातून कालकूट नावाचं विष निघालं होतं. या विषाने संपूर्ण ब्रम्हांड नष्ट झालं असतं. हे विष केवळ भगवान महादेवच नष्ट करू शकत होते. तेव्हा भगवान महादेवाने कालकूट विष आपल्या कंठात ठेवलं होतं. यामुळेच त्यांचा कंठ निळा झाला होता. त्यामुळेच त्यांचं नाव नीलकंठ पडलं होतं.

(Image Credit : YouTube)

पण या विषामुळे भगवान शिवाचं डोकं गरम होऊ लागलं होतं आणि त्यांच्या कंठात जळजळ होऊ लागली होती. त्यांना होणारा हा त्रास पाहून देव चिंतेत होते. त्यांच्या कंठाची जळजळ कमी करण्यासाठी सर्वच देवतांनी त्यांना बेलपत्र खायला दिलं. ज्यामुळे विषाचा प्रभाव कमी झाला. तेव्हापासून भगवान शिवाच्या पूजेत बेलपत्राला महत्व आहे. असे मानले जाते की, जे लोक भगवान शिवाला बेलपत्र वाहतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात.

महाशिवरात्रीचं महत्व

अशी मान्यता आहे की,  काही दंतकथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल(विष) याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय. तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीच विवाह झाला होता. महाशिवरात्री विषयी आणखी कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला ‘जलरात्री’ देखील संबोधतात. महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीReligious programmeधार्मिक कार्यक्रमIndian Festivalsभारतीय सण