शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

Mahashivratri : महादेवाची पूजा करताना बेलपत्र का अर्पण करतात? जाणून घ्या कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 10:09 IST

महाशिवरात्रीला भगवान महादेवाला वेगवेगळ्या गोष्टींसह बेलपत्रही अर्पण केलं जातं. पण याचं कारण अनेकांना माहीत नसतं. तेच कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

(Image Credit : Social Media)

महाशिवरात्रीचा उत्सव देशभरात साजरा केला जात आहे. भाविक भगवान शिवाची पूजा-अर्चना करून महादेवाला प्रसन्न केलं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. भाविक या दिवशी पूजा करताना महादेवाच्या पिंडिवर बेलपत्र वाहतात. पण हे का वाहतात याचं कारण अनेकांना माहीत नसतं. याबाबत काही आख्यायिका आहेत.

काय आहे कारण?

(Image Credit : Social Media)

हिंदू पुराणांमधील एक प्रचलित कथा आहे. या कथेनुसार, समुद्र मंथनावेळी जेव्हा अमृतसाठी देव आणि दानवांमध्ये युद्ध सुरू झाले होते. त्यावेळी अमृताआधी समुद्रातून कालकूट नावाचं विष निघालं होतं. या विषाने संपूर्ण ब्रम्हांड नष्ट झालं असतं. हे विष केवळ भगवान महादेवच नष्ट करू शकत होते. तेव्हा भगवान महादेवाने कालकूट विष आपल्या कंठात ठेवलं होतं. यामुळेच त्यांचा कंठ निळा झाला होता. त्यामुळेच त्यांचं नाव नीलकंठ पडलं होतं.

(Image Credit : YouTube)

पण या विषामुळे भगवान शिवाचं डोकं गरम होऊ लागलं होतं आणि त्यांच्या कंठात जळजळ होऊ लागली होती. त्यांना होणारा हा त्रास पाहून देव चिंतेत होते. त्यांच्या कंठाची जळजळ कमी करण्यासाठी सर्वच देवतांनी त्यांना बेलपत्र खायला दिलं. ज्यामुळे विषाचा प्रभाव कमी झाला. तेव्हापासून भगवान शिवाच्या पूजेत बेलपत्राला महत्व आहे. असे मानले जाते की, जे लोक भगवान शिवाला बेलपत्र वाहतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात.

महाशिवरात्रीचं महत्व

अशी मान्यता आहे की,  काही दंतकथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल(विष) याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय. तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीच विवाह झाला होता. महाशिवरात्री विषयी आणखी कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला ‘जलरात्री’ देखील संबोधतात. महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीReligious programmeधार्मिक कार्यक्रमIndian Festivalsभारतीय सण