शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

राष्ट्रसंतांनी पत्रे  : प्रेमभक्तीचा पाझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 12:39 AM

हे बघा! भक्तीसाठी राणीपदाची, ऐश्वर्याची गरज नाही. कोणतीही महिला आपल्या शुद्ध अंत:करणाने प्रभुभक्तीत तदाकार झाली तर ती मीरेप्रमाणेच संत होऊ शकेल.

प्रिय मित्रसंत मीराबाईबद्दल आपण विचारले की तिला प्रेमभक्ती कशी प्राप्त झाली? आपल्या या प्रश्नासंबंधीचे माझे विचार मी आपणास कळवीत आहे. हे बघा! भक्तीसाठी राणीपदाची, ऐश्वर्याची गरज नाही. कोणतीही महिला आपल्या शुद्ध अंत:करणाने प्रभुभक्तीत तदाकार झाली तर ती मीरेप्रमाणेच संत होऊ शकेल. साध्वी होऊ शकेल. कोणताही भक्त भक्तिभावाने प्रभूशी समरस झाला की देव त्याच्या ओंजळीने पाणी पिऊ लागतो, ही गोष्ट सर्वश्रुत आहे. पण जीवनाला भक्तीचा रंग किती चढला यावरच हे अवलंबून असणार! भक्तीचा संबंध बाहेरच्या अवडंबराशी मुळीच नाही. तो मनाशी व हृदयाशी आहे. ज्या भक्ताचे हृदय भक्तीने भिजून गेलेले असते, ज्या भक्ताचे मन विकल्परहित झालेले असते तेव्हाच त्याच्यासमोर त्याची देवता नाचू लागत असते. प्रश्न असा आहे की ही वृत्ती निर्माण करण्याला काय करावे लागत असते? माझे मत असे आहे की संकटे किंवा संतसमागम या दोन गोष्टींमुळे ही गोष्ट शक्य होते. संतसमागमातून सद्बुद्धी मिळते. संकटांशी सामना करण्याने मनाची ताकद वाढते. पण संकटांशी सामना करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरावे लागते.संतसमागमासाठी हरिकथा घोकावी लागते. जग हे स्मशानवत समजून वैराग्य प्राप्त करावे लागते. सुख आणि संपत्ती या गोष्टींपासून बाजूला सरकावे लागते.मित्रा, शेवटी मन, बुद्धी व अहंकार ज्या मार्गाने जातात तसाच माणूस बनणार आणि तसाच त्याला अनुभव येणार. तुला दुसऱ्याची कथा आवडते पण प्रत्यक्ष काही करण्याची वेळ येईल तेव्हा मन घडीघडी कसे बदलत जाते याची साक्ष पटेल. यासाठी भक्तांनी व मीरेने काय काय आपत्ती सहन केल्या, हे काही नव्याने सांगण्यासारखे नाही. शेवटी जहराचा पेलासुद्धा तिच्या जवळच्या, घरातल्या लोकांनी दिला ना? हे सारे सहजपणे थोडेच घडते? ज्याप्रमाणे विषयांध माणूस जिवावर उदार होऊन लाज-शरम न बाळगता आपल्या प्रिय वस्तूला प्राप्त करून घेतो, त्याचप्रमाणे देवाशी जेव्हा प्रेम जडते तेव्हा काय होईल ते होवो पण आपल्या देवाशी अंतर पडू नये, असे भक्ताच्या मनाने घेतलेले असते. तो देवाच्या सख्यत्वासाठी वाटेल तसा प्रयत्न करून देवाची भक्ती करतो; व शेवटी देवस्वरूप होतो आणि मग देवाचे कार्य हेच आपले कार्य मानून देवाशी तादात्म्य पावतो असेच मीरेचे व अनेक भक्तांचे झाले आहे. येथे राणीच कशाला? कुब्जा, भिल्लीण, राधा, सखू, जनी, मंदोदरी सर्वांनी आपल्या जीवनाच्या पणत्या देवाजवळ पाजळल्या आणि जळलेल्या कापराप्रमाणे देवाशी समरस झाल्या. देवाच्या प्राप्तीसाठी स्वत:ला विलीन करून घेणे हीच प्रेमभक्तीची खूण आहे.                                                                                                                                                     -तुकड्यादास

  • बाबा मोहोड

 

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजAdhyatmikआध्यात्मिक