शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रसंतांची पत्रे : मोक्ष-प्राप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 12:03 AM

मोक्ष म्हणजे बंधनातून मोकळे होणे, आसक्तीपासून अनासक्त होणे. हे मोकळे होण्याचे अनेक मार्ग आहेत. एखाद्या कार्यापासून मोकळे हे तेवढ्यापुरतेच झाले. पण संपूर्ण व्याधी-उपाधी, शरीराची, मनाची, बुद्धीची किंबहुना ज्ञानाचीही अहंरूपाने सोडून स्वरूपाशी तादात्म्यवृत्ती साधणे यालाच मोक्ष मिळणे म्हणतात.

प्रिय मित्र-मोक्ष अथवा मुक्ती म्हणजे काय? आपण विचारल्यावरून उत्तर लिहीत आहे. मोक्ष म्हणजे बंधनातून मोकळे होणे, आसक्तीपासून अनासक्त होणे. हे मोकळे होण्याचे अनेक मार्ग आहेत. एखाद्या कार्यापासून मोकळे हे तेवढ्यापुरतेच झाले. पण संपूर्ण व्याधी-उपाधी, शरीराची, मनाची, बुद्धीची किंबहुना ज्ञानाचीही अहंरूपाने सोडून स्वरूपाशी तादात्म्यवृत्ती साधणे यालाच मोक्ष मिळणे म्हणतात. दानाने, धर्माने, परोपकाराने, सेवेने उच्च गती प्राप्त होते. कारण जीवाची उच्चांक अवस्था त्याने मिळते. स्वर्गपद मिळते किंबहुना इंद्रपदही मिळणे शक्य आहे. कारण त्या जीवात देवतांनाही वश करून त्यांच्या प्रसन्नतेने त्याने राज्य घेणेही संभवते. पण मोक्षाला तर हे सोडून निव्वळ परमपदाच्या ठिकाणी विलीनच व्हावे लागते.

ज्या पदाला गेल्यानंतर पुन्हा येणे नाही, पुण्य आणि पापाचीही वासना उरलेली नाही, असे जीवा-शिवानी अभिन्नपण ज्याने मिळविले असेल, सोहं तत्त्वांशी ज्याचे तादात्म्य झाले असेल अशा निर्विकार वृत्तीरहित पुरुषालाच मोक्ष संभवतो. पण तो प्राप्त करण्याला प्रथम सदाचारी, शुद्धविचारी चित्त स्थिरतची व गुरुदेवाच्या आज्ञेकरिता प्राण पणाला लावणारी श्रद्धा असावी लागते. त्यामुळे मनातील व अंगातील सर्व दुुर्गुणांचा त्याग करून सद्गुणांचा आश्रय करावा लागतो. अशा नियमांनी वागणारा मग गृहस्थधर्मी असो वा संन्यासी असो, त्यालाच मोक्षाचे सुख म्हणजे धाम प्राप्त होणे संभवते. निव्वळ वेदांताच्या चर्चा करून व तीर्थाटने करून मोक्ष मिळणे दुर्लभ आहे.कारण त्याने वासनेचा त्याग होत नाही. उलट मनाच्या भराऱ्या मारण्याला मदत मिळते व नसता प्रवासाचा, देवाच्या-संतांच्या, बाह्य स्वरूपांचा अहंकार जमा होतो. त्याने वासना थांबत नाही; तर तिला पुन्हा खेळण्याला जागा मिळते ती आत्म-स्वरूपाकडे जाण्याला प्रवृत्त झाली पाहिजे. हळूहळू विषयापासून, उपाधीपासून, दंभ-दर्भ-द्वेषापासून सुटली पाहिजे. लहान जीवापासून तो मोठ्या जीवापर्यंत नम्रता, समरसता धारणा करू शकली पाहिजे. असे साधन जी उपासना, जो देव, जे संत देत असतील व अभ्यासक घेत असतील तेच मोक्षसाधनाला प्राप्त करून देऊ शकतात. सामान्य माणूसही ज्ञानाने व जाणिवेने मोक्ष प्राप्त करू शकतो. त्याला यज्ञाची, जप-तपाची, धन व जातीची जरूर नाही. केवळ ज्ञान प्राप्त करून जीवाला अज्ञानजनक संगतीचा त्याग करूनही पुरूष मोक्षाचा धनी होतो.                                                                                                                                                   -तुकड्यादास

  • संकलन : बाबा मोहोड
टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज