शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

राष्ट्रसंतांची पत्रे : एकांत व साधना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:37 IST

अहो, ज्या दिवशी तुम्हाला देवाची चिंता लागेल त्या दिवशी तुमचा धंदाच तुम्हाला मदत करील. लोकच तुमच्याजवळ हल्लाकल्ला करणार नाहीत. पण प्रथम तुम्हाला वेड तर लागू द्या देवाचे! मी एकान्त करू नये असा आग्रह धरणारापैकी नाही. पण जसे काम करताना शीण येतो तसाच एकान्तातही माणूस जास्त वेळ राहिला तर तेथेही उपद्रव निर्माण करतो.

ठळक मुद्देअध्यात्म

प्रिय मित्र -आपण एकान्तासाठी फारच धडपडला आहात असे आपल्या पत्राावरून दिसते. पण तुम्हाला तो एकान्त तुमच्या कामातही साधता आला पाहिजे ना! नाही तर एकान्तात गेला तर घरादाराची चिंता त्रास देईल व लोकान्तात बसलात तर एकान्तात त्याची धडपड राहील. मला वाटते, आपण दोहोचा समन्वय केला पाहिजे व तो तेव्हाच होईल जेव्हा तुमच्या मनाची धारणा योग्यवेळीयोग्य चिंतन करण्याची होईल. 

हे बघा, साधारण विषयी माणसालासुद्धा लोकान्तात आपली भावना आपल्या पत्नी, पुत्राबद्दल दृढ करता येते. तो त्याकरिता काय वाटेल ते काम करून त्यांच्या भलाईचे नेहमी चिंतन करत राहतो आणि तुम्हाला म्हणे, देवाच्या भक्तीकरिता देवळात जाऊन, डोळे लावून, नाक धरून व कान दाबून चोरासारखे बसून चिंतन करावे लागते आणि तरी ते पूर्ण होणे कठीणच आहे, नाही का?अहो, ज्या दिवशी तुम्हाला देवाची चिंता लागेल त्या दिवशी तुमचा धंदाच तुम्हाला मदत करील. लोकच तुमच्याजवळ हल्लाकल्ला करणार नाहीत. पण प्रथम तुम्हाला वेड तर लागू द्या देवाचे! मी एकान्त करू नये असा आग्रह धरणारापैकी नाही. पण जसे काम करताना शीण येतो तसाच एकान्तातही माणूस जास्त वेळ राहिला तर तेथेही उपद्रव निर्माण करतो. कारण ज्या मनामुळे आपण एकान्त चाहतो ते मन एकान्तात गेले म्हणजे स्वस्थ बसून राहते काय? छे! ते तर जास्त हलकल्लोळ करते. मग त्याला समजावण्यासाठी विवेक बलवान करून स्थिर करावा लागतो. तेही होईल की नाही शंकाच आहे. प्राणायामाने, योगासनाने, मनाची गती थोडी थांबते एवढेच. पण तेवढी कसरत संपली की पुन्हा ते तसेच वागू लागते. हा बऱ्याच साधकांचा अनुभव आहे.माझे म्हणणे असे आहे की काही श्रवणभक्ती करावी. काही नामस्मरणाची वाणी मनाने चालवावी व कामातही त्याला वेळ देत जावा. ‘हात कामी व चित्त नामी’ असाही अभ्यास करावा आणि आपली आवड सत्कार्याबद्दल तन-मन धनाने वाढवावी. म्हणजे मनाला जेव्हा त्याचा स्वाद लागेल तेव्हा लोकान्तातही एकान्त साधता येईल. नाही तर वाघासारखी गुहेत राहण्याची सवय असूनही वेळ आली की उडी मारणार! आपली शिकार थोडीच सोडणार आहे तो! तसे मन वाईट प्रसंगी पाप करणार व मग एकान्तात जाऊन ध्यान साधणार! यात काय अर्थ? त्याकरिता सत्समागम करीत राहावा व संयमाने वागावे म्हणजे मनाला तशी सवय लागेल. पण हे सर्व अभ्यासानेच होत असते.-तुकड्यादास

  • संकलन : बाबा मोहोड
टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजYogaयोग